शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

विलवडे कृषिसंपन्न गावातील आदर्श तरूण शेतकरी

By admin | Updated: August 30, 2015 22:53 IST

प्रमोद दळवींनी केली भाड्याच्या जमिनीत केळी लागवड

महेश चव्हाण-ओटवणे  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषिक्रांतीत अग्रेसर असणाऱ्या विलवडे गावाचा (ता. सावंतवाडी) कृषी इतिहास प्रख्यात आहे. अशा या कृषिसंपन्न गावातील प्रमोद राघोबा दळवी या तरुणाने शेतीचा नवा आलेख याठिकाणी उंचावला आहे. आपल्या तसेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीमध्ये केळीच्या तीन हजार रोपांची लागवड करून बेरोजगार तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कृषिसंपन्न विलवडे गावात भाजीपाल्याचे मळे हे येथील शेतकऱ्यांचे पारंपरिक आर्थिकतेचे साधन. वडिलोपार्जित मिळालेला हा मार्ग पत्करून स्थानिक शेतकरी आजही कुटुंबाची गुजराण करतात. शेतीतून उत्पादित झालेला भाजीपाला बांदा-सावंतवाडी या बाजारपेठेत विकून दैनंदिन रोजीरोटीचा मार्ग सुकर होतो. पण ज्या पध्दतीने या शेतीपिकाचे आर्थिकदृष्ट्या व्यवसायात रुपांतर व्हायला हवे, त्या पध्दतीने होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून बी. एस्सी. अ‍ॅग्रीकल्चरल (उद्यानविद्या) पदवीप्राप्त प्रमोद राघोबा दळवी यांनी केवळ रोजीरोटीपुरती शेती न करता शेतीचे व्यावसायिकीकरण करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या या भागामध्ये वातावरण उष्ण-दमट असल्याने या समन्वय स्थितीत केळीचे उत्पादन करण्याचा प्रयोग त्यांनी हाती घेतला. गोवा राज्यात त्याला मागणीही मोठी असल्याने त्यांना ही शेती फायदेशीर ठरत आहे. यासाठी त्यांनी ‘सावरबोणी’ या केळीच्या भाजीची निवड केली. प्रथम त्यांनी २००३ मध्ये अर्धा एकर जमिनीमध्ये या सावरबोणी केळीची प्रायोगिकतत्त्वावर लागवड केली. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याने आणि या भाजीच्या केळीला मागणीही भरपूर असल्याने अंतरा-अंतराने या केळीच्या लागवडीत वाढ करत यावर्षी त्यांनी तब्बल तीन हजार केळींची लागवड केली आहे. हे पीक आता उत्पन्नाच्या वाटेवर आले असून, येत्या काही दिवसांत त्याची तोडणी दिवसात केली जाणार आहे. या भाजी केळी उत्पादनासाठी जवळजवळ मालकीचे आणि भाडेतत्त्वातून सुमारे चार एकर क्षेत्र त्यांनी लागवडीखाली आणले आहे. प्रथम प्रायोगिकतत्त्वावर शेती करताना त्यांनी इन्सुली येथील शेतकऱ्यांकडून १०० बी विकत घेतले. त्यानंतर याच शेतीतून स्वत: बी काढून त्यावर कीटकनाशकांची योग्य प्रमाणात फवारणी करून लागवड करू लागले. आज जी तीन हजार रोपटी उभी आहेत, ती त्यांनीच काढलेली बियाणी आहेत. एकदा बी पाळे-मुळे काढल्यानंतर स्वच्छ करून जवळजवळ १४ ते १५ दिवसांनी त्याला अंकुर फुटतो. बी पुरल्यानंतर जमीन थोडी ओली राहील, हे दैनंदिन पाहावे लागते. विशेषकरून उन्हाळ्याच्या हंगामात लागवड केली. यावेळी जास्त पाणीसाठा वापरला तर केळीचे उत्पादन चांगले येऊ शकते, असे प्रमोद दळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले.