शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे संकट

By admin | Updated: January 24, 2016 00:39 IST

शरद आपटे : सावंतवाडी येथे २९ व्या पक्षीमित्र संमेलनाला सुरूवात

सावंतवाडी : वाढत्या तापमानाचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात जीव सृष्टीवर होत असून, पक्षांचा आहार हा वनस्पतींवर अवलंबून असल्याने त्याचा परिणाम हा साहजिकच किटकांना जाणवत असतो. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे संकट पक्ष्यांसमोर उभे असून, त्याचा एकत्रित सामना करणे गरजेचे असल्याचे मत २९ व्या पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष शरद आपटे यांनी उद्घाटन कार्यक्रमात मांडले. दोन दिवस चालणाऱ्या २९ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाला शनिवारपासून सावंतवाडीत सुरूवात झाली असून, त्याचे उद्घाटन राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, माजी अध्यक्ष उल्हास राणे, सुधाकर कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात शरद आपटे म्हणाले, १९९० सालापासून मी पक्षी निरीक्षक म्हणून काम सुरू केले. जेव्हा जेव्हा निरीक्षणास जात असे, तेव्हा तेथील माहिती, ठिकाण वहीत लिहून ठेवत असे. त्यामुळे त्यांचे आकलन करण्यास सोपे जात होते. पक्ष्यांच्या आवाजाची जाण ही प्रत्येकाला असते. पण ते प्रत्यक्षात कृतीत आणत नाहीत. थोर वन्यजीव छायाचित्रकार टी. एन. ए. पेरूमल यांनी मला आवाजाचे ध्वनी मुद्रण करा, असे सुचवले. त्यामुळेच १९९६ पासून हे काम हाती घेतले. त्यांच्यामुळेच मला या विषयात रूची निर्माण झाली, असे यावेळी आपटे म्हणाले पश्चिम घाटामध्ये अनेक पक्षी आहेत. पण त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असून, १८ वर्षांच्या प्रयत्नातून पश्चिम घाटातील पक्षाचे आवाज गोळा केले. २०१७ मध्ये या ध्वनीमुद्रितेचे प्रकाशन होणार असून, आवाजाचे भाग कोणते व किती याची माहितीही मी गोळा केली आहे. यापूर्वी ९० पक्ष्यांची ओळख राज्याला तसेच पक्षीमित्रांना करून दिली. त्यांचे आवाजाचे नमुनेही ध्वनीमुद्रित केले असल्याचे यावेळी आपटे यांनी स्पष्ट केले. नवोदितांना पक्षीमित्र म्हणून काम करण्याची चांगली संधी आहे. त्यांनी त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा, असे सांगत असतानाच युवा पिढी निरीक्षणापेक्षा फोटो काढण्यावरच भर देतात, अशी खंत व्यक्त करीत यासाठी ते काहीही करतात, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उदाहरणही दिले. एखाद्या घरट्याचा फोटो काढत असताना त्यांनी त्या घरट्याला धोका उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी युवा पिढीला केले. तसेच सर्वच पक्ष्यांचे फोटो काढले की ते ओळखायला येतातच असे नाही, असेही आपटे म्हणाले. महापक्षी गणनेचे खरे रूप बाहेर येत नाही. अनेक वेळा महापक्षी गणना अहवाल शंभर वर येतात. तर कधी १५ वर येतात. यावर संमेलनातून संवाद होणे गरजेचे आहे. मात्र, हे होत असतानाच ग्लोबल वॉर्मिंग एक संकट असून, त्याचा सर्वानी एकत्रित अभ्यास करून होणारा परिणाम सर्वांसमोर मांडावा. कारण पक्षी वनस्पतीवर बसत असतात आणि वनस्पतींवर किटक असतात. जर पक्ष्यांना किटकच नसतील, तर ते जगणार कसे, असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. पक्षीमित्रासह सरकारनेही विचार करण्याची गरज असून, यावर संवाद व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली. यावेळी राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी सांगितले की, संस्थानकांनी नेहमीच वनसंवर्धनाला महत्त्व दिले असून, बडोदा राजघराण्याचे फत्तेसिंह गायकवाड यांनी तर देशाच्या वनसंवर्धन महामंडाळावर काम केले आहे. त्यांनी देशाबाहेर इंग्लंडमध्ये या विषयावर अभ्यास केल्याचे सांगितले. यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, अध्यक्ष भाऊ काटघरे, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे उद्घाटन राजमातांच्या हस्ते झाले. उपस्थितांचे स्वागत व ओळख प्रा. गणेश मर्गज यांनी करून दिली. तर प्रास्ताविक प्रा. सुभाष गोवेकर यांनी केले. पक्षीमित्र संमेलनाला राज्यातून पक्षीमित्र उपस्थित होते. (प्रतिनिधी)