शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

समुद्रात चक्रीवादळाचा इशारा

By admin | Updated: June 30, 2016 00:07 IST

सावधानता बाळगा : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. त्यातच प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने येत्या २४ तासांत अरबी समुद्रात चक्रीवादळाचा इशारा दिला असून, याबाबत रत्नागिरीतील जनतेने सावधानता व सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.हवामान केंद्राने दिलेल्या इशाऱ्यानुसार, समुद्रात वायव्येकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, पोरबंदर-गुजरातच्या पश्चिमेकडे व मसिराह-ओमानच्या पूर्वेकडे चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ही चक्रीवादळ स्थिती दक्षिणेच्या दिशेने ५ किलोमीटर प्रतितास वेगाने सरकत आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत अरबी समुद्र किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, जिल्ह्यात गेल्या शुक्रवारपासून पावसाने संततधार धरली आहे. त्यामुळे नदीनाले भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे बुधवारी एका घराच्या पडवीवर दरड कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये घरातील चारजण जखमी झाले. या घटनेनंतर रत्नागिरी तहसीलदार मच्छींद्र सुकटे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व मदत कार्य सुरू करण्यात आले. यावेळी दरडीत अडकलेल्या एका महिलेला वाचवण्यात आले. दापोली-नवानगर येथे घराचे अंशत: १२,६०० रुपये एवढे नुकसान झाले व अंगणवाडीचे ३ लाख २५ हजारांचे नुकसान झाले. पाडले येथेही (पान ७ वर) एका घराचे अंशत: २२,३०० रुपयाचे नुकसान झाले. उटंबर येथे गोठ्याचे ५७ हजार ५०० रुपयाचे नुकसान झाले. संगमेश्वर-कसबा येथे वडाचे झाड गणेश मंदिरावर कोसळून १ लाख ८० हजार १०० रुपयाचे नुकसान झाले, तर एका घराचे ५ हजारांचे नुकसान झाले. देवरुख येथील पार्वती पॅलेसजवळ आंब्याचे झाड कोसळले मात्र, अन्य कोणतीही हानी झाली नाही. रत्नागिरी-पेठकिल्ला येथे वनिता वासुदेव सुर्वे यांच्या घरावर दरड कोसळली. तेलीआळी येथे नारळाचे झाड कोसळून वीज वाहक तार तुटली तर शिवाजीनगर-रत्नागिरी येथे मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक दोन ते तीन तास एका बाजूने करावी लागली. झाड तोडून नंतर मार्ग मोकळा करण्यात आला. दरम्यान, पावसाने बुधवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली.