शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

'सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा...;' बॅनरची होतेय जबरदस्त चर्चा! जाणून घ्या प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 22:24 IST

सावंतवाडी पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत बुधवारी संपली आहे. यामुळे या ठिकाणी शासन परिपत्रकानुसार प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र गेले काही दिवस शहरातील गांधी चौक परिसरामध्ये रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या स्टॉलवरून पालिका व जाधव यांच्यात वाद निर्माण झाला होता.

सावंतवाडी- पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत संपताच रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा, बुरे दिन चले गये, अशा आशयाचा अनोख्या  बॅनरने सर्वाचे लक्ष वेधून घेतले या बॅनरची चर्चा  मात्र शहरातील नाक्यानाक्यावर सुरू होती. काहिनी तर या बॅनरचा फोटो घेत सर्वत्र व्हायरल केला होता. मात्र हा बॅनर पालिकेसमोरच लावल्याने अखेर प्रशासनाकडून तो जप्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

सावंतवाडी पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत बुधवारी संपली आहे. यामुळे या ठिकाणी शासन परिपत्रकानुसार प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र गेले काही दिवस शहरातील गांधी चौक परिसरामध्ये रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या स्टॉलवरून पालिका व जाधव यांच्यात वाद निर्माण झाला होता. पालिका प्रशासनाने तो स्टाँल अनधिकृत ठरवत  हटविला होता यासंदर्भात जाधव यांनी अकरा दिवस पालिका इमारतीसमोर मोती तलावा काठी भर पावसात उपोषणही केले होते. 

त्यावेळी जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करतांना आपल्यावर अन्याय केल्याचे म्हटले होते. आज सत्ताधाऱ्यांची मुदत संपताच त्यांचा ठळक स्वरुपातील सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा, बुरे दिन चले गये, अशा आशयाचा बॅनर चर्चेचा ठरला. जाधव यांनी सकाळीच हा बॅनर पालिकेसमोर लावताच प्रशासनाकडून तो हटविण्यात आला. 

जाधव यांनी लावलेल्या बॅनरवर, छत्रपती शिवाजी महाराज हे दिन दलितांचे कैवारी होते, उच्च निच्च, असा भेदभाव त्यांनी कधीच केले नाही. परंतु समाजाती काही लोक स्वार्था पायी एकीकडे छत्रपती शिवाजी महारांजाचे नाव घेवून दुसरीकडे गोर गरीबांना छळतात. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहीली तरी देखील, आज ही आम्हाला न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये गोर गरीब आम्हा स्थानिक व्यापाऱ्यांना काही सत्ताधारी लोकांनी कशाप्रकारे उध्वस्त केल होत. हे साऱ्या जनतेने पाहीले आहे. न्यायासाठी लढत असताना माझ्या काळजी पोटी ११ ही दिवस भर रस्त्यात माझ्या आईच्या डोळ्यातून पडलेल्या त्या अश्रुंना मी कधीही विसरू शकणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गोर गरीबांना आधार दिला, म्हणून सर्व सामान्य जनतेच्या व विरोधकांच्याही हृदयात त्यांना आजही एक विशिष्ट स्थान आहे. मी एक उच्च शिक्षित सामाजीक कार्यकरता आहे. हा माझा संघर्ष कुटच्याही राजकीय पक्षाविरुद्ध नसून आम्हा स्थानिकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आहे,' असा मजकूर लिहीला होता.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीPoliticsराजकारण