शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:57 IST

बांदा : माकडतापाने सलग दुसºया वर्षी बांदा परिसरात थैमान घातले असून परिसरात माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. माकडतापाच्या साथीमुळे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दुसºयावर न ढकलता चोखपणे पार पाडावी. माकडतापाच्या साथीने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, ...

बांदा : माकडतापाने सलग दुसºया वर्षी बांदा परिसरात थैमान घातले असून परिसरात माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. माकडतापाच्या साथीमुळे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दुसºयावर न ढकलता चोखपणे पार पाडावी. माकडतापाच्या साथीने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे संकेत दीपक केसरकर यांनी दिले. यावेळी वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या कामाबाबत पालकमंत्री केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.माकडताप बाधित क्षेत्रातील गावांमध्ये २४ तास वनखात्याने पथके कार्यरत ठेवावीत. आरोग्य विभागानेही प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार करुन योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या. यावेळी केसरकर यांनी माकडतापाने बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. बांदा आरोग्यकेंद्राचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्याचा विकास रखडला असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला येथील प्रमुख अधिकारी बदलावे लागतील असे सूचक वक्तव्यही पालकमंत्री केसरकर यांनी केले.माकडतापाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. तसेच अधिकाºयांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचे सांगत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.माकडतापाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. यावेळी सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम, दोडामार्ग तहसीलदार रोहिणी राजपूत, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. संदेश कांबळे, सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, दोडामार्ग शिवसेना तालुुकाप्रमुख बाबुराव धुरी, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सुशांत पांगम, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदींसह वनविभाग, आरोग्य विभाग, पशुधन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी माकडतापाची साथ व रुग्णांना देण्यात येणाºया सुविधा यांचा सविस्तर आढावा जाणून घेतला. माकडतापबाधित डोंगरपाल गाव हा काजू बागायतीने समृद्ध असून येथील ९0 टक्के लोक हे काजू बागायतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने याठिकाणी कार्यरत रहावे. तसेच जास्तीत जास्त शेतकºयांना डीएमपी आॅईलचे वाटप करा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. औषधांची कमतरता असल्यास तातडीने आपल्याशी संपर्क साधा. पशुधन विभागाला सोबत घेऊन गावात प्रत्येक दोन दिवसाआड डस्टिंग करा, असेही ते म्हणाले.बांदा आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने उद्घाटन करण्यात आलेले नाही. त्यामुळे मी वेळ देत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. या इमारतीला जिल्हा परिषदेने निधी दिला. त्याहूनही अधिकचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून दिलेला आहे. इमारत उद्घाटनाची वाट न बघता येथे येणाºया रुग्णांना नवीन इमारतीत उपचार देण्यास सुरुवात करा, असे आदेश केसरकर यांनी डॉ. जगदीश पाटील यांना दिले.यावेळी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांना धारेवर धरत ‘तुम्ही आपली जबाबदारी ग्रामपंचायतीवर का ढकलता?’ असा सवाल केला. मृत माकडांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही पूर्णपणे तुमची आहे. साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून यामध्ये कामचुकारपणा करणाºया अधिकाºयांना कारवाईसाठी सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा दिला. यावेळी पशुधन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित वनविभाग व पशुधन विभागाबाबत सर्वाधिक तक्रारी असल्याने सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकर यांनी दोन्ही विभागांच्या कामांबाबत नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले.जिल्ह्यातील अधिकाºयांची बदली करणार : दीपक केसरकरबांदा परिसरात माकडतापासारखी गंभीर परिस्थिती असताना जिल्ह्यातील आरोग्य, वनविभाग आणि संबंधित कोणत्याच विभागाचा मुख्य अधिकारी त्या गावापर्यंत पोहोचला नसल्याने पालकमंत्री केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. आपण ज्या जिल्ह्यात काम करतो त्याबाबत आत्मीयता असली पाहिजे. सर्वांगीण विकास होण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य अधिकारी चांगले असणे गरजेचे आहे. मात्र या अधिकाºयांना त्याची फिकीर नसल्याने लवकरच वरिष्ठ अधिकाºयांची बदली करून त्याजागी चांगले अधिकारी बसविणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.