शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी बसस्थानकातील हिरकणी

By admin | Updated: December 16, 2014 23:42 IST

कक्षाला कुलूप; महिलांची गैरसोय

पंचायत समितीची बैठक : रोहिणी गावडे यांनी लक्ष वेधलेसावंतवाडी : तालुक्यातील एसटी बसस्थानकातील हिरकणी कक्षाला नेहमी कुलूप असल्याने गावातून येणाऱ्या महिलांची गैरसोय होत आहे. हिरकणी कक्ष शोभेसाठी बांधला आहे का? असा सवाल पंचायत समिती सदस्या रोहिणी गावडे यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत केला. हिरकणी कक्षाचा लाभ महिलांना मिळण्यासाठी त्याठिकाणी तसा फलक लावून कक्षाच्या चाव्यांचीही उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी गावडे यांनी सभेत केली. बैठक सभापती प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपसभापती महेश सारंग, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, माजी सभापती प्रियांका गावडे, सदस्य विनायक दळवी, लाडोबा केरकर, अशोक दळवी, सुनयना कासकर, श्वेता कोरगावकर, रोहिणी गावडे, गौरी आरोंदेकर उपस्थित होते. ग्रामपंचायतीमधील विविध कामांना मंजुरी मिळून निधी प्राप्त होतो. परंतु ग्रामपंचायत वेळीच कागदपत्रांची पूर्तता करीत नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना कामाच्या निष्काळजीपणासंदर्भात नोटिसा बजाविण्यात येणार असल्याचा ठराव सभापतींनी घेतला. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत वर्षभर अंगणवाडीतील मुलांच्या आहाराकरिता सरासरी धान्यपुरवठा केला गेला नाही. तर दुसरीकडे कुपोषित मुलांना सुधारण्याकरिता शासन प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे. मुलांना जर वेळीच पोषण आहार दिल्यास कुपोषणमुक्त अभियान राबविण्याची आवश्यकताच भासणार नाही, असे पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर यांनी सुनावले. तसेच यातील कार्यरत अंगणवाडी सेविकांचे आॅगस्टपासून मानधनही बंद झाले आहे. त्यांच्या वेतनात वाढ होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशीही मागणी केली. पाणीटंचाई आराखडा तयार करतेवेळी जुन्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन नवीन आराखडा तयार करावा, असा ठरावही घेण्यात आला. यामध्ये पाण्याच्या पाईप लाईनच्या दुरुस्तीचा जास्त समावेश असून याकडे गांभिर्याने लक्ष देण्याबाबत सर्वांचे एकमत झाले. बांदा परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा साठा फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे उत्पादनातही घट होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी तेरेखोल नदीवर इन्सुली ते बांदा यादरम्यान बंधारा बांधण्यात येईल. जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी पुरवठा होऊन शेतीच्या उत्पादनातही वाढ होईल, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. पावसाळ्यातील पुरामुळे आंबोली परिसरातील नुकसानी झालेल्या ग्रामस्थांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. ही रक्कम पूरग्रस्तांना लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी गावडे यांनी केली. निरवडे येथील शाळेची इमारत निर्लेखित करून पाडलेली आहे. परंतु नवीन इमारतीसाठी अजूनही निधी मंजूर झालेला नसल्याने मुलांना गैरसोय होत आहे. त्यामुळे निर्लेखित इमारतींचा निधी दोन महिन्यात जमा करून शाळेचे काम सुरू करावे, अशी मागणी माजी सभापतींनी केली. पंचायत समितीच्या बैठकीत मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात कोणत्याही सदस्यांना मिळत नाहीत. यापूर्वी प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात मिळत होती. त्यामुळे सभेत झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात पाठवावीत, अशी मागणी प्रियांका गावडे यांनी केली. (वार्ताहर)