शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

कोकणातच अंधश्रध्देचे प्रमाण सर्वाधिक

By admin | Updated: January 23, 2015 00:47 IST

बाबामहाराज सातारकर : जिन्यावरील लिंबाच्या टाचण्या काढून अनेकवेळा सरबत प्यायलो

चिपळूण : इतर भागांपेक्षा कोकणात अंधश्रद्धा जास्त आहे. मूठ मारणे, लिंबू टाकणे, लिंबाला टाचण्या रोवणे असे अनेक प्रकार येथे जास्त आहेत. जिन्यावर टाकलेल्या लिंबाच्या टाचण्या काढून धुवून त्याचे आपण अनेकवेळा सरबत घेतले आहे. त्यामुळे आपली तब्बेत चांगली आहे, अशा शब्दात कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांनी अंधश्रध्देवर टीका केली. ते ‘लोकमत’शी बोलत होते. अंधश्रद्धा, अनिष्ट परंपरांच्या गोष्टींवर त्यांनी प्रहार करुन विविध उदाहरणातून पटवून दिले. वारकरी सांप्रदायाची परंपरा मोठी आहे. सामाजिक ऐक्य, बंधुभाव, समता, प्रेम, भक्तिभाव निर्माण होतो. यासाठी वारकरी संप्रदायात येऊन माळ घातली पाहिजे. आतापर्यंत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशातून ८ लाख माळकरी वारकरी संप्रदायात सहभागी केले आहेत. कोकणात वारकरी वाढणे गरजेचे आहे. कोकणातील माणूस मनाने चांगला व बुद्धिमान आहे. आपल्यातील सद्गुण ओळखून दुसऱ्यासाठी जगण्याची भावना मनात ठेवली पाहिजे. आपल्यातील शक्ती दुसऱ्याच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे. बाबामहाराज सातारकरांची १५० वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा असून, त्यांची ह. भ. प. चिन्मय स्वामी यांची सहावी पिढी कार्यरत आहे. पहिले कीर्तन वयाच्या १०व्या वर्षी केले. दरवर्षी ३०० ते ३२५ कीर्तने होतात. यावर्षी १०१वी दिंडी पंढरीला जाणार आहे. आपले दूरदर्शनसह अन्य खासगी वाहिन्यांवर कीर्तने, मुलाखती झाल्या आहेत. २०११ साली त्यांना श्री जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, वाराणसी येथे शंकराचार्यांकडून महाराष्ट्र भूमी भूषण कीर्तन चक्रवर्ती ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली. ५ फेब्रुवारी १९९४ रोजी दिल्ली येथे तिसऱ्या जागतिक मराठी परिषदेत माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अनेक महत्त्वपूर्ण २७ पुरस्कारांनी गौरविले असून, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधून त्यांची कीर्तने झाली आहेत. अमेरिका, इंग्लंडमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम झाले आहेत, असेही सातारकर यांनी सांगितले. लोणावळ्यापासून ८ किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र दुधिवरे येथे २२ एकर जागेत आध्यात्मिक केंद्र उभारले आहे. जय जय राम कृष्ण हरी या बीज मंत्रावर आधारित मंदिर आहे. राम पंचायतन, श्री विठ्ठल रुक्मिणी, राधाकृष्ण देवतांची स्थापना केली आहे. वारकरी तत्वज्ञानावर आधारित मंदिर आहे. या मंदिराची उंची ८१ फूट असून, कळसावर जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांची स्थापना केली आहे. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिरातील खांबावर एकनाथ भागवतामधील ओव्या कोरण्यात आल्या आहेत. संत मंडळींच्या निवासासाठी ६ खोल्यांचे संतनिवास व स्वयंपूर्ण ६५ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. दररोज ५०० लोकांना अन्नदान करण्यात येते. दरवर्षी २७ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत सप्ताह साजरा केला जातो. भजन, प्रवचन, कीर्तन असे कार्यक्रम होतात. सामाजिक प्रबोधनासाठी आपल्या ५७ आॅडिओ कॅसेटस्, १२ सीडीज तयार केल्या आहेत. मरगळलेल्या समाजाला वारकरी सांप्रदायातून भक्तीमार्गाला नेण्याचे कार्य आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितल (प्रतिनिधी)रामपूर - गुढे फाटा येथे अखंड हरिनामाच्या सप्ताहात हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांच्या तालबद्ध नाचण्यात संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो लोक यावेळी उपस्थित होते. बाबामहाराज सातारकरांचा कार्यक्रम दि. २२ ते २५ या कालावधीत लांजा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.