शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ST Strike: सरकारचा अंतिम अल्टिमेटम! सिंधुदुर्गातील १३६५ कर्मचारी अजूनही संपात सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 18:06 IST

कामावर रुजू होणाऱ्या चालक व वाहकांची संख्या वाढल्यास एसटी सेवा सुरळीत करण्यास प्रशासनास मदत होणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.

कणकवली : राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे यासह आदी मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम असल्याने अद्याप यावर तोडगा निघाला नाही. सरकारने दिलेली भरघोस वेतन वाढ आणि आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर हजर देखील झाले आहेत. मात्र पुर्ण क्षमतेने एसटीच्या फेऱ्या अद्याप सुरु झाल्या नाहीत. यानंतर सरकारने आंदोलनकर्त्यांना आता अंतिम अल्टिमेटम दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. संपात अजूनही सिंधुदुर्गातील १८४५ पैकी १३६५ कर्मचारी सहभागी आहेत.१०३ कर्मचारी अधिकृतपणे सुट्टीवर आहेत. तर २१ कर्मचारी गैरहजर राहिले आहेत. आतापर्यंत ३६० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. संप सुरूच असल्याने त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने एसटी कर्मचाऱ्यांना १० मार्च पर्यंत सेवेत दाखल होण्याचा अंतिम अल्टीमेटम राज्य सरकारने दिला आहे.तर गेल्या दोन- तीन दिवसात चालक व वाहक मोठ्या संख्येने कामावर हजर होत असल्याचेही एसटीच्या सूत्रांनी सांगितले. बुधवारी सिंधुदुर्ग विभागातील विविध एसटीच्या आगरात चालक ३१ व वाहक ३८ कामावर हजर होते. कामावर रुजू होणाऱ्या चालक व वाहकांची संख्या वाढल्यास एसटी सेवा सुरळीत करण्यास प्रशासनास मदत होणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गST Strikeएसटी संप