शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

साडेसात वर्षे सत्तेत असताना प्रकल्प बाहेर कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 4, 2024 23:08 IST

कणकवलीत नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ‘मनसे’ची पहिलीच प्रचारसभा

महेश सरनाईक/सुधीर राणे -कणकवली (सिंधुदुर्ग) : भाजपाने अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवले असते तर त्यांच्या विरोधात ते बोलले असते काय? त्यांच्याकडून खुर्ची हिरावून घेतली म्हणून त्यांच्या बुडाला आग लागली. भाजपवाले म्हणे गुजरातला उद्योग नेत आहेत. मात्र, साडेसात वर्षे उद्धव ठाकरे सत्तेत होते. तेव्हा त्यांनी भाजपला विरोध का केला नाही? कोकणात उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी उद्योग का आणले नाहीत, असा हल्लाबोल ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवली येथील प्रचारसभेत केला.‘महायुती’चे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर शनिवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उमेदवार नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार नितेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार राजू पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

केवळ तोडपाणीसाठी विरोधराज ठाकरे म्हणाले, भाभा रिसर्च सेंटर मुंबईत आहे. तिथे कधी स्फोट झाल्याचे ऐकिवात नाही. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी बारसुला हा प्रकल्प करण्यास संमती दर्शविली. तिथे पाच हजार एकर जमीन कशी उपलब्ध झाली? आधीच यांच्या लोकांनी तिथे जमिनी घेऊन ठेवल्या होत्या. यामागे खासदार विनायक राऊत यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.

कोकण रेल्वेच्या वेळी दलाल नव्हतेते म्हणाले, कोकण रेल्वे याच कोकणातून गेली. ही रेल्वे होताना आजच्यासारखे जमिनीचे दलाल येथे नव्हते. त्यामुळे त्यावेळी विरोध झाला नाही. गोव्यात सगळे जण फिरायला जातात. गोव्यात जे बीचवर दिसते ते कोकणात दिसले तर आमची संस्कृती खराब होते, अशी बोंब मारली जाते. मात्र, दोन वेळचे जेवण देऊ शकत नाही, ती संस्कृती काय कामाची? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

ॲमेझॉन नंतर कोकण जगातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रदेशते म्हणाले, ॲमेझॉन नंतर जगातील दोन नंबरचा प्रदेश कोकण आहे. येथे हॉटेल इंडस्ट्री व इंग्लिश स्पिकिंग कोर्स आणले तर कोकण विकास निश्चितच होईल. केवळ ६ महिने मुख्यमंत्री असताना नारायण राणेंनी झपाटल्यासारखी विकासकामे केली. जर पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाले असते तर आज राणेंच्या प्रचाराची गरजच नव्हती. महाराष्ट्रात ९ भारतरत्न आहेत, त्यातील ७ भारतरत्न हे कोकणातील आहेत. कोकणी जनता ही सुजाण आणि सुज्ञ आहे.

मोदींना पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रातील पहिलीच सभा

मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर माझी ही पहिलीच जाहीर सभा आहे. मी सरळ चालणारा आहे. मला एखादी गोष्ट नाही पटली तर त्याला विरोध करतो. २०१४, २०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या काही गोष्टी मला नाही पटल्या. त्या आजही नाही पटत. मात्र, आज विकासाच्या मुद्द्यांवर मोदींना मी पाठिंबा दिला आहे. काश्मीरमधील रद्द केलेले ३७० कलम, अयोध्येत कारसेवकांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आले, त्यांची प्रेते शरयू नदीत फेकण्यात आली. तेव्हापासून राम मंदिर प्रश्न भिजत पडला होता. आता नरेंद्र मोदींचे सरकार असताना न्यायालयाकडून राम मंदिर बांधण्याची परवानगी मिळाली आहे.चौकट

२० वर्षांनंतर राणे, ठाकरे एकाच व्यासपीठावर!लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवलीत शनिवारी घेतली. या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे व नारायण राणे तब्बल २४ वर्षांनंतर प्रथमच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यामुळे ते नेमके काय बोलणार, याबाबत अनेकांना उत्सुकता होती. नारायण राणे आणि राज ठाकरे या दोघांनीही एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Raj Thackerayराज ठाकरेNarayan Raneनारायण राणे Kankavliकणकवली