शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उच्च न्यायालयात जाणार

By admin | Updated: January 16, 2016 00:50 IST

स्थायी समिती सभेत निर्णय : तळवडेतील शालेय पोषण आहार प्रकरण

सिंधुुदुर्गनगरी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक शालेय पोषण आहारप्रकरणी दोषी आढळून देखिल त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्या मुख्याध्यापकावर कारवाई व्हावी व मुख्याध्यापकाला पाठीशी घालणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यावर देखिल कारवाई व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत सर्वानुमते घेण्यात आला. तसेच नेरूर हायस्कूलने अनुशेष डावलून शिक्षक भरती झाल्याचे उघड झाल्यानंतर शिक्षक भरती रद्द करून पगारावर झालेल्या रकमेची वसुली करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिले. जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, समिती सदस्य सतिश सावंत, संग्राम प्रभूगावकर, प्रमोद कामत, सुफला नरसूले, पुष्पा नेरूरक र, मधुसूदन बांदिवडेकर, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, अधिकारी, खाते प्रमुख उपस्थित होते.तळवडे हायस्कूलच्या मुख्याध्यापकावर शालेय पोषण आहारातील तांदळाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. मात्र, त्या मुख्याध्यापकावर गेले सहा ते सात महिने कारवाई करण्यात येत नसल्याचा मुद्दा स्थायी समिती सभेत चांगलाच गाजला. नेरूर हायस्कूलमध्ये अनुशेष डावलून भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून या शिक्षकांंच्या पगारावर झालेला खर्च वसूल करावा अशी मागणी करण्यात आलीे. या मुद्द्यावर सखोल चर्चा करूनही शिक्षक भरती प्रक्रिया रद्द करा व त्यावर झालेल्या खर्चाची वसुली करा असे आदेश रणजीत देसाई यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. तसेच फोंडा हायस्कूल येथे शिक्षक भरती प्रक्रिया बंद असताना शिक्षक भरती केली असल्याचा आरोप मधुसूदन बांदिवडेकर यांनी करत संबंधित मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केली. यावर शिक्षणाधिकारी धाकोरकर म्हणाले की शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित मुख्याध्यापकाने तसे केले नाही. त्यामुळे भरती केलेल्या शिक्षकांना वेतन देण्याची जबाबदारी आदी घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)चार दिवसात बेघरांची यादी पाठवाबेघरांची यादी आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. मात्र, तरीही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने याचे गांभीर्य घेतलेले नाही. याबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या १५ महिन्यापासून बेघरांची यादी कोकण आयुक्तांकडे सादर करण्याची सूचना करून देखिल प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याचे सांगत संबंंिधत लाभार्थी आमच्या नावाने ओरड मारत असल्याचे सतिश सावंत यांनी सांगितले. १८ जानेवारीपर्यंत बेघरांची यादी कोकण आयुक्तांकडे परिपूर्णरित्या सादर केली जाईल, असे आश्वासन सुनिल रेडेकर यांनी दिले.शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात खटला : ठरावमुख्याध्यापकाला पालकमंत्र्यांसह माध्यमिक शिक्षण विभाग पाठीशी घालत असल्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षण विभाग कागदी घोडे नाचवत पोस्टमनची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप सतिश सावंत यांनी करत शिक्षण विभागाला धारेवर धरले आहे. आरोपींना पाठीशी घालणाऱ्या शिक्षण विभागाच्या कामकाजाविरूद्ध व संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात खटला दाखल करणार असल्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.