शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

परतीच्या पावसानं दाणादाण; सिंधुदुर्गात भातपिकाचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 13:57 IST

मुसळधार पावसामुळे भाताचं प्रचंड मोठं नुकसान; शेतकरी चिंतातूर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले तीन दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसाने दाणादाण उडवली असून तालुक्यातील भात शेती आडवी झाल्याने हाता तोंडचा घास पाऊस हिरावून घेत असल्याने बळीराजा चिंतातुर बनला आहे. पावसाळी हंगाम संपला तरी गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भात शेती जमिनीवर आडवी झाली आहे. त्यामुळे आधीच कोरोनाच्या संकटाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आणखीन एक जोराचा फटका बसला आहे.यावर्षी कोरोनाचे संकट कोसळले असताना देखील शेतकऱ्यांनी पावसाळी शेती करणे सोडले नव्हते.प्रतिवर्षाप्रमाणे पारंपरिक तसेच संकरित बियाण्यांचा वापर करून शेतकऱ्यांनी मोठया उमेदीने भाताची लागवड केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी परतलेल्या चाकरमान्यांनी यावर्षी जोरदार भात शेती केली होती. मात्र, परतीच्या पावसाने त्या शेतीला जोरदार फटका दिला आहे. यावर्षीच्या हंगामात तर सर्वच ठिकाणी चांगली भात शेती बहरली होती. सध्या शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू असतानाच पावसाने जोर धरल्याने भात शेती आडवी झाली आहे.

बळीराजा चिंतातूरकाबाड कष्ट करून केलेल्या शेतीचा हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेत असल्याने येथील बळीराजा मात्र चिंतातूर बनला आहे.