शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे, मंत्री दीपक केसरकर यांचा सवाल

By अनंत खं.जाधव | Updated: October 9, 2023 16:18 IST

आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही

सावंतवाडी : पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आमच्यातील एकाने भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे असा सवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी किरण सामंत यांनी मोबाईलवर ठेवलेला स्टेटस हा राजकीय गंमत होती. ते कुठेही नाराज नसून ते लोकसभा निवडणुकीत उतरत असतील तर त्यांचा रात्र दिवस प्रचार करून निवडून आणू असेही त्यांनी यावेळी सागितले. मंत्री केसरकर हे आज, सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अशोक दळवी, शिवाजी सावंत, बबन राणे, बाबू कुडतरकर उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, माझ्या खांद्यावर कोल्हापूर व मुंबई शहर अशा दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. यातील कोल्हापूरच्या जबाबदारीतून मुक्त झालो आहे. त्यामुळे आता यापुढे मुंबई शहरमध्ये आठवड्यातून तीन दिवस देणार असून उर्वरित तीन दिवस सावंतवाडी मतदारसंघाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.दिल्लीत जीएसटी कौन्सिलच्या बैठकीसाठी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी या नात्याने तेथे गेलो होतो. यावेळी मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक प्रश्न मांडले त्याला सकारात्मक प्रतिसाद ही मिळाला. तसेच महाराष्ट्राचे अर्थ सचिव यांनी विशेष कौतुक केल्याचे सांगितले. सिंधुरत्नचा 65 कोटीचा निधी अखर्चित होता. अर्थ विभागाकडून हा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तीन पक्षाचे सरकार असले तरी हे निर्णय घेणारे सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणतेच निर्णय होत नव्हते. त्यामुळे कबुलायातदार प्रश्न मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लागू शकला नव्हता. तो प्रश्न मार्गी लागला तो फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून लागला असल्याचे ते म्हणाले.दसरा मेळावा शिवाजी पार्कवर नाहीआम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. आम्ही विकासाचे राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ऐवजी दुसरे मैदान आम्ही घेतले आहे. त्यामुळे ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो हे आता जनतेने ओळखावे असे आवाहन केसरकर यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Dasaraदसराlok sabhaलोकसभा