शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

गोपुरीत शेतकऱ्यांची कार्यशाळा

By admin | Updated: March 18, 2016 23:59 IST

यतीन मयेकर : मधुमक्षिका पालनातून उन्नती साधा

कणकवली : सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला मेगा फूड पार्कमुळे खात्रिशीर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. टोमॅटो, पेरू उत्पादनासाठी बजाज फूडपार्क शेतकऱ्यांना सहकार्य करीत असून आता मध उत्पादनासाठी आम्ही बाजार पेठ उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीची संधी आहे, असे प्रतिपादन बजाज मेगा फूड पार्कचे संचालक यतीन मयेकर यांनी गोपुरी आश्रमात आयोजित कार्यशाळेत केले.गोपुरी आश्रम आणि बजाज मेगा फूडपार्क कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिका पालन कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, डॉ. आनंद तेंडुलकर, खादी ग्रामोद्योग महासंघाचे दिलीप वाडेकर, गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे, नारळ विकास संघाचे खजिनदार रामानंद शिरोडकर, सुधीर जडये, कृषीचे यशवंत गव्हाणे, आदी उपस्थित होते. यतीन मयेकर म्हणाले की, सावंतवाडीत बजाज मेगा फूडपार्क उभारला जात आहे. एका स्मार्ट सिटीसारखाच हा फूडपार्क असेल. फळप्रक्रियेसाठी आवश्यक सर्व यंत्रसामुग्री या फूडपार्कमध्ये असणार आहे. गावपातळीवर शेतकऱ्यांनी उत्पादित माल गोळा करण्यासाठी शीतगृहे आणि कलेक्शन सेंटर्स असतील. त्यानंतर अर्धप्रक्रिया केंद्रे जिल्ह्यातील काही ठिकाणी उभारली जातील. असेप्टिक पॅकेजिंग युनिट मेगा फूडपार्कमध्ये असणार आहे. दिवसाला ६०० मेट्रिक टन फळांवर प्रक्रिया करण्याची क्षमता या मेगा फूडपार्कमध्ये असणार आहे. डॉ. प्रसाद देवधर म्हणाले की, मेगा फूडपार्कसारख्या प्रकल्पांमुळे येथील अर्थशास्त्र बदलणार आहे. पुढील काळ हा शेतकऱ्यांना चांगला आहे. मधुमक्षिका पालन, शेळीपालन, गाय पाळण्याएवढे सोपे नाही. मधमाशांना बंदिस्त ठेवले जाऊ शकत नाही. मात्र, योग्य तंत्राच्या आधारे त्यांच्यासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती केली जाऊ शकते. मधुमक्षिका पालनामुळे शेती उत्पन्नातही ३० टक्के वाढ होते. मटका लावण्याचा येथील शेतकरी जेवढा गांभीर्याने विचार करतो. तेवढा जर शेतीचा विचार केला तर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती चांगली होईल. सुभाष मयेकर म्हणाले की, आंबा पीक घटत चालले आहे. शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळता राहिला, तर शेतकरी सुखी राहणार आहे. येथील जमिनीचे तज्ज्ञांनी सर्वेक्षण केले असता ही जमीन बाराही महिने उत्पादन देणारी असल्याचे स्पष्ट झाले. परागीभवनामुळे शेती उत्पन्नात वाढ होते. यासाठी मधुमक्षिका पालन आवश्यक आहे. सांगेली येथील मधुमक्षिका पालन करणारे सुधीर जडये, डॉ. आनंद तेंडुलकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत गव्हाणे यांनी केले. शेतकऱ्यांना सवलतकंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ८० हजार टोमॅटो रोपांचे वाटप केले आहे. त्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले. ही लागवड यशस्वी झाली असून, आता पेरूची लागवड केली जात आहे. पुढील टप्प्यात मधावर प्रक्रिया केली जाणार असून, शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीत मधपेट्या दिल्या जाणार आहेत.