शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:57 IST

बांदा : माकडतापाने सलग दुसºया वर्षी बांदा परिसरात थैमान घातले असून परिसरात माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. माकडतापाच्या साथीमुळे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दुसºयावर न ढकलता चोखपणे पार पाडावी. माकडतापाच्या साथीने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, ...

बांदा : माकडतापाने सलग दुसºया वर्षी बांदा परिसरात थैमान घातले असून परिसरात माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. माकडतापाच्या साथीमुळे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दुसºयावर न ढकलता चोखपणे पार पाडावी. माकडतापाच्या साथीने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे संकेत दीपक केसरकर यांनी दिले. यावेळी वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या कामाबाबत पालकमंत्री केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.माकडताप बाधित क्षेत्रातील गावांमध्ये २४ तास वनखात्याने पथके कार्यरत ठेवावीत. आरोग्य विभागानेही प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार करुन योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या. यावेळी केसरकर यांनी माकडतापाने बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. बांदा आरोग्यकेंद्राचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्याचा विकास रखडला असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला येथील प्रमुख अधिकारी बदलावे लागतील असे सूचक वक्तव्यही पालकमंत्री केसरकर यांनी केले.माकडतापाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. तसेच अधिकाºयांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचे सांगत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.माकडतापाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. यावेळी सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम, दोडामार्ग तहसीलदार रोहिणी राजपूत, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. संदेश कांबळे, सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, दोडामार्ग शिवसेना तालुुकाप्रमुख बाबुराव धुरी, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सुशांत पांगम, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदींसह वनविभाग, आरोग्य विभाग, पशुधन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी माकडतापाची साथ व रुग्णांना देण्यात येणाºया सुविधा यांचा सविस्तर आढावा जाणून घेतला. माकडतापबाधित डोंगरपाल गाव हा काजू बागायतीने समृद्ध असून येथील ९0 टक्के लोक हे काजू बागायतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने याठिकाणी कार्यरत रहावे. तसेच जास्तीत जास्त शेतकºयांना डीएमपी आॅईलचे वाटप करा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. औषधांची कमतरता असल्यास तातडीने आपल्याशी संपर्क साधा. पशुधन विभागाला सोबत घेऊन गावात प्रत्येक दोन दिवसाआड डस्टिंग करा, असेही ते म्हणाले.बांदा आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने उद्घाटन करण्यात आलेले नाही. त्यामुळे मी वेळ देत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. या इमारतीला जिल्हा परिषदेने निधी दिला. त्याहूनही अधिकचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून दिलेला आहे. इमारत उद्घाटनाची वाट न बघता येथे येणाºया रुग्णांना नवीन इमारतीत उपचार देण्यास सुरुवात करा, असे आदेश केसरकर यांनी डॉ. जगदीश पाटील यांना दिले.यावेळी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांना धारेवर धरत ‘तुम्ही आपली जबाबदारी ग्रामपंचायतीवर का ढकलता?’ असा सवाल केला. मृत माकडांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही पूर्णपणे तुमची आहे. साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून यामध्ये कामचुकारपणा करणाºया अधिकाºयांना कारवाईसाठी सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा दिला. यावेळी पशुधन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित वनविभाग व पशुधन विभागाबाबत सर्वाधिक तक्रारी असल्याने सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकर यांनी दोन्ही विभागांच्या कामांबाबत नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले.जिल्ह्यातील अधिकाºयांची बदली करणार : दीपक केसरकरबांदा परिसरात माकडतापासारखी गंभीर परिस्थिती असताना जिल्ह्यातील आरोग्य, वनविभाग आणि संबंधित कोणत्याच विभागाचा मुख्य अधिकारी त्या गावापर्यंत पोहोचला नसल्याने पालकमंत्री केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. आपण ज्या जिल्ह्यात काम करतो त्याबाबत आत्मीयता असली पाहिजे. सर्वांगीण विकास होण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य अधिकारी चांगले असणे गरजेचे आहे. मात्र या अधिकाºयांना त्याची फिकीर नसल्याने लवकरच वरिष्ठ अधिकाºयांची बदली करून त्याजागी चांगले अधिकारी बसविणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.