शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

हिंमत असेल तर भाजपा नेत्यांच्या वाटेला जा -प्रमोद जठार

By admin | Updated: February 20, 2017 20:40 IST

शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या वरवडे

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 20 - शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या वरवडे गावात काँग्रेसच्या गुंड कार्यकर्त्यानी भाजपच्या जिल्हा परिषदेच्या महिला उमेदवारावर भ्याड हल्ला केला आहे. यानिमित्ताने या कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. मात्र , या कार्यकर्त्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यानी भाजपच्या नेत्यांच्या वाटेला जावून दाखवावे. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.येथील भाजप संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा नेते संदेश पारकर उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले , सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीच्या वेळी नशेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कलमठ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्या अंगावर गाडी घातली. त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याना मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ केली. ही सिंधुदुर्गच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच राणेंच्या दहशतवादाची हि शेवटची उचकी ठरेल एवढे मतदान जनतेने निर्भीडपणे भाजपला करावे. तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी.दहशतवादाने मतदाराना मतदानापासून वंचित ठेवणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे या घटनेकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसच्या कलमठ जिल्हा परिषद व तेथील दोन्ही पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांबाबत तक्रार करणार आहोत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची भेट घेवून या घटनेची माहिती त्यांना देण्यात येणार असल्याचेही जठार यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, भाजपला जिल्ह्यात या निवडणुकीत सुयश मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या २५ पेक्षा जास्त आणि पंचायत समितीच्या ५० पेक्षा जास्त जागांवर भाजपा विजयी होईल.तसेच आतापर्यन्त एकूण मतदानापैकी भाजपाला मिळणारी १५ % मते या निवडणुकीत ४० % वर पोचतील. संदेश पारकर म्हणाले, राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे. ' सुंभ जळला तरी पीळ अजुन गेला 'नाही. त्यामुळेच वरवडेसारख्या घटना घडत आहेत. जिल्हावासीयांना शांतता हवी आहे. त्यामुळे राणेंच्या ठोकशाहीला जनताच २१ तारखेला मतदानातून हद्दपार करेल,असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)