शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
4
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
5
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
6
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
7
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
8
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
9
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
10
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
11
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
12
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
13
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
14
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
15
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
16
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
17
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
18
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
19
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
20
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

शेकडो हात सरसावले---चिपळुणातही स्वच्छता मोहीम

By admin | Updated: November 16, 2014 23:55 IST

धर्माधिकारी प्रतिष्ठान : शिस्तबध्द, प्रामाणिक मोहिमेचे कौतुक

रत्नागिरी : देशभरात सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ मोहिमेंतर्गत रत्नागिरी शहरातही ‘स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी’ मोहीम १४ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आज (रविवार) नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अडीच हजार अनुयायांनी संपूर्ण शहरात अप्रतिम स्वच्छता मोहीम राबविली. शहरातील प्रत्येक गल्ली-गल्लीत जाऊन या प्रतिष्ठानच्या अनुयायांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या व प्रामाणिकपणे स्वच्छता मोहीम राबविली. त्यात कोठेही दिखावूपणा नव्हता, अशा प्रतिक्रिया रत्नागिरीवासियांतून व्यक्त करण्यात आल्या. सकाळी ७ वाजल्यापासून या मोहिमेला प्रतिष्ठानच्या अनुयायांनी प्रारंभ केला. त्यांनी संकलित केलेला कचरा घेण्यासाठी पालिकेच्या कचरा गाड्या कार्यरत होत्या. शहरातील साळवी स्टॉप ते मिरकरवाडापर्यंत मुख्य रस्त्याची संपूर्ण झाडलोट करण्यात आली. गटाराच्या बाजूला साचलेला कचरा, पिशव्या, डबरही गोणपाटात भरून तो कचरा गाड्यांमध्ये ओतला जात होता. प्रतिष्ठानच्या अनुयायांनी वेगवेगळे गट केले होते. या कार्यकर्त्यांची शिस्तबध्दता हा शहरवासियात चचेचा विषय होता. शहराच्या मुख्य रस्त्याबरोबरच शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांच्या बाजुलाही असलेला मोठ्या प्रमाणातील कचरा, डबर तसेच वाढलेली झुडुपेही तोडून प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ केला. पालिकेचे सफाई कामगारही त्यांना सहकार्य करीत होते. (प्रतिनिधी)चिपळुणातही स्वच्छता मोहीमचिपळूण : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे व नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्याने आज रविवारी चिपळूण शहर व परिसराची स्वच्छता करण्यात आली. वर्षानुवर्षे वाशिष्ठी नदीकिनारी साचलेला गाळ व कचरा या मोहिमेअंतर्गत जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात आला. रविवारी सकाळी ७ वाजता बहादूरशेख नाका येथून या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. गांधीनगर, बहादूरशेख नाका, खेर्डी, गुहागर बायपास, भोगाळे, चिंचनाका, मार्कंडी, बाजारपेठ, तलाठी कार्यालय, खेंड, पेठमाप, उक्ताड, विश्रामगृह ते हायवे दुतर्फा रस्त्याचीही स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेचे वैशिष्ठ्य म्हणजे वर्षानुवर्ष वाशिष्ठी नदीत साचलेला गाळ व कचरा जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आला. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, आगवे, अलोरे, सती, कापसाळ, पाचाड येथील कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेवून शहर व परिसर स्वच्छ केला. वाशिष्ठी नदीतील गाळ अंदाजे ७० हून अधिक डंपर भरुन उचलण्यात आला. त्यामुळे नदी परिसर स्वच्छ होण्यास मदत झाली आहे. मुख्याधिकारी प्रकाश पाटील, सीमा चव्हाण, नगरसेवक इनायत मुकादम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, प्रताप शिंदे, आरोग्य निरीक्षक अनंत हळदे, अशोक साठे यांनीही या मोहिमेत सहभाग दर्शविला आज रविवारी सुट्टीचा दिवस असताना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहकार्य केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाभर राबविण्यात येत आहे. शहरामध्ये ३० जणांचा एक गट तयार करण्यात आला होता. या गटाच्या माध्यमातून परिसरातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. (वार्ताहर)