शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बेकायदा मद्य रोखणार कसे?

By admin | Updated: January 9, 2016 00:36 IST

रत्नागिरी : उत्पादन शुल्क विभागाकडील पन्नास टक्के पदे रिक्तच...

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी बेकायदा मद्य वाहतूक रोखण्याचे मोठे आव्हान उत्पादन शुल्क विभागापुढे आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा उत्पादन शुल्क विभागात मंजूर पदांपैकी निम्मी पदे बऱ्याच काळापासून रिक्त आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ६५ ते ७० टक्केपर्यंत पदे रिक्त आहेत. त्यामुळे महामार्गावरून व अन्य मार्गावरून होणाऱ्या बेकायदा मद्य वाहतुकीला रोखण्याचे मोठे आव्हान या अपुऱ्या यंत्रणेवर आहे. रत्नागिरी जिल्हा उत्पादन शुल्क विभागात गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी संख्या कमी आहे. सध्या या विभागात एक उपविभागीय पोलीस अधिकारीपद रिक्त आहे. निरीक्षकांची सहा पदे मंजूर असून, त्यातील चार पदे अद्याप रिक्त आहेत. केवळ दोन निरीक्षकांना अतिरिक्त काम पाहावे लागत आहे. उपनिरीक्षकांची १३ पदे मंजूर असून, त्यातील ८ पदे रिक्त आहेत. ५ उपनिरीक्षक कार्यरत आहेत. कॉन्स्टेबल्सची ५० टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. १९ पदे मंजूर असून, केवळ ८ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. ११ पदे रिक्त आहेत. वाहनचालकांच्या ७ मंजूर पदांपैकी ३ पदे रिक्त आहेत. ४ वाहनचालक उपलब्ध आहेत. ८ मंजूर लिपिकांपैकी केवळ ३ कार्यरत आहेत. ५ पदे रिक्त आहेत. कार्यालय अधीक्षक, लेखापाल व लघुटंकलेखकाचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे. मंजूर दोन वरिष्ठ लिपिकांमधील एक पद रिक्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उत्पादन शुल्क विभागाकडे मंजूर पदांपैकी केवळ ३० टक्के कर्मचारीच उपलब्ध आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर बेकायदा मद्याची वाहतूक होत असल्याचे रत्नागिरी विभागाने केलेल्या धडक कारवाईत उघड झाले आहे. त्याशिवाय गावठी दारुच्या भट्ट्याही या विभागाने गेल्या दोन वर्षांच्या काळात वारंवार उध्वस्त केल्या आहेत. अनेकांवर कारवाई केली आहे. बेकायदा मद्याची वाहतूक रोखण्यात अपुरे कर्मचारी असतानाही रत्नागिरी विभागाने चांगली कामगिरी केली आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरली गेल्यास महामार्गावरील बेकायदा मद्य वाहतुकीचे जाळे उद्ध्वस्त करणे शक्य होईल व शासनाच्या महसुलातही वाढ होईल. त्यामुळे रिक्त पदे भरून उत्पादन शुल्क विभाग अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे. सिंधुदुर्ग : सत्तर टक्के पदे रिक्त असल्याने कारवाई ठप्प...रत्नागिरी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अधीक्षक संतोष झगडे यांनी महामार्गावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे गोवा व अन्य ठिकाणाहून छुप्या पध्दतीने होणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक रोखण्यात रत्नागिरी विभागाला गेल्या दोन वर्षात मोठे यश प्राप्त झाले आहे. केवळ महामार्गावरच नव्हे; तर कोकण रेल्वेच्या रो रो सेवेद्वारे जाणाऱ्या वाहनांमध्येही बेकायदा मद्याची वाहतूक पकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशी बेकायदा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर अधिक कारवाई होण्यासाठी रत्नागिरी विभागातील रिक्त पदे भरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.