शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हापूसला साडेसाती!

By admin | Updated: February 15, 2016 23:55 IST

बागायतदार चिंतेत : गारठा वाढल्याने फळांची गळ सुरु

रत्नागिरी : हवामानात अचानक गारठा वाढल्यामुळे हापूसची साडेसाती वाढली आहे. थंडीमुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मोहोर येत असल्यामुळे फळांची गळ वाढली आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.गेले दोन दिवस मळभी वातावरण असल्यामुळे मोहोरावर कीड, भुरी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे पुनर्मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुनर्मोहोरामुळे आधीच्या मोहोरावर परिणाम होत आहे. शिवाय मोहोराला लागलेली फळे थंडीमुळे गळत आहेत. ही फळे वाचवण्यासाठी तसेच मोहोराचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. दरम्यान, सध्या नव्याने येणाऱ्या मोहोरास फळधारणा अल्प आहे. हा आंबा मे मध्ये तयार होणार आहे, त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडले आहेत.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. लवकर पीक येण्यासाठी वापरलेल्या कृषी संजीवकांमुळे पावसाअभावी सुरुवातीला आलेल्या मोहोरावर कोणताही परिणाम झाला नाही. शिवाय फळांचेही रक्षण झाले. यावर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात विक्रीला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक चांगली झाली. मात्र, आता आंब्याची आवक मंदावली आहे. मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, अथवा मे महिन्यात सरसकट आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे आंबा लवकर बाजारात आला तर चांगला दर मिळतो. मात्र, आवक वाढली तर दर घसरण्याची भीती आहे. जानेवारीच्या  शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात आला आहे. सुरुवातीचा आंबा उन्हामुळे लवकर तयार झाला. मात्र, आवक मंदावणार आहे.सुरुवातीचा हापूस आंबा असूनही ५०० ते १००० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे. मार्चपर्यंत हापूसची ही आवक सुरू राहिली तरी प्रमाण अल्प असणार आहे. मार्चपासून आवक वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)धोक्याची घंटा?हापूसला प्रतिवर्षी सुरुवातीपासूनच अडचणींचा प्रवास सुरु होतो. यंदाही वाढलेल्या थंडीने हापूससाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यामुळे भविष्यात हापूसचे उत्पादन किती येणार? याची चिंता आता बागायतदारांना सतावू लागली आहे.हवेत गारठा : आंब्याची गळहापूसची नुकतीच परदेशात निर्यात सुरू झाली आहे. हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा पिकावर परिणाम होत आहे. अतिथंडी तसेच अतिउष्मा आंबा पिकाला मारक आहे. थंडीमुळे गळ, कडक उन्हामुळे आंबा भाजणे, तर पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याचा धोका आहे. निसर्गावर अवलंबून असणारे पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असले तरी निसर्गापुढे सर्वच हतबल आहेत. - प्रदीप सावंत,बागायतदारबऱ्याच फळांची गळ?गारठा असाच सुरु राहिला तर पहिल्या मोहोराचा आंबा बऱ्याचअंशी गळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत.