शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:19 IST

Nitin Gadkari Sindhudurgnews- आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय आहे, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी ५० क्लस्टरच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केली.

ठळक मुद्देआत्मनिर्भर भारत बनण्यासाठी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय नितीन गडकरी यांची घोषणा : क्लस्टर प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन

वेंगुर्ला : आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय आहे, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी ५० क्लस्टरच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केली.केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील ५० क्लस्टर प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पेंडूर येथील कल्पतरू क्वायर औद्योगिक सहकारी संस्थेचा समावेश होता. दरम्यान, हा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम महिला औद्योगिक सहकारी संस्था कॅम्प वेंगुर्ला येथील सभागृहात झाला.

देशात १८ राज्यांत एकाच वेळी स्फूर्ती अंतर्गत ५० क्लस्टरची सुरुवात झाल्याने या व्यवसायाशी निगडित ४२ हजार कारागिरांना रोजगार मिळणार असून त्यांच्या नव्या जीवनाची आता सुरुवात होणार आहे. देश विकसित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्न असून त्यासाठी गाव समृद्ध, संपन्न व शक्तिशाली होणे गरजेचे आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.यावेळी महिला काथ्या क्वायर क्लस्टरचे चेअरमन तसेच काथ्या प्रकल्पाचे मार्गदर्शक एम. के. गावडे, महिला काथ्या संचालिका प्रज्ञा परब, उपप्रादेशिक क्वायर बोर्ड अधिकारी श्रीनिवासन, विष्णू, नीलम क्वायर औद्योगिक संस्थेच्या गीता परब, सनराइझ क्वायर औद्योगिक संस्थेच्या श्रुती रेडकर, राखी करंगुटकर, वर्षा मडगावकर, सुजाता देसाई, अश्विनी पाटील यांच्यासहित मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.एमएसएमईच्या माध्यमातून जिल्ह्यातील क्लस्टर प्रकल्पांना उभारी मिळत असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व एमएसएमई विभागाचे सर्व अधिकार यांचे एम. के. गावडे यांनी आभार व्यक्त केले.कारागिरांनी एकत्र यावेउत्कृष्ट कारागीर व हस्तकला अवगत असलेल्या व्यक्तींनी एकत्र येत प्रत्येक मतदारसंघात दहा क्लस्टर निर्माण करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मागणीनुसार उत्कृष्ट मालाची निर्मिती करणे गरजेचे आहे. गाईच्या शेणापासून उत्पादित केलेल्या रंगाला जगात मागणी असून देशात प्रत्येक गावात रंगाची फॅक्टरी सुरू करणे आपले ध्येय असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीsindhudurgसिंधुदुर्ग