शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:19 IST

Nitin Gadkari Sindhudurgnews- आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय आहे, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी ५० क्लस्टरच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केली.

ठळक मुद्देआत्मनिर्भर भारत बनण्यासाठी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय नितीन गडकरी यांची घोषणा : क्लस्टर प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन

वेंगुर्ला : आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय आहे, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी ५० क्लस्टरच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केली.केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील ५० क्लस्टर प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पेंडूर येथील कल्पतरू क्वायर औद्योगिक सहकारी संस्थेचा समावेश होता. दरम्यान, हा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम महिला औद्योगिक सहकारी संस्था कॅम्प वेंगुर्ला येथील सभागृहात झाला.

देशात १८ राज्यांत एकाच वेळी स्फूर्ती अंतर्गत ५० क्लस्टरची सुरुवात झाल्याने या व्यवसायाशी निगडित ४२ हजार कारागिरांना रोजगार मिळणार असून त्यांच्या नव्या जीवनाची आता सुरुवात होणार आहे. देश विकसित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्न असून त्यासाठी गाव समृद्ध, संपन्न व शक्तिशाली होणे गरजेचे आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.यावेळी महिला काथ्या क्वायर क्लस्टरचे चेअरमन तसेच काथ्या प्रकल्पाचे मार्गदर्शक एम. के. गावडे, महिला काथ्या संचालिका प्रज्ञा परब, उपप्रादेशिक क्वायर बोर्ड अधिकारी श्रीनिवासन, विष्णू, नीलम क्वायर औद्योगिक संस्थेच्या गीता परब, सनराइझ क्वायर औद्योगिक संस्थेच्या श्रुती रेडकर, राखी करंगुटकर, वर्षा मडगावकर, सुजाता देसाई, अश्विनी पाटील यांच्यासहित मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.एमएसएमईच्या माध्यमातून जिल्ह्यातील क्लस्टर प्रकल्पांना उभारी मिळत असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व एमएसएमई विभागाचे सर्व अधिकार यांचे एम. के. गावडे यांनी आभार व्यक्त केले.कारागिरांनी एकत्र यावेउत्कृष्ट कारागीर व हस्तकला अवगत असलेल्या व्यक्तींनी एकत्र येत प्रत्येक मतदारसंघात दहा क्लस्टर निर्माण करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मागणीनुसार उत्कृष्ट मालाची निर्मिती करणे गरजेचे आहे. गाईच्या शेणापासून उत्पादित केलेल्या रंगाला जगात मागणी असून देशात प्रत्येक गावात रंगाची फॅक्टरी सुरू करणे आपले ध्येय असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीsindhudurgसिंधुदुर्ग