शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अधिकाऱ्यांकडून हायकोर्टाचे आदेश धाब्यावर, ५० आरायंत्रांना परवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 22:56 IST

परवानगी नसताना राज्यात ५० आरायंत्रांना परवाना : सिंधुदुर्गात ९ आरायंत्रे, परवाने रद्द करण्याचे केंद्राचे आदेश

सावंतवाडी : शासनाचे नियम धाब्यावर बसवून, आडव्या आरायंत्रांना परवानगी देऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्यात आल्याने वन विभागाचे अधिकारी चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, राज्यात नियम धाब्यावर बसवून ५० आडव्या आरायंत्रांना परवानगी देण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हयातील ९ आरायंत्रणांचा समावेश असून, सिंधुदुर्गचे तत्कालीन उपवनसंरक्षकांच्या शिफारशीने या आरायंत्रणांना परवानगी दिल्याचे आता पुढे आले आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर वनविभागातील वरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झाले असून, संबधित अधिकाऱ्यांवर दोन महिन्यात कारवाई करण्याचे आदेश  केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाच्या नागपूर एकात्मिक कार्यालयाचे मुख्य अधिकारी (भारतीय वनसेवा) व्ही एन अंबाडे यांनी दिले आहेत. तसेच आडव्या आरायंत्रांच्या परवानग्याही रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय वन विभागाची उच्चस्तरीय समितीची अकरावी बैठक २३ जुलै २०१८ ला पार पडली होती. या बैठकीत या ४२ इंचाच्या ५० आडव्या अतिरिक्त आरायंत्रांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर पुन्हा या समितीच्या बाराव्या बैठकीमध्ये या आरा यंत्रांना परवानगी देऊ नये अशा बाबतचा ठराव घेण्यात आला होता. मात्र उच्चस्तरीय समितीच्या १५ नोव्हेंबर २०१९ च्या पंधराव्या बैठकीत अकराव्या बैठकीत झालेला निर्णय कायम ठेवून या आरायंत्रांना परवानगी देण्याचा पुन्हा निर्णय घेण्यात आला होता. या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याबाबत फेरयाचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी उच्च न्यायालयाने संबंधित आरायंत्रांना दिलेल्या परवानग्या चुकीच्या असून त्यांचे परवाने रद्द करण्याबाबत योग्य ती पावले उचलावीत अशा प्रकारचे निर्देश दिले होते. मात्र काहि अधिकाºयांनी उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून चुकीच्या पध्दतीने परवानग्या दिल्या होत्या.

दरम्यान उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून राज्यात ५० आडव्या आरागिरण्यांना परवानगी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात जिल्हयातील ९ आरागिरण्यांचा समावेश असून, यामध्ये कुडाळ तालुक्यातील सात तर सावंतवाडी मधील दोन गिरण्यांचा समावेश आहे. या सर्व परवानग्या मागील वर्षातच देण्यात आल्या असून, यावेळी तत्कालीन सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक म्हणून समाधान चव्हाण कार्यरत होते. त्यांच्या शिफारशीमुळेच या गिरण्यांना परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.राज्य शासनाने २४ आॅगस्ट २०१९ ला प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला पत्र पाठवून त्यात ५० अतिरिक्त आडव्या आरायंत्रास दिलेली परवानगी चुकीची असेल तर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावे असे म्हटले होते. परंतु वन मुख्यालयाने केराची टोपली दाखवत चुकीची माहिती शासनाला देऊन दिशाभूल केल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली होती. सोळाव्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत आरायंत्रणांना दिलेले परवानेही चुकीच्या पद्धतीने असल्याचे निश्चित झाले होते. मात्र परवाने रद्द करणेबाबत प्रश्नचिन्ह होते. अखेर केंद्रीय पर्यावरण वन अधिकारी व्ही. एन. अंबाडे यांनी ३० आॅक्टोबरला दिलेल्या आदेशात संबंधित अतिरिक्त आरायंत्रणांना परवाने चुकीचे असून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन महिन्यात संबंधित वन अधिकाºयांवर कारवाई करून आरायंत्रांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.   सिंधुदुर्ग मधून जयंत बरेगार यांच्याकडून प्रकरणाला वाचा

वन अधिकाऱ्यांनी अतिरिक्त आरायत्रांना चुकीच्या पद्धतीने परवानगी दिली आहे. या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केले होते. बांदा येथील एका इको सेन्सिटिव्ह झोन मधील अतिरिक्त आरायंत्राचा समावेश असल्याचे बरेगार यांनी आपल्या तक्रारीतून निदर्शनास आणून दिले होते. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे खुद्द बरेगार यांनी सांगितले.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीHigh Courtउच्च न्यायालय