शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कृमीदोष रक्तक्षय, कुपोषणाचे कारण

By admin | Updated: February 6, 2015 00:47 IST

संजय पोळ : मालवण येथे तालुकास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन

मालवण : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील किमान २४१ दशलक्ष बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतांमुळे होतो. जगात २८ टक्के बालकांना असा कृमी दोष आढळून येत असून वैयक्तिक व परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे कृमी दोषाचा प्रसार होत आहे. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच बालकांची बौद्धीक व शारीरिक वाढ खुंटण्यासही कारणीभूत ठरते, असे प्रतिपादन मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी बुधवारी येथील तालुका स्कूलमध्ये बोलताना केले.१० फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त १० तारीखला आरोग्य विभागाच्यावतीने एल्बडेझॉल या जंतनाशक गोळीचे सामूहिक वाटप ० ते १९ वयोगटातील व्यक्तींना करण्यात येणार आहे. यानिमित्त तालुका स्कूलमध्ये तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पोळ म्हणाले, भारतात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. भारतामध्ये ५ वर्षांखालील जवळजवळ ५० टक्के बालके वाढ खुंटलेली आहेत आणि साधारणत: ४३ टक्के बालके कमी वजनाची आहेत. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. तसेच शाळेतही उपस्थित राहू शकत नाहीत. याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली.यावेळी प्रास्ताविक करताना आरोग्य सहाय्यक सतीशकुमार उपाणेकर यांनी २० वर्षांपूर्वी जंतनाशक औषध उपलब्ध नव्हते. यावेळी कृमीदोषाचे प्रमाण भयानक होते. कुपोषण, रक्तक्षय तसेच पोट मोठे असणे, हातापायाच्या काड्या झालेली मुले जास्तीत जास्त दिसून येत होती. यानंतर शासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालवयातच कृमीदोष निर्मूलन करणाऱ्या गोळ्यांचे वाटप सुरु केले. त्यामुळे आता हे प्रमाण कमी झाले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी या मोहिमेसाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा तसेच आरोग्य कर्मचारी यांची भूमिका महत्वाची आहे. शिक्षकांनी या दिवशी शाळेतील उपस्थिती व एल्बेडेझॉल गोळी घेतल्याचा पुरावा म्हणून दोनवेळा खूण करावी असे सांगितले.यावेळी डॉ. पोळ यांनी स्क्रीनद्वारे कृमीदोषाचे वास्तव्य, उपचार व काळजी उपस्थितांसमोर मांडली. यावेळी गटशिक्षणाधिकारी डी. बी. मुळीक, तालुका आरोग्य अधिकारी सूरज बांगर, वैद्यकीय अधिकारी ए. डी. शिवशरण, बी. जे. पाटील, एस. एस. यादव, मुख्यसेविका एस. एस. गावडे, आर. आर. कदम, एस. एस. सामंत, एस. एस. मालंडकर, यु. पी. खोत यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)