शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटींमुळे अपंगांची ससेहोलपट

By admin | Updated: April 25, 2017 22:57 IST

जिल्ह्यातील १५ हजार अपंग समस्यांनी त्रस्त : कणकवली तालुक्यात ७२४ अपंग विद्यार्थ्यांचा समावेश

प्रदीप भोवड ल्ल कणकवलीसिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे १५ हजाराहून अधिक अपंग असून हे अपंग शासनाच्या जाचक अटींना कंटाळले आहेत. एक तर नोकऱ्या नाहीत त्यामुळे उपजिविका करावी कशी असा मोठा प्रश्न अपंगासमोर आहे. उद्योग व्यवसायासाठी जिल्हा परिषद १५ हजार रुपये देते, परंतु मोठा उद्योगधंदा करण्याची इच्छा असूनही त्यामध्ये करता येत नाही. अपंग विकास महामंडळाच्या जाचक अटींमुळे अपंगांना अर्थसहाय्य मिळत नाही, अशा तक्रारी अपंगांनी केल्या आहेत. अपंग महामंडळाच्या व्यवसायासाठी कर्जयोजना आहेत. अपंगांसाठी २ टक्के व्याज आहे, मात्र अटी जाचक असल्यामुळे त्या अटींची पूर्तता अपंग करू शकत नाहीत, त्यामुळे अपंग तरुण-तरुणी मेटाकुटीस आल्या आहेत.सिंधुदुर्गातील एकाही लोकप्रतिनिधीला अपंग व्यक्तींची दया कशी येत नाही, असा सवाल साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केला आहे. आमदार बच्चू कडू सोडले तर एकाही आमदाराला अपंग मतदारांचे सोयरसुतक नाही याबद्दल अपंगांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अपंगांच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. सरकार अपंगांसाठी वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत साहित्य पुरवते, मात्र अपंगांच्या पुढील जीवनाचे काय याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दल अपंगांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या उदरनिर्वाहाचे काय, जीवन जगावे कसे, जे अपंग व्यवसाय करू शकतात त्यांना अर्थसहाय्य कोण करणार असा सवाल शिंगाडे यांनी केला आहे. आमच्या अपंगत्वाची दया परमेश्वराला येईल. कोणी तरी दानशूर व्यक्ती सिंधुदुर्गात जन्माला येईल आणि अपंगांसाठी मदत करील, या आशेवर आम्ही जगत असल्याचे शिंगाडे यांनी सांगितले. आमदार, खासदार यांनी आपल्या निधीतून मदत दिली असती तर पतसंस्था उभी राहून कार्यशाळा सुरू झाली असती पण कुठल्याही आमदार, खासदाराला आम्हाला मदत करावीशी वाटत नाही. निवडणूक आली की आमदार, खासदारांना आमची आठवण होते. निवडून आले की आम्हाला कोणीही विचारत नाही. मतांसाठी आम्हाला धरून धरून मतदान केंद्रावर नेतात. तेवढ्यापुरते घरी आणून सोडतात पण आमच्या उदरनिर्वाहाचे ते काहीही बघत नाहीत, असा संतापही अपंग बांधव व्यक्त करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपंगांच्या विविध संस्था आहेत. सावंतवाडी, ओरोस, कणकवली, देवगड या ठिकाणी अपंगांचे काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. ओरोस येथे साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल शिंगाडे चालवत आहेत. देवगड येथे अपंग क्रांती संघटना श्रध्दा आंबेरकर चालवत आहेत. कणकवलीत सुरेश पाटणकर अपंग संघटनेला मदत करीत आहेत. या शिवाय सावंतवाडीत एक संस्था अपंगाचे कार्य करीत आहे. मात्र या संस्था अपंगांना साहित्यपुरवठा करण्यापलीकडे काहीही करीत नाहीत. अपंगांना व्यवसायासाठी जिल्हा परिषदेत काही प्रमाणात मदत केली जाते. ते सोडले तर कुठलीही संस्था अपंगांसाठी काहीही करीत नाही. कोणी तरी एक दोन हजाराची केव्हा तरी मदत करतात मात्र त्याने अपंगांच्या सर्व समस्या सुटत नाहीत, त्यामुळे अपंगांनी नाराजी व्यक्त केली आहे. अपंगांच्या साहित्याचे वाटपकणकवली तालुक्यात २७ जणांना अपंगांचे ओळखपत्र देण्यात आले आहे. ३२ जणांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. रेल्वे प्रवासाची सवलत २५ जणांना मिळत आहे. ४ जणांना बूट, ६ जणांना श्रवणयंत्र, एकाला क्रेचेस, एकाला ब्रेल कीट, ४९ जणांना प्रमाणपत्र, ७ जणांना मदतनीस भत्ता, ४ जणांना कॅलिपर्स, ४५ जणांची बुध्द्यांक तपासणी, ७२ जणांची स्पिच थेरपी, २९ जणांना मोठ्या अक्षरातील पुस्तके, एकाला ट्रायसिकल, ५ जणांना रोलेटर,दोघाजणांना एमआरटी कीट, एकाला संसाधन कक्षासाठी संच, ९ जणांना श्रवण ऱ्हास चाचणी, १९ जिल्हा स्तर आॅल्म्किो शिबीर, अशा प्रकारची सुविधा कणकवली कार्यालयातर्फे अपंगांना देण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधींकडून वाटाण्याच्या अक्षताअपंगांना लोकप्रतिनिधींकडून मात्र वाटाण्याच्या अक्षताच पदरात पडत असल्याचा आरोप साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केला आहे. अपंगांच्या प्रगतीसाठी जिल्ह्यात कोणी काहीही मदत करीत नाहीत. आमदार, खासदार यांच्या निधीतून आम्हाला आर्थिक मदत मिळाली असती तर अपंगांसाठी कार्यशाळा सुरू करण्याचा विचार होता. जे २५ टक्के, ५0 टक्के अपंग आहेत, त्यांना उद्योगधंद्याचे प्रशिक्षण देण्याचा साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचा मानस होता पण जिल्ह्यातील एकही दानशूर व्यक्ती मदत करीत नाही. अपंगांच्या मदतीसाठी एक पतसंस्थाही सुरू करण्याचा मानस होता, असेही शिंगाडे म्हणाले.कणकवलीत ७२४ अपंग विद्यार्थीकणकवली तालुक्यात ७२४ अपंग असून या अपंगाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण गटसाधन केंद्र कणकवलीतर्फे प्रयत्न सुरू आहेत. १८ वर्ष वयापर्यंतच्या मुलांना अपंगांचे साहित्य पुरवले जाते, अशी माहिती सर्व शिक्षा अभियानच्या विशेष तज्ज्ञ वंदना निकम यांनी दिली. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मदत होते. मात्र, १८ वर्ष वयानंतर या अपंगांकडे दुर्लक्ष होत आहे.लोकप्रतिनिधी मदत करीत नसल्याबद्दल आश्चर्यआमदार, खासदार आपल्या निधीतून कोट्यवधीची उड्डाणे करीत असतात, पण अपंगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळावे यासाठी ५ लाखाचेही अर्थसहाय्य करीत नाहीत. जर एखाद्या आमदार खासदाराने आम्हाला ५ लाख अर्थसहाय्य दिले असते तर आम्ही अपंगांची पतसंस्था स्थापन करून कार्यशाळा सुरू केली असती, पण आम्ही यापूर्वी लोकप्रतिनिधींना भेटूनही पाहिले. मात्र कोणीही मदत करीत नाही याबद्दल अपंगांनी खंत व्यक्त केली.