शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

माकड मृत आढळल्यास १०७७ वर माहिती द्या : शेखर सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 15:38 IST

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गेली काही वर्षे उद्भवणाºया माकडतापावर मात करण्यासाठी बांदा तसेच दोडामार्ग तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया सर्व गावांमधे माकडताप प्रतिबंधक लस सर्व नागरिकांना देण्याचे काम सुरू आहे. मात्र नागरिकांचा याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तो त्यांनी द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह ...

ठळक मुद्दे माकडताप आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नविल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची ग्रामपंचायतीला  मानधन देण्यात येणारमृत माकडासंदर्भातील  माहिती देणाºयास ५० रुपये

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गेली काही वर्षे उद्भवणाºया माकडतापावर मात करण्यासाठी बांदा तसेच दोडामार्ग तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया सर्व गावांमधे माकडताप प्रतिबंधक लस सर्व नागरिकांना देण्याचे काम सुरू आहे. मात्र नागरिकांचा याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तो त्यांनी द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले.

यापुढे जिल्ह्यात कुठेही माकड मृत आढळले तर त्याबाबत तत्काळ १०७७ या क्रमांकावर दूरध्वनी करून माहिती द्यावी, अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली. तसेच यापुढे ग्रामपंचायत परिसरात माकडाचा मृत्यू झाल्यास त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायतीची राहील, असेही ते म्हणाले.  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते. 

यावेळी शेखर सिंह पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील बांदा याठिकाणी माकडताप या आजाराने थैमान घातले आहे. या माकडतापावर मात करण्यासाठी दोडामार्ग परिसरातील तीन आणि बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येणाºया सर्व गावांतील नागरिकांना माकडताप प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. या लसीकरणासाठीचे बरेच टप्पे आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व जनतेने ही लस घेणे आवश्यक आहे. 

मात्र या गावांमधून आवश्यक तो प्रतिसाद जनतेकडून मिळत नाही. आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्केच लोकांनी ही लस घेतली आहे. ही लस माकडताप निवारणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही लस सर्व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन शेखर सिंह यांनी यावेळी  केले.

आता जबाबदारी ग्रामपंचायतींची माकडताप या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यापुढे मृत माकड ग्रामपंचायत क्षेत्रात मिळाल्यास त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायतीची राहणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला  ५०० रुपये प्रति माकड मानधन देण्यात येणार आहे. तसेच मृत माकडासंदर्भातील  माहिती देणाºयास ५० रुपये देण्यात येणार आहेत. असे सांगतानाच जिल्ह्यात कुठेही मृत माकड सापडल्यास त्या संदर्भातील माहिती १०७७ या क्रमांकावर तत्काळ दूरध्वनीद्वारे द्यावी असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा विशेषत: दोडामार्ग आणि सावंतवाडी या तालुक्यांमधे प्रादुर्भाव आहे. मात्र त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात नाही. तरीही आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत असून जिल्ह्यात टॅमी फ्ल्यू या गोळ्या मोठ्या प्रमाणात असल्याचेही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.