शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नैतिकता जपणे तरूणाईच्या हाती : राहुल सोलापूरकर,  रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:52 IST

शिक्षणातून सुसंस्कृतपणा येतो तर नैतिकता पालकांकडून शिकवली जाते. नैतिकता जपणे तरूणाईच्या हातात आहे. तरूणांनी आपले आई-वडील, शिक्षकांबरोबरच राष्ट्राप्रति कृतज्ञ असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

ठळक मुद्देनैतिकता जपणे तरूणाईच्या हाती : राहुल सोलापूरकर रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे गुणवंतांचा सत्कार

रत्नागिरी : शिक्षणातून सुसंस्कृतपणा येतो तर नैतिकता पालकांकडून शिकवली जाते. नैतिकता जपणे तरूणाईच्या हातात आहे. तरूणांनी आपले आई-वडील, शिक्षकांबरोबरच राष्ट्राप्रति कृतज्ञ असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.रत्नागिरी नगरपालिकेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करियर मार्गदर्शन कार्यक्रमात सोलापूरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपनगराध्यक्षा स्मीतल पावसकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.जे मनापासून करावंस वाटतं ते करियर करावं. छंद व व्यवसाय एक झाले तरच गुणवत्ता दाखवू शकतात. बुध्द्यांकाचा संबंध कोठेही नसतो. त्यावर जगातील बुध्दिमान व्यक्ती ठरत नाही. त्यासाठी भावनात्मक वाढ गरजेची असते. अनेक पालक आपली स्वप्न मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, तसं न करता त्यांच्या स्वप्नांना दिशा दाखविणे गरजेचे आहे. विचाराची कवाडे खुली ठेवत असताना कुतूहल देखील कायम जागृत ठेवण्याची सूचना सोलापूरकर यांनी यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनगराध्यक्षा स्मीतल पावसकर यांनी केले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी मनोगत व्यक्त करताना अडचणी दूर करून प्रयत्न करायला शिकवणारे शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आमदार उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना लोकमान्यांची जयंती साजरी करीत असताना, त्यांचे विचार वर्षभरात किती लोकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो ते महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

राहुल सोलापूरकर यांच्या मदतीने राज्यात शाळाशाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करून विवेकानंद, टिळक, सावरकरांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी शिष्यवृत्ती, दहावी, बारावी, तसेच विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी