शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

राष्ट्रवादीचा उमेदवार मीच ठरविणार :राणे

By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST

सावंतवाडी मतदारसंघ : राजन तेलींवर अप्रत्यक्ष टीकe

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातूून राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला द्यायची, ते मीच ठरविणार आणि त्याला निवडून आणण्याची हमीही मीच घेणार आहे. त्यामुळे कोणीही तिकिटासाठी गद्दारी करून गेल्यास त्याला उद्दिष्ट साध्य करता येणार नाही, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता उद्योगमंत्री नारायण राणे यांनी हाणला. ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर त्यांनी पहिला राजीनामा द्यावा, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केल्यानंतर ते आज, गुरुवारी सिंधुदुर्गमध्ये आले. त्यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, संजू परब, मनीष दळवी, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश कवठणकर, विशाल परब, आदी उपस्थित होते.यावेळी उद्योगमंत्री राणे म्हणाले, पक्षाचा आग्रह आहे की, मी आणि नितेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी. त्यामुळे आम्ही दोघेही निवडणूक लढविणार आहोत. / पान ७ वरइको-सेन्सिटिव्ह शिवसेनेलाच हवा होताइको-सेन्सिटिव्हची मागणी शिवसेनेनेच केली होती आणि आता अधिस्थगन उठल्यावर शिवसेनाच त्याचे श्रेय घेत आहे, असा आरोप करताना राणे म्हणाले, आम्ही आतापर्यंत पाठपुरावा केल्यामुळेच हे अधिस्थगन उठले आहे. त्यामुळे याचे श्रेय शिवसेनेने घेऊ नये. सूर्याजी पिसाळांना मीच अन्नपाण्याला लावलेकोण कुठून उभा राहणार, याचे ज्याचे त्याने ठरवावे; पण निवडणूक लढवत असताना त्याने काँग्रेसचा पहिला राजीनामा द्यावा आणि मगच निवडणूक लढवावी. या सूर्याजी पिसाळांना मीच अन्नपाण्याला लावले. माझ्या जीवावर बंगले बांधून आता गद्दारी करतात, त्यांना करू देत. या सूर्याजी पिसाळांवर माझे बारीक लक्ष आहे, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी राजन तेली यांचे नाव न घेता केली.उमेदवारी मिळाली असे समजू नकाराजन तेलींनी काल, बुधवारी सावंतवाडी मतदारसंघातून उभे राहण्याची घोषणा केली. याबाबत राणेंना विचारले असता राणे म्हणाले की, राष्ट्रवादीचा उमेदवार मीच ठरवणार आहे. त्यामुळे कोणी सांगत असेल मला राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार, तर त्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात, अर्ज करावा लागतो. त्यानंतर मुलाखती होतात. नंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेतला जातो. त्यामुळे आज पक्षात गेल्यावर उद्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल, असे कोणीही समजू नये.