शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

कृमीदोष रक्तक्षय, कुपोषणाचे कारण

By admin | Updated: February 6, 2015 00:47 IST

संजय पोळ : मालवण येथे तालुकास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन

मालवण : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील किमान २४१ दशलक्ष बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतांमुळे होतो. जगात २८ टक्के बालकांना असा कृमी दोष आढळून येत असून वैयक्तिक व परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे कृमी दोषाचा प्रसार होत आहे. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच बालकांची बौद्धीक व शारीरिक वाढ खुंटण्यासही कारणीभूत ठरते, असे प्रतिपादन मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी बुधवारी येथील तालुका स्कूलमध्ये बोलताना केले.१० फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त १० तारीखला आरोग्य विभागाच्यावतीने एल्बडेझॉल या जंतनाशक गोळीचे सामूहिक वाटप ० ते १९ वयोगटातील व्यक्तींना करण्यात येणार आहे. यानिमित्त तालुका स्कूलमध्ये तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पोळ म्हणाले, भारतात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. भारतामध्ये ५ वर्षांखालील जवळजवळ ५० टक्के बालके वाढ खुंटलेली आहेत आणि साधारणत: ४३ टक्के बालके कमी वजनाची आहेत. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. तसेच शाळेतही उपस्थित राहू शकत नाहीत. याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली.यावेळी प्रास्ताविक करताना आरोग्य सहाय्यक सतीशकुमार उपाणेकर यांनी २० वर्षांपूर्वी जंतनाशक औषध उपलब्ध नव्हते. यावेळी कृमीदोषाचे प्रमाण भयानक होते. कुपोषण, रक्तक्षय तसेच पोट मोठे असणे, हातापायाच्या काड्या झालेली मुले जास्तीत जास्त दिसून येत होती. यानंतर शासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालवयातच कृमीदोष निर्मूलन करणाऱ्या गोळ्यांचे वाटप सुरु केले. त्यामुळे आता हे प्रमाण कमी झाले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी या मोहिमेसाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा तसेच आरोग्य कर्मचारी यांची भूमिका महत्वाची आहे. शिक्षकांनी या दिवशी शाळेतील उपस्थिती व एल्बेडेझॉल गोळी घेतल्याचा पुरावा म्हणून दोनवेळा खूण करावी असे सांगितले.यावेळी डॉ. पोळ यांनी स्क्रीनद्वारे कृमीदोषाचे वास्तव्य, उपचार व काळजी उपस्थितांसमोर मांडली. यावेळी गटशिक्षणाधिकारी डी. बी. मुळीक, तालुका आरोग्य अधिकारी सूरज बांगर, वैद्यकीय अधिकारी ए. डी. शिवशरण, बी. जे. पाटील, एस. एस. यादव, मुख्यसेविका एस. एस. गावडे, आर. आर. कदम, एस. एस. सामंत, एस. एस. मालंडकर, यु. पी. खोत यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)