शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हापूसला साडेसाती!

By admin | Updated: February 15, 2016 23:55 IST

बागायतदार चिंतेत : गारठा वाढल्याने फळांची गळ सुरु

रत्नागिरी : हवामानात अचानक गारठा वाढल्यामुळे हापूसची साडेसाती वाढली आहे. थंडीमुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मोहोर येत असल्यामुळे फळांची गळ वाढली आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.गेले दोन दिवस मळभी वातावरण असल्यामुळे मोहोरावर कीड, भुरी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे पुनर्मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुनर्मोहोरामुळे आधीच्या मोहोरावर परिणाम होत आहे. शिवाय मोहोराला लागलेली फळे थंडीमुळे गळत आहेत. ही फळे वाचवण्यासाठी तसेच मोहोराचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. दरम्यान, सध्या नव्याने येणाऱ्या मोहोरास फळधारणा अल्प आहे. हा आंबा मे मध्ये तयार होणार आहे, त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडले आहेत.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. लवकर पीक येण्यासाठी वापरलेल्या कृषी संजीवकांमुळे पावसाअभावी सुरुवातीला आलेल्या मोहोरावर कोणताही परिणाम झाला नाही. शिवाय फळांचेही रक्षण झाले. यावर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात विक्रीला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक चांगली झाली. मात्र, आता आंब्याची आवक मंदावली आहे. मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, अथवा मे महिन्यात सरसकट आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे आंबा लवकर बाजारात आला तर चांगला दर मिळतो. मात्र, आवक वाढली तर दर घसरण्याची भीती आहे. जानेवारीच्या  शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात आला आहे. सुरुवातीचा आंबा उन्हामुळे लवकर तयार झाला. मात्र, आवक मंदावणार आहे.सुरुवातीचा हापूस आंबा असूनही ५०० ते १००० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे. मार्चपर्यंत हापूसची ही आवक सुरू राहिली तरी प्रमाण अल्प असणार आहे. मार्चपासून आवक वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)धोक्याची घंटा?हापूसला प्रतिवर्षी सुरुवातीपासूनच अडचणींचा प्रवास सुरु होतो. यंदाही वाढलेल्या थंडीने हापूससाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यामुळे भविष्यात हापूसचे उत्पादन किती येणार? याची चिंता आता बागायतदारांना सतावू लागली आहे.हवेत गारठा : आंब्याची गळहापूसची नुकतीच परदेशात निर्यात सुरू झाली आहे. हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा पिकावर परिणाम होत आहे. अतिथंडी तसेच अतिउष्मा आंबा पिकाला मारक आहे. थंडीमुळे गळ, कडक उन्हामुळे आंबा भाजणे, तर पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याचा धोका आहे. निसर्गावर अवलंबून असणारे पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असले तरी निसर्गापुढे सर्वच हतबल आहेत. - प्रदीप सावंत,बागायतदारबऱ्याच फळांची गळ?गारठा असाच सुरु राहिला तर पहिल्या मोहोराचा आंबा बऱ्याचअंशी गळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत.