शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

महागाईमुळे सिंधुदुर्गातील जनता हवालदिल:राजू मसुरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 19:48 IST

काँग्रेसने राज्यात गोरगरीब जनतेच्या फायद्याच्या अनेक योजना आणल्या आहेत. मात्र त्याउलट आताच्या भाजप सरकारच्या काळात महागाई आणि जनतेला हवालदिल करणाºया निर्णयांमुळे जनता या सरकारला कंटाळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसकडून नेहमीच सर्वसामान्यांचा विचारसिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल

सावंतवाडी : काँग्रेसने राज्यात गोरगरीब जनतेच्या फायद्याच्या अनेक योजना आणल्या आहेत. मात्र त्याउलट आताच्या भाजप सरकारच्या काळात महागाई आणि जनतेला हवालदिल करणाºया निर्णयांमुळे जनता या सरकारला कंटाळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस पक्षाची स्थापना १२५ वर्षांपूर्वी अनेक स्वातंत्र्यवीर तसेच महात्मा गांधींच्या त्यागातून झाली आहे. तसेच पक्षाने लोकहिताची अनेक विकासकामे केली असून राजीव गांधी जीवनदायी योजना, मोफत १०८ रुग्णवाहिका अशा महत्त्वपूर्ण योजना काँग्रेसच्या काळात सुरू करण्यात आल्या आहेत.

राजीव गांधी निराधार योेजनेपासून ते महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळवून देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा त्याचप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंत गणवेश व मोफत पुस्तके, पोषण आहार देण्याचे काम, शेतकºयांना शेतकरी जनता अपघात विमा योजना काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे.

समाजातील सर्व जातीच्या व्यक्तींना तसेच महिलांना नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीत ५० टक्के आरक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण धोरण राजीव गांधी यांच्या काळापासून सुरू झाले. त्यामुळे समाजात आज महिला मानाने फिरत आहेत.

याउलट युती सरकारच्या काळात अच्छे दिन आणणाºया सरकारकडून भरमसाट महागाई, पेट्रोल दरवाढ, नोटाबंदीमुळे बाजारपेठेवर झालेला आर्थिक परिणाम यामुळे जनता कंटाळली आहे. जीएसटीचा दर १८ टक्केपर्यंत काँग्रेस राजवटीच्या काळात ठरलेला होता. तो आता २८ ते ३५ टक्केपर्यंत झाला आहे. त्यामुळे अशा पक्षाच्या उमेदवारांना जनता या निवडणुकीत नाकारल्याशिवाय राहणार नाही, असेही राजू मसुरकर यांनी म्हटले आहे.