शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

हिंमत असेल तर भाजपा नेत्यांच्या वाटेला जा -प्रमोद जठार

By admin | Updated: February 20, 2017 20:40 IST

शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या वरवडे

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 20 - शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या वरवडे गावात काँग्रेसच्या गुंड कार्यकर्त्यानी भाजपच्या जिल्हा परिषदेच्या महिला उमेदवारावर भ्याड हल्ला केला आहे. यानिमित्ताने या कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. मात्र , या कार्यकर्त्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यानी भाजपच्या नेत्यांच्या वाटेला जावून दाखवावे. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.येथील भाजप संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा नेते संदेश पारकर उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले , सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीच्या वेळी नशेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कलमठ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्या अंगावर गाडी घातली. त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याना मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ केली. ही सिंधुदुर्गच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच राणेंच्या दहशतवादाची हि शेवटची उचकी ठरेल एवढे मतदान जनतेने निर्भीडपणे भाजपला करावे. तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी.दहशतवादाने मतदाराना मतदानापासून वंचित ठेवणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे या घटनेकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसच्या कलमठ जिल्हा परिषद व तेथील दोन्ही पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांबाबत तक्रार करणार आहोत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची भेट घेवून या घटनेची माहिती त्यांना देण्यात येणार असल्याचेही जठार यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, भाजपला जिल्ह्यात या निवडणुकीत सुयश मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या २५ पेक्षा जास्त आणि पंचायत समितीच्या ५० पेक्षा जास्त जागांवर भाजपा विजयी होईल.तसेच आतापर्यन्त एकूण मतदानापैकी भाजपाला मिळणारी १५ % मते या निवडणुकीत ४० % वर पोचतील. संदेश पारकर म्हणाले, राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे. ' सुंभ जळला तरी पीळ अजुन गेला 'नाही. त्यामुळेच वरवडेसारख्या घटना घडत आहेत. जिल्हावासीयांना शांतता हवी आहे. त्यामुळे राणेंच्या ठोकशाहीला जनताच २१ तारखेला मतदानातून हद्दपार करेल,असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)