शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘तो’ टँकर कणकवलीत पकडला

By admin | Updated: July 2, 2016 23:20 IST

करूळ घाटात घडली होती घटना : अपघातात राजापूर तालुक्यातील एक जखमी

वैभववाडी : करुळ घाटात ओमनीला धडकून पसार झालेला गुजरातचा टँकर कणकवली पोलिसांनी पकडला. या धडकेत राजापूर तालुक्यातील नानारचे हानिफ युसूफ साखरकर (वय ४५) किरकोळ जखमी झाले. ही घटना सकाळी ८.३0 च्या दरम्यान घडली असून टँकर चालक विकेशभाई शिवाजीभाई रठवा (वय ३३, रा. गुजरात) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हानिफ साखरकर ओमनीतून (क्रमांक -एम एच 0८ ; ए जी- 0६६३) करुळ घाटमार्गे कोल्हापूरला निघाले होते. दिंडवणेवाडी येथे गोव्याला जाणाऱ्या टँकरने (क्रमांक जी जे- 0६; ए टी- ४५७५) ओमनीला धडक दिली. त्यामुळे हानिफ साखरकर जखमी झाले. परंतु, जखमीची विचारपूस न करता चालक विकेशभाई रठवा टँकरसह अपघात स्थळावरुन पसार झाला. त्यामुळे जखमी अवस्थेत हानिफ यांनी टँकरचा पाठलाग केला. मात्र, टँकर गोव्याकडे सुसाट निघून गेल्यामुळे हानिफ यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. जखमी हानिफ याच्या माहितीवरुन वैभववाडी पोलिसांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर कणकवलीतील वाहतूक पोलिस प्रकाश गवस यांनी गोव्याकडे निघालेला टँकर अडविला. त्यानंतर दुपारी अडीचनंतर टँकर वैभववाडीत आणला. टँकर चालक विकेशभाई याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक उपनिरीक्षक बी. ए. कदम या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) पोलिसांची सारवासारव कशासाठी? ४ करुळ घाटात सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात ओमनीला धडक देऊन पसार झालेला टँकर करुळ तपासणी नाका आणि वैभववाडी पोलिस ठाण्यासमोरुन गेला. तो कणकवली शहरात पोलिसांनी अडविला. मात्र, मारहाणीच्या भीतीने टँकरचालक अपघात स्थळावरुन पळाला. पोलिस ठाणे माहीत नसल्याने पुढे गेला. अशी सारवासारव पोलिसांकडून केली जात आहे. ही सारवासारव कशासाठी? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.