शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

 महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात पण धुळीच्या त्रासाने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:01 IST

कणकवली शहर तसेच परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. तेथून वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. त्याचा वाहनचालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. तर सर्व्हिस रोडशेजारी गटार बांधकाम केले जात आहे. त्यामुळे मातीचे खोदकामही होत आहे. याचा परिणाम वातावरणावर होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात पण धुळीच्या त्रासाने नागरिक हैराणनागरिकांना करावा लागतो धुळीतून प्रवास; वाहनचालकांसाठी धोकादायक

कणकवली : कणकवली शहर तसेच परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. तेथून वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. त्याचा वाहनचालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. तर सर्व्हिस रोडशेजारी गटार बांधकाम केले जात आहे. त्यामुळे मातीचे खोदकामही होत आहे. याचा परिणाम वातावरणावर होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे.अनेकवेळा या धुळीमुळे अपघात होत आहेत. धुळीमुळे काहीवेळा वाहन चालकांना दिवसा वाहनांची लाईट चालू ठेवून प्रवास करावा लागतो. भरावाचे काम सुरू असताना धुरळा उडू नये, म्हणून ठेकेदार कंपनीकडून मातीवर पाणी मारणे गरजेचे आहे. काहीवेळा शहरात सर्व्हिस रस्त्यावर पाणी मारले जाते. पण त्यामुळे चिखल झाल्याने वाहने तसेच पादचारी घसरण्याचे प्रकार घडत आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यकती सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. तसेच लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महामार्गाच्या जवळ असलेले दुकान व घरांमध्ये धूळ उडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व व्यापारीही हैराण झाले आहेत. महामार्गाच्या दोन्ही सर्व्हिस रोडवरून गटाराचे काम सुरु असल्याने वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. धुळीमुळे वाहने सावकाश चालवावी लागत असल्याने अनेक नोकरदार व्यक्तींना कामावर वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.कणकवली शहरातील उडणाऱ्या धुरळ्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकतामुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरातील चौपदरीकरण कामामुळे प्रचंड धुरळा उडत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक बेजार झाले आहेत. धुरळ्यामुळे समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. ठेकेदाराने वेळीच या संदर्भात योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग