शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:20 IST

GramPanchyat Elecation Sindhudurgnews - सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असतो. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू झाले असून, आता या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात रणसंग्राम रंगणार आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामाला प्रारंभवर्चस्वासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असतो. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू झाले असून, आता या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात रणसंग्राम रंगणार आहे.फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरू शकते . ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतरच खऱ्या अर्थाने रणसंग्राम सुरू झाला आहे . सिंधुदुर्गातील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचे त्यांच्या नेत्यांनी जाहीर केले आहे.

मात्र, स्थानिक स्तरावर अशी आघाडी होऊ शकेल का? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्थानिक स्तरावर प्रथमच अशी आघाडी होऊन निवडणूक लढविली जाणार असल्याने ही महाविकास आघाडीसाठी एकप्रकारे अग्निपरीक्षा ठरणार आहे. ज्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत असते, त्यांना जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुका थोडया सोप्या होतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतही प्रत्येक पक्ष जातीने लक्ष घालत असतो. ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.भाजपाला रोखण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, सतीश सावंत, संदेश पारकर, अमित सामंत, बाळा गावडे आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे इतर नेते व पदाधिकारी कोणती रणनीती आखतात हे निवडणूक निकालानंतरच समजू शकणार आहे.नारायण राणेंना विशेष प्रयत्न करावे लागणार !नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, ते भाजपवासी झाल्यानंतर ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. भाजपनंतर शिवसेना आणि इतर पक्षांचे वर्चस्व ग्रामपंचायतींवर आहे. महाआघाडी झाली तर नारायण राणे यांना पूर्वीप्रमाणेच आपले निर्विवाद वर्चस्व ग्रामपंचायतींवर कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग