शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:20 IST

GramPanchyat Elecation Sindhudurgnews - सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असतो. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू झाले असून, आता या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात रणसंग्राम रंगणार आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामाला प्रारंभवर्चस्वासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असतो. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू झाले असून, आता या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात रणसंग्राम रंगणार आहे.फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरू शकते . ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतरच खऱ्या अर्थाने रणसंग्राम सुरू झाला आहे . सिंधुदुर्गातील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचे त्यांच्या नेत्यांनी जाहीर केले आहे.

मात्र, स्थानिक स्तरावर अशी आघाडी होऊ शकेल का? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्थानिक स्तरावर प्रथमच अशी आघाडी होऊन निवडणूक लढविली जाणार असल्याने ही महाविकास आघाडीसाठी एकप्रकारे अग्निपरीक्षा ठरणार आहे. ज्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत असते, त्यांना जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुका थोडया सोप्या होतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतही प्रत्येक पक्ष जातीने लक्ष घालत असतो. ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.भाजपाला रोखण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, सतीश सावंत, संदेश पारकर, अमित सामंत, बाळा गावडे आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे इतर नेते व पदाधिकारी कोणती रणनीती आखतात हे निवडणूक निकालानंतरच समजू शकणार आहे.नारायण राणेंना विशेष प्रयत्न करावे लागणार !नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, ते भाजपवासी झाल्यानंतर ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. भाजपनंतर शिवसेना आणि इतर पक्षांचे वर्चस्व ग्रामपंचायतींवर आहे. महाआघाडी झाली तर नारायण राणे यांना पूर्वीप्रमाणेच आपले निर्विवाद वर्चस्व ग्रामपंचायतींवर कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग