शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सिंधुदुर्गातील टंचाई अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे ग्रामपंचायतींनी प्राधान्याने पूर्ण करावीत : केसरकर

By admin | Updated: May 6, 2017 17:42 IST

पाणी टंचाई आढावा बैठक ीत दिल्या सूचना

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. 0६ : टंचाई अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे ग्रामपंचापयतींनी प्राधान्याने पूर्ण करावीत. ज्या ग्रामपंचायती अशी कामे प्राधान्याने पूर्ण न करता अपूर्ण ठेवतील त्यांना भविष्यात शासनाची कामे दिली जाणार नाहीत तसेच जिल्हा परिषदे मार्फत अशा ग्रामपंचायतीवर योग्य कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित पाणी टंचाई आढावा सभेस अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, विकास सुर्यवंशी, निता शिंदे, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उन्हाळ्याच्या हंगामात पिण्याचा पाणी पुरवठा हा महत्वाचा विषय असतो. या अनुषंगाने पाणी टंचाई निवारणार्थ सूचविलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करुन पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, पाणी टंचाई अंतर्गत ज्या ग्रामपंचायती अशी कामे अपूर्ण ठेवत असतील त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची कारवाई केली जाईल. जिल्ह्यात ज्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे व ग्रामस्थांची मागणी आहे अशा ठिकाणांची तपासणी करुन तहसिलदारांनी त्या गावासाठी किंवा वाडीसाठी टँकर सुरु करावा. उपविभागीय अधिका-यांनी संबधित तहसिलदार व गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाशी तालुकास्तरीय सर्व अधिका-यांशी बैठक घेऊन अपूर्ण कामांचा आढावा घ्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. सिंधुदुर्ग किल्ला, सजेर्कोट बेट तसेच किनारपट्टीवरील त्या गावात- वाड्यांत खा-या पाण्याची समस्या जाणवते अशा ठिकाणी आर-ओ प्लॅन्ट बाबत तातडीने पाहणी करुन प्रस्ताव द्यावेत, बोअरवेल मधील लोखंडी पाईप खा-या पाणी व हवामानामुळे गंजतात अशा ठिकाणी पीव्हीसी किंवा जी-आय पाईप घालण्याबाबतचा प्रस्ताव द्यावा, टंचाई ग्रस्त भागात सर्वेक्षण करुन विहिर पुर्नभरणाचा प्रस्ताव द्यावा, कोरड्या पडलेल्या विहिरीत बोअरचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही पालकमंत्री केसरकर यांनी या बैठकीत दिल्या.विहिरी खोल करण्यासाठी आवश्यक क्रेन साठी अशा दोन नविन क्रेन घेण्याबाबत तसेच निवीदा काढून पोर्टबल बोअरवेल मशिन घेण्याबाबतचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने त्वरीत सादर करावा, असेही पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. पाणी टंचाई कामांबाबतचा सविस्तर आढावाही यावेळी घेण्यात आला.