शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

corona virus-कणकवलीतील उपजिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 15:15 IST

कणकवली उपजिल्हा रूग्णालयात कोरोना व्हायरसबाबत खबरदारी म्हणून २० खाटा, व्हेंटीलेटर व अन्य सुविधा असलेला अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला आहे. परंतु , कोरोना व्हायरसबाबत नागरीकांनी दक्षता जरूर घ्यावी, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व कणकवली उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सहदेव पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले .

ठळक मुद्देकणकवलीतील उपजिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभाग सुरूनागरीकांनी कोरोनाचा धसका घेऊ नये : समीर नलावडे 

कणकवली : कणकवली उपजिल्हा रूग्णालयात कोरोना व्हायरसबाबत खबरदारी म्हणून २० खाटा, व्हेंटीलेटर व अन्य सुविधा असलेला अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला आहे. परंतु , कोरोना व्हायरसबाबत नागरीकांनी दक्षता जरूर घ्यावी, कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयाच्या माध्यमातून गैरसमज निर्माण करण्याचे काम काही जणांकडून होत आहे. मात्र, या व्हायरसबाबत सध्यातरी सिंधुदुर्गवासीयांनी धसका घेण्याची गरज नाही.  असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व कणकवली उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सहदेव पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले .कणकवली नगरपंचायत कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत समीर नलावडे व डॉ. सहदेव पाटील यांनी कोरोना व्हायरसबाबत आढावा घेतानाच कणकवलीत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.यावेळी समीर नलावडे म्हणाले, सोशल मिडीयावरील गैरसमजाला बळी पडू नका. कोरोना व्हायरसबाबत आम्ही जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार व उपजिल्हा रूग्णालय यांच्याशी संवाद साधत असून योग्य ती काळजी घेत आहोत. यामुळे या व्हायरसची भिती बाळगण्याचे कारण नाही.डॉ. सहदेव पाटील म्हणाले, सर्दी, खोकला, घशातील खवखव , ताप ही कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणे आहेत. श्वास कोंडणे, धाप लागणे आणि त्यानंतर न्युमोनिया होणे अशा प्रकारची लक्षणे कोराना व्हायरसमध्ये असून अशा रूग्णांनी गर्दीपासून लांब राहणे गरजेचे आहे.

कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी केएन-९५ व केएन- ९०, पीएम २.४, पीएम ५ यासारखे मास्क उपलब्ध आहेत. मात्र हे मास्क सर्वांनीच लावणे गरजेचे नाही. ज्यांचा कोरोना व्हायरसग्रस्त रूग्णांशी थेट संबंध येतो, अशा डॉक्टर, कर्मचारी, नातेवाईक त्याचप्रमाणे त्या रूग्णांची चौकशी करणाऱ्यांनी लावणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनीच मास्क वापरावे, हा केवळ गैरसमज असल्याचे सांगताना डॉ. पाटील म्हणाले, कोरोना व्हायरस टाळायचा असले तर ती व्यक्ती कोरोनाग्रस्त रूग्णापासून सहा फुटापेक्षा जास्त अंतर लांब असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे १० मिनिटापेक्षा जास्त वेळ अशा व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यास कोरोना होवू शकतो. मात्र चीनमध्ये ज्या प्रमाणात कोरोना फैलावत आहे. त्याला तेथील लोकांचे खाणे जबाबदार आहे.

वटवाघळाच्या माध्यमातून हा व्हायरस फैलावल्याचे सांगण्यात येते. मात्र भारतील वटवाघळांमध्ये याबाबतची लक्षणे आढळलेली नाहीत तरी कोरोनाचा फैलाव रोखायचा असेल तर विमानतळावर आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक असून त्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रूग्णांची पीसीआर तपासणी केली जात असून सिंधुदुर्गात अद्यापपर्यंतरी कोरोना लक्षणे असलेला रूग्ण आढळलेला नाही, असे डॉ. पाटील म्हणाले.चिकन, मटन, मच्छि या माध्यमातून कोरोना झाल्याचे ऐकिवात नाही़. आपल्याकडे चिकन, मटन हे चांगल्याप्रकारे शिजवून खाले जाते. त्यामुळे यातून लागन होण्याची शक्यता जवळपास नाहीच. त्यामुळे हाही गैरसमज नागरीकांनी दूर करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. 

टॅग्स :corona virusकोरोनाsindhudurgसिंधुदुर्ग