शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्रांवर अन्याय झाल्यास तीव्र आंदोलन

By admin | Updated: May 11, 2015 23:25 IST

कणकवलीत संयुक्त बैठक : महामार्ग चौपदरीकरणावरून नागरिकांचा इशारा

कणकवली : झाराप ते खारेपाटण दरम्यानच्या मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना ३० मीटर रुंदी ठेवण्यात यावी. तसेच भूसंपादन करण्यापूर्वी जमीन मालकांना विश्वासात घेऊन नुकसान भरपाईबाबत जबाबदार अधिकाऱ्यांकडून परिपूर्ण माहिती लेखी स्वरुपात देण्यात यावी. भूमिपुत्रांवर दबाव आणून भूसंपादन केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आला.महामार्ग चौपदरीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी येथील प्रांताधिकारी कार्यालयात अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूल नायब तहसीलदार आशा खुटाळे, महामार्ग प्राधिकरणाचे सहायक अभियंता प्रकाश चव्हाण, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक ए. एन. भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता बासुतकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, शरद कर्ले, रमाकांत राऊत, नगरसेवक रुपेश नार्वेकर, मेघा गांगण, सुशील पारकर, अवधूत मालणकर, अनिल शेट्ये, सोनू सावंत, बाळा बांदेकर, चंदू वरवडेकर, प्रसाद अंधारी आदी नागरिक तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित नागरिकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या समस्यांचे अधिकाऱ्यांकडून निराकरण करून घेतले. तसेच अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यामध्ये झाराप ते पत्रादेवी या मार्गाचे ज्याप्रमाणे चौपदरीकरण झाले त्याप्रमाणेच खारेपाटणपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, या मागणीचा समावेश होता. तीन मीटर रुंदीचा डिव्हायडर तसेच डिव्हायडरच्या दोन्ही बाजूला नऊ-नऊ मीटरचा रस्ता व त्याला लागून दोन्ही बाजूंना साडेचार मीटर सर्व्हीस रोड करण्यात यावा. जंक्शन तसेच सर्व्हीस रोड कशाप्रकारे होणार, याची माहिती विस्तृतपणे प्रशासनाने जनतेला द्यावी. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर महामार्गालगतच्या जमिनी टुरिस्ट-३ झोन या विभागात समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे झाराप ते खारेपाटण या महामार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला बिनशेती दराने देण्यात यावा. या मोबदल्याची जबाबदारी महसूल खाते व महामार्ग प्राधीकरण यापैकी एका विभागावर कायम करण्यात यावी. मोबदला देण्यासाठी वेळेचे बंधन ठरविण्यात यावे. महामार्गाच्या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देऊन नोकरी अथवा रोजगाराची हमी द्यावी. बायपास रस्ता अथवा उड्डाण पुलाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात गरज नाही. शहराचे व्यापारी महत्व, शहराचे नैसर्गिक सौंदर्य, मध्यवर्ती ठिकाण यांचे महत्त्व कमी होऊ नये, यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येऊ नये. जिल्ह्यातील महत्त्वाची व्यापारी ठिकाणे कुडाळ, ओरोस, कसाल, कणकवली, नांदगांव, तळेरे, खारेपाटण महामार्गामुळेच विकसित झाली आहेत. त्यामुळे उड्डाणपूल झाल्यास या शहरांबरोबरच इतर भागांचाही विकास रखडणार आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या महामार्गाच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला २२.५ मीटर असा रस्ता आरक्षित करावा. सध्या सुरु असलेला सर्व्हे असमांतर पद्धतीने करण्यात येत असल्याने तो तातडीने बंद करावा. सर्व्हेबाबत तसेच भूसंपादनाबाबत जबाबदार यंत्रणेकडून भूमिधारकांना लेखी स्वरूपात योग्य ती माहिती देण्यात यावी. महामार्गाचे काम झाल्यानंतर तो टोल फ्री करण्यात यावा. विकासाच्या धोरणाला आमचा विरोध नाही. मात्र, जनतेला विश्वासात घेऊन चौपदरीकरणाचे काम होणे आवश्यक आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)जादा जागा का ?३० मीटरमध्ये महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होत असेल तर जादा जागा का संपादित केली जात आहे? असा प्रश्न संतप्त नागरिकानी यावेळी अधिकाऱ्यांना विचारला. तसेच सर्व्हे करणारी माणसे जमीन मालकांना दमदाटी करीत असून, ते तत्काळ थांबवण्यात यावे. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही यावेळी उपस्थित नागरिकांनी दिला.पुन्हा समन्वय बैठक आयोजित करामहामार्ग चौपदरीकरणाबाबत जनतेला परिपूर्ण माहिती मिळावी, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येत्या आठ दिवसांत पुन्हा समन्वय बैठक आयोजित करा. तसेच महामार्गाचे काम सुरु होण्यापूर्वी रिलायन्स कंपनीला केबल टाकण्यासाठी कोणी परवानगी दिली, याबाबतची माहिती जनतेला द्या. त्याचबरोबर या कंपनीला केबल टाकायची असेल तर ६० मीटर बाहेर त्यांनी ती टाकावी तसेच शेतकऱ्यांना त्याबाबतचा मोबदला कंपनीने द्यावा, अशी मागणीही संदेश पारकर यांनी यावेळी केली. समान मोबदला द्याभूसंपादनानंतर ग्रामीण तसेच शहरी असा भेदभाव न करता भूमिपुत्रांना त्यांच्या जागेबाबत अथवा मालमत्तेबाबत समान मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शरद कर्ले यांनी यावेळी केली.सध्या भरपाई देताना ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले जाते. शहरी भागाला मात्र जास्त मोबदला दिला जातो, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.