शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सिंधुदुर्गातील टंचाई अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे ग्रामपंचायतींनी प्राधान्याने पूर्ण करावीत : केसरकर

By admin | Updated: May 6, 2017 17:42 IST

पाणी टंचाई आढावा बैठक ीत दिल्या सूचना

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. 0६ : टंचाई अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे ग्रामपंचापयतींनी प्राधान्याने पूर्ण करावीत. ज्या ग्रामपंचायती अशी कामे प्राधान्याने पूर्ण न करता अपूर्ण ठेवतील त्यांना भविष्यात शासनाची कामे दिली जाणार नाहीत तसेच जिल्हा परिषदे मार्फत अशा ग्रामपंचायतीवर योग्य कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित पाणी टंचाई आढावा सभेस अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, विकास सुर्यवंशी, निता शिंदे, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उन्हाळ्याच्या हंगामात पिण्याचा पाणी पुरवठा हा महत्वाचा विषय असतो. या अनुषंगाने पाणी टंचाई निवारणार्थ सूचविलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करुन पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, पाणी टंचाई अंतर्गत ज्या ग्रामपंचायती अशी कामे अपूर्ण ठेवत असतील त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची कारवाई केली जाईल. जिल्ह्यात ज्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे व ग्रामस्थांची मागणी आहे अशा ठिकाणांची तपासणी करुन तहसिलदारांनी त्या गावासाठी किंवा वाडीसाठी टँकर सुरु करावा. उपविभागीय अधिका-यांनी संबधित तहसिलदार व गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाशी तालुकास्तरीय सर्व अधिका-यांशी बैठक घेऊन अपूर्ण कामांचा आढावा घ्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. सिंधुदुर्ग किल्ला, सजेर्कोट बेट तसेच किनारपट्टीवरील त्या गावात- वाड्यांत खा-या पाण्याची समस्या जाणवते अशा ठिकाणी आर-ओ प्लॅन्ट बाबत तातडीने पाहणी करुन प्रस्ताव द्यावेत, बोअरवेल मधील लोखंडी पाईप खा-या पाणी व हवामानामुळे गंजतात अशा ठिकाणी पीव्हीसी किंवा जी-आय पाईप घालण्याबाबतचा प्रस्ताव द्यावा, टंचाई ग्रस्त भागात सर्वेक्षण करुन विहिर पुर्नभरणाचा प्रस्ताव द्यावा, कोरड्या पडलेल्या विहिरीत बोअरचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही पालकमंत्री केसरकर यांनी या बैठकीत दिल्या.विहिरी खोल करण्यासाठी आवश्यक क्रेन साठी अशा दोन नविन क्रेन घेण्याबाबत तसेच निवीदा काढून पोर्टबल बोअरवेल मशिन घेण्याबाबतचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने त्वरीत सादर करावा, असेही पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. पाणी टंचाई कामांबाबतचा सविस्तर आढावाही यावेळी घेण्यात आला.