शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवा

By admin | Updated: November 19, 2014 23:25 IST

प्रमोद जठार : मालवणातील जनता दरबारात भाजप कार्यकर्त्यांना सूचना

प्रमोद जठार : मालवणातील जनता दरबारात भाजप कार्यकर्त्यांना सूचनामालवण : देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आली आहे. तुम्ही आता विरोधी पक्षातले कार्यकर्ते राहिला नसून सत्ताधारी पक्षाचे घटक बनला आहात. गावागावात, वाडीवाडीत लोकांचे अनेक प्रश्न आहेत. भाजपा सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडविण्यात आले पाहिजेत. लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घ्या, अशा सूचना माजी आमदार प्रमोद जठार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केल्या.येथील हॉटेल महाराजा येथे नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, काका कुडाळकर, विलास हडकर, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, आबा तारी, जनार्दन सावंत आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना जठार म्हणाले, तुम्हाला विश्वास देण्यासाठी आम्ही सर्वजण याठिकाणी आलो आहोत. तुम्ही आता बलाढ्य सरकारचे कार्यकर्ते असल्याने तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही आता सरकार असल्याने तुम्हाला आता राज्य करायचे आहे. सरकारची पावले प्रत्येक वाडीवस्तीत उमटविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्याचे जाळे निर्माण झाले पाहिजे. यापूर्वी राज्यात युतीचे सरकार होते तेव्हा सत्तेत आमचा फक्त ४० टक्के वाटा होता. आता शत प्रतिशत भाजपाचे सरकार असल्याने शत प्रतिशत पदे भाजपच्याच कार्यकर्त्यांना मिळणार आहेत. जिल्ह्यात आपली ताकद कमी आहे. येथे आपला एकही आमदार निवडून आलेला नसला तरीही सत्तेची अशी संधी यापूर्वी कधीही आली नव्हती. पक्षवाढीसाठी हीच वेळ असून कामाला लागा. लवकरच जिल्ह्यात भाजपाचा पालकमंत्री ठरणार असल्याचेही जठार म्हणाले.जनता दरबारात नागरिकांनी सीआरझेडचा प्रश्न, आचरा येथील देवस्थान इनाम जमिनी, सवलतीच्या दरात केरोसिन, अनधिकृत पर्ससीन, गौण खनिज याबाबत प्रश्न मांडले. मुंबईऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक व्हावे या जठार यांच्या मागणीचेही यावेळी त्यांना स्मरण करून देण्यात आले. (प्रतिनिधी)मालवण येथील हॉटेल महाराजा येथे नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतुल काळसेकर, राजन तेली, काका कुडाळकर आदी उपस्थित होते.