शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

'सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा...;' बॅनरची होतेय जबरदस्त चर्चा! जाणून घ्या प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 22:24 IST

सावंतवाडी पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत बुधवारी संपली आहे. यामुळे या ठिकाणी शासन परिपत्रकानुसार प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र गेले काही दिवस शहरातील गांधी चौक परिसरामध्ये रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या स्टॉलवरून पालिका व जाधव यांच्यात वाद निर्माण झाला होता.

सावंतवाडी- पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत संपताच रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा, बुरे दिन चले गये, अशा आशयाचा अनोख्या  बॅनरने सर्वाचे लक्ष वेधून घेतले या बॅनरची चर्चा  मात्र शहरातील नाक्यानाक्यावर सुरू होती. काहिनी तर या बॅनरचा फोटो घेत सर्वत्र व्हायरल केला होता. मात्र हा बॅनर पालिकेसमोरच लावल्याने अखेर प्रशासनाकडून तो जप्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

सावंतवाडी पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत बुधवारी संपली आहे. यामुळे या ठिकाणी शासन परिपत्रकानुसार प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र गेले काही दिवस शहरातील गांधी चौक परिसरामध्ये रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या स्टॉलवरून पालिका व जाधव यांच्यात वाद निर्माण झाला होता. पालिका प्रशासनाने तो स्टाँल अनधिकृत ठरवत  हटविला होता यासंदर्भात जाधव यांनी अकरा दिवस पालिका इमारतीसमोर मोती तलावा काठी भर पावसात उपोषणही केले होते. 

त्यावेळी जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करतांना आपल्यावर अन्याय केल्याचे म्हटले होते. आज सत्ताधाऱ्यांची मुदत संपताच त्यांचा ठळक स्वरुपातील सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा, बुरे दिन चले गये, अशा आशयाचा बॅनर चर्चेचा ठरला. जाधव यांनी सकाळीच हा बॅनर पालिकेसमोर लावताच प्रशासनाकडून तो हटविण्यात आला. 

जाधव यांनी लावलेल्या बॅनरवर, छत्रपती शिवाजी महाराज हे दिन दलितांचे कैवारी होते, उच्च निच्च, असा भेदभाव त्यांनी कधीच केले नाही. परंतु समाजाती काही लोक स्वार्था पायी एकीकडे छत्रपती शिवाजी महारांजाचे नाव घेवून दुसरीकडे गोर गरीबांना छळतात. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहीली तरी देखील, आज ही आम्हाला न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये गोर गरीब आम्हा स्थानिक व्यापाऱ्यांना काही सत्ताधारी लोकांनी कशाप्रकारे उध्वस्त केल होत. हे साऱ्या जनतेने पाहीले आहे. न्यायासाठी लढत असताना माझ्या काळजी पोटी ११ ही दिवस भर रस्त्यात माझ्या आईच्या डोळ्यातून पडलेल्या त्या अश्रुंना मी कधीही विसरू शकणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गोर गरीबांना आधार दिला, म्हणून सर्व सामान्य जनतेच्या व विरोधकांच्याही हृदयात त्यांना आजही एक विशिष्ट स्थान आहे. मी एक उच्च शिक्षित सामाजीक कार्यकरता आहे. हा माझा संघर्ष कुटच्याही राजकीय पक्षाविरुद्ध नसून आम्हा स्थानिकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आहे,' असा मजकूर लिहीला होता.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीPoliticsराजकारण