शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विलवडे कृषिसंपन्न गावातील आदर्श तरूण शेतकरी

By admin | Updated: August 30, 2015 22:53 IST

प्रमोद दळवींनी केली भाड्याच्या जमिनीत केळी लागवड

महेश चव्हाण-ओटवणे  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषिक्रांतीत अग्रेसर असणाऱ्या विलवडे गावाचा (ता. सावंतवाडी) कृषी इतिहास प्रख्यात आहे. अशा या कृषिसंपन्न गावातील प्रमोद राघोबा दळवी या तरुणाने शेतीचा नवा आलेख याठिकाणी उंचावला आहे. आपल्या तसेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीमध्ये केळीच्या तीन हजार रोपांची लागवड करून बेरोजगार तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कृषिसंपन्न विलवडे गावात भाजीपाल्याचे मळे हे येथील शेतकऱ्यांचे पारंपरिक आर्थिकतेचे साधन. वडिलोपार्जित मिळालेला हा मार्ग पत्करून स्थानिक शेतकरी आजही कुटुंबाची गुजराण करतात. शेतीतून उत्पादित झालेला भाजीपाला बांदा-सावंतवाडी या बाजारपेठेत विकून दैनंदिन रोजीरोटीचा मार्ग सुकर होतो. पण ज्या पध्दतीने या शेतीपिकाचे आर्थिकदृष्ट्या व्यवसायात रुपांतर व्हायला हवे, त्या पध्दतीने होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून बी. एस्सी. अ‍ॅग्रीकल्चरल (उद्यानविद्या) पदवीप्राप्त प्रमोद राघोबा दळवी यांनी केवळ रोजीरोटीपुरती शेती न करता शेतीचे व्यावसायिकीकरण करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या या भागामध्ये वातावरण उष्ण-दमट असल्याने या समन्वय स्थितीत केळीचे उत्पादन करण्याचा प्रयोग त्यांनी हाती घेतला. गोवा राज्यात त्याला मागणीही मोठी असल्याने त्यांना ही शेती फायदेशीर ठरत आहे. यासाठी त्यांनी ‘सावरबोणी’ या केळीच्या भाजीची निवड केली. प्रथम त्यांनी २००३ मध्ये अर्धा एकर जमिनीमध्ये या सावरबोणी केळीची प्रायोगिकतत्त्वावर लागवड केली. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याने आणि या भाजीच्या केळीला मागणीही भरपूर असल्याने अंतरा-अंतराने या केळीच्या लागवडीत वाढ करत यावर्षी त्यांनी तब्बल तीन हजार केळींची लागवड केली आहे. हे पीक आता उत्पन्नाच्या वाटेवर आले असून, येत्या काही दिवसांत त्याची तोडणी दिवसात केली जाणार आहे. या भाजी केळी उत्पादनासाठी जवळजवळ मालकीचे आणि भाडेतत्त्वातून सुमारे चार एकर क्षेत्र त्यांनी लागवडीखाली आणले आहे. प्रथम प्रायोगिकतत्त्वावर शेती करताना त्यांनी इन्सुली येथील शेतकऱ्यांकडून १०० बी विकत घेतले. त्यानंतर याच शेतीतून स्वत: बी काढून त्यावर कीटकनाशकांची योग्य प्रमाणात फवारणी करून लागवड करू लागले. आज जी तीन हजार रोपटी उभी आहेत, ती त्यांनीच काढलेली बियाणी आहेत. एकदा बी पाळे-मुळे काढल्यानंतर स्वच्छ करून जवळजवळ १४ ते १५ दिवसांनी त्याला अंकुर फुटतो. बी पुरल्यानंतर जमीन थोडी ओली राहील, हे दैनंदिन पाहावे लागते. विशेषकरून उन्हाळ्याच्या हंगामात लागवड केली. यावेळी जास्त पाणीसाठा वापरला तर केळीचे उत्पादन चांगले येऊ शकते, असे प्रमोद दळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले.