शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

महागाईमुळे सिंधुदुर्गातील जनता हवालदिल:राजू मसुरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 19:48 IST

काँग्रेसने राज्यात गोरगरीब जनतेच्या फायद्याच्या अनेक योजना आणल्या आहेत. मात्र त्याउलट आताच्या भाजप सरकारच्या काळात महागाई आणि जनतेला हवालदिल करणाºया निर्णयांमुळे जनता या सरकारला कंटाळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसकडून नेहमीच सर्वसामान्यांचा विचारसिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल

सावंतवाडी : काँग्रेसने राज्यात गोरगरीब जनतेच्या फायद्याच्या अनेक योजना आणल्या आहेत. मात्र त्याउलट आताच्या भाजप सरकारच्या काळात महागाई आणि जनतेला हवालदिल करणाºया निर्णयांमुळे जनता या सरकारला कंटाळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस पक्षाची स्थापना १२५ वर्षांपूर्वी अनेक स्वातंत्र्यवीर तसेच महात्मा गांधींच्या त्यागातून झाली आहे. तसेच पक्षाने लोकहिताची अनेक विकासकामे केली असून राजीव गांधी जीवनदायी योजना, मोफत १०८ रुग्णवाहिका अशा महत्त्वपूर्ण योजना काँग्रेसच्या काळात सुरू करण्यात आल्या आहेत.

राजीव गांधी निराधार योेजनेपासून ते महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळवून देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा त्याचप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंत गणवेश व मोफत पुस्तके, पोषण आहार देण्याचे काम, शेतकºयांना शेतकरी जनता अपघात विमा योजना काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे.

समाजातील सर्व जातीच्या व्यक्तींना तसेच महिलांना नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीत ५० टक्के आरक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण धोरण राजीव गांधी यांच्या काळापासून सुरू झाले. त्यामुळे समाजात आज महिला मानाने फिरत आहेत.

याउलट युती सरकारच्या काळात अच्छे दिन आणणाºया सरकारकडून भरमसाट महागाई, पेट्रोल दरवाढ, नोटाबंदीमुळे बाजारपेठेवर झालेला आर्थिक परिणाम यामुळे जनता कंटाळली आहे. जीएसटीचा दर १८ टक्केपर्यंत काँग्रेस राजवटीच्या काळात ठरलेला होता. तो आता २८ ते ३५ टक्केपर्यंत झाला आहे. त्यामुळे अशा पक्षाच्या उमेदवारांना जनता या निवडणुकीत नाकारल्याशिवाय राहणार नाही, असेही राजू मसुरकर यांनी म्हटले आहे.