शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीपेक्षा ग्रामपंचायतच बरी होती!

By admin | Updated: August 20, 2016 23:21 IST

नूतन नगरसेवकांची केविलवाणी अवस्था : ‘ना निधी, ना अधिकारी’ सारेच ठप्प, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांच्या रोषाने पदाधिकारी त्रस्त

वैभव साळकर -- दोडामार्ग --कसई दोडामार्गची नगरपंचायत स्थापन होऊन तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला, तरी नगरपंचायतीला मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्षा लागून आहे. मुख्याधिकाऱ्यांअभावी शहरातील विकासकामे ठप्प झाली असून, विकासप्रक्रियाच मंदावली आहे. शहरातील एकाही प्रभागात नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर एकही विकासकाम मार्गी लागलेले नाही. परिणामी नागरिकांच्या रोषाला नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळा मुख्याधिकाऱ्यांसाठी पाठपुरावा करूनही प्रशासनाने मात्र कानाडोळा केल्याने नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर पूर्वीची ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे.तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा महत्त्वाचा निर्णय तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतला. पुढे कालांतराने त्याची अंमलबजावणी सेना-भाजपा युतीच्या काळात झाली आणि त्यानुसार जिल्ह्यातील वैभववाडी व दोडामार्ग या दोन ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले. परिणामी कसई-दोडामार्गवासियांना शहरीकरणाबरोबरच विकासाची स्वप्ने पडू लागली. मात्र, नगरपंचायत निर्माण होऊन दीड वर्ष झाले, तरी केवळ प्रशासनाच्या निर्ढावलेपणामुळे शहरवासियांचे विकासाचे स्वप्न सत्यात उतरले नाही. कसई-दोडामार्गची ग्रामपंचायत बरखास्त होऊन १९ मार्च २०१५ रोजी नगरपंचायत स्थापन झाली. त्यानंतर गेल्या दीड वर्षाच्या काळात नगरपंचायतीसाठी लागणारा कर्मचारीवर्ग, अधिकारीवर्ग भरण्याकडे दुर्लक्षच झाले. वेंगुर्ले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याकडे कसई-दोडामार्गचा प्रभारी मुख्याधिकारी म्हणून चार्ज देण्यात आला. पण कायम मुख्याधिकारी नसल्याने शहरात एकही विकासकाम झालेले नाही. शहरात नगरपंचायत हद्दीत एकूण १७ प्रभाग आहेत. पण यापैकी एकाही प्रभागात विकासकाम झालेले नाही. नगरसेवकांना बसण्यासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध नाही. जी इमारत उपलब्ध आहे, ती ग्रामपंचायतीची असून, याच चार बाय दहाच्या खोलीतून कसई-दोडामार्गचा कारभार हाकला जात आहे. मुख्याधिकाऱ्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत असून, त्याचा विपरित परिणाम शहराच्या विकास प्रक्रियेवर झाला आहे. तरीसुध्दा प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत आहे.नगरपंचायतीचे पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यातकायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने विकासकामे होत नाहीत. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. नागरिक नगरसेवकांना त्याचा जाब विचारत आहेत. परिणामी नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने नगरपंचायतीचे पदाधिकारी प्रशासनाविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते.येत्या आठ दिवसांत कायमस्वरूपी मुख्याधिकारी न मिळाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी दिला आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे हे एकच दुखणे असल्याने सध्या सत्ताधारी व विरोधकही मुख्याधिकाऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आहेत.