शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर भाजपा नेत्यांच्या वाटेला जा -प्रमोद जठार

By admin | Updated: February 20, 2017 20:40 IST

शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या वरवडे

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 20 - शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या वरवडे गावात काँग्रेसच्या गुंड कार्यकर्त्यानी भाजपच्या जिल्हा परिषदेच्या महिला उमेदवारावर भ्याड हल्ला केला आहे. यानिमित्ताने या कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. मात्र , या कार्यकर्त्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यानी भाजपच्या नेत्यांच्या वाटेला जावून दाखवावे. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.येथील भाजप संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा नेते संदेश पारकर उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले , सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीच्या वेळी नशेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कलमठ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्या अंगावर गाडी घातली. त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याना मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ केली. ही सिंधुदुर्गच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच राणेंच्या दहशतवादाची हि शेवटची उचकी ठरेल एवढे मतदान जनतेने निर्भीडपणे भाजपला करावे. तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी.दहशतवादाने मतदाराना मतदानापासून वंचित ठेवणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे या घटनेकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसच्या कलमठ जिल्हा परिषद व तेथील दोन्ही पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांबाबत तक्रार करणार आहोत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची भेट घेवून या घटनेची माहिती त्यांना देण्यात येणार असल्याचेही जठार यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, भाजपला जिल्ह्यात या निवडणुकीत सुयश मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या २५ पेक्षा जास्त आणि पंचायत समितीच्या ५० पेक्षा जास्त जागांवर भाजपा विजयी होईल.तसेच आतापर्यन्त एकूण मतदानापैकी भाजपाला मिळणारी १५ % मते या निवडणुकीत ४० % वर पोचतील. संदेश पारकर म्हणाले, राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे. ' सुंभ जळला तरी पीळ अजुन गेला 'नाही. त्यामुळेच वरवडेसारख्या घटना घडत आहेत. जिल्हावासीयांना शांतता हवी आहे. त्यामुळे राणेंच्या ठोकशाहीला जनताच २१ तारखेला मतदानातून हद्दपार करेल,असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)