शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा उमेदवार मीच ठरविणार :राणे

By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST

सावंतवाडी मतदारसंघ : राजन तेलींवर अप्रत्यक्ष टीकe

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातूून राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला द्यायची, ते मीच ठरविणार आणि त्याला निवडून आणण्याची हमीही मीच घेणार आहे. त्यामुळे कोणीही तिकिटासाठी गद्दारी करून गेल्यास त्याला उद्दिष्ट साध्य करता येणार नाही, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता उद्योगमंत्री नारायण राणे यांनी हाणला. ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर त्यांनी पहिला राजीनामा द्यावा, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केल्यानंतर ते आज, गुरुवारी सिंधुदुर्गमध्ये आले. त्यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, संजू परब, मनीष दळवी, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश कवठणकर, विशाल परब, आदी उपस्थित होते.यावेळी उद्योगमंत्री राणे म्हणाले, पक्षाचा आग्रह आहे की, मी आणि नितेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी. त्यामुळे आम्ही दोघेही निवडणूक लढविणार आहोत. / पान ७ वरइको-सेन्सिटिव्ह शिवसेनेलाच हवा होताइको-सेन्सिटिव्हची मागणी शिवसेनेनेच केली होती आणि आता अधिस्थगन उठल्यावर शिवसेनाच त्याचे श्रेय घेत आहे, असा आरोप करताना राणे म्हणाले, आम्ही आतापर्यंत पाठपुरावा केल्यामुळेच हे अधिस्थगन उठले आहे. त्यामुळे याचे श्रेय शिवसेनेने घेऊ नये. सूर्याजी पिसाळांना मीच अन्नपाण्याला लावलेकोण कुठून उभा राहणार, याचे ज्याचे त्याने ठरवावे; पण निवडणूक लढवत असताना त्याने काँग्रेसचा पहिला राजीनामा द्यावा आणि मगच निवडणूक लढवावी. या सूर्याजी पिसाळांना मीच अन्नपाण्याला लावले. माझ्या जीवावर बंगले बांधून आता गद्दारी करतात, त्यांना करू देत. या सूर्याजी पिसाळांवर माझे बारीक लक्ष आहे, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी राजन तेली यांचे नाव न घेता केली.उमेदवारी मिळाली असे समजू नकाराजन तेलींनी काल, बुधवारी सावंतवाडी मतदारसंघातून उभे राहण्याची घोषणा केली. याबाबत राणेंना विचारले असता राणे म्हणाले की, राष्ट्रवादीचा उमेदवार मीच ठरवणार आहे. त्यामुळे कोणी सांगत असेल मला राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार, तर त्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात, अर्ज करावा लागतो. त्यानंतर मुलाखती होतात. नंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेतला जातो. त्यामुळे आज पक्षात गेल्यावर उद्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल, असे कोणीही समजू नये.