शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वांचलकडे चला! परिस्थितीची दखल घ्या

By admin | Updated: December 22, 2014 00:20 IST

प्रतिभा आठवले : देवगडात बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला

देवगड : बांगलादेश, चीन व म्यानमार सदैव पूर्वांचलच्या नागरिकांना अशांत ठेवून हा भाग बळकावण्याच्या प्रयत्नात असतात. अशावेळी उर्वरित भारतीयांनी या भागाशी सातत्यपूर्ण व प्रभावी संपर्क ठेवून या भागाचा मुलभूत विकास केला तरच येथे काश्मिर किंवा पूर्वीच्या पंजाबसारखी स्थिती उत्पन्न होणार नाही. तेव्हा पूर्वांचलाकडे चला, असा संदेश अहमदाबाद येथील अभ्यासक प्रतिभा आठवले यांनी व्याख्यानात देवगडवासीयांना दिला.पूर्वांचल हा निसर्गाने पूर्ण वरदहस्त ठेवलेला अतिरमणीय परंतु दुर्गम व निसर्गसंपन्न भूभाग आहे. भारतावर सूर्याची पहिली किरणे अरुणाचलमध्येच पडतात. हा भाग सात राज्यांचा आहे. परंतु सातही राज्यात शेकडो आदिवासी (जमाती) निवास करतात. त्यांची भाषा पूर्ण वेगळी आहे. त्यांच्यात संवाद नाही. त्यामुळे परकीय शक्ती या सर्वात फूट पाडून येथील प्रशासन खिळखिळे करत आहेत. त्याची दखल वेळीच घेतली नाही तर येथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. हे वेळीच रोखले पाहिजे, असा स्पष्ट इशारा डॉ. प्रतिभा आठवले यांनी दिला.पूर्वांचलमधील मुख्य नदी ब्रह्मपुत्रा आहे. तिचा १६०० किलोमीटर प्रवास तिबेटमधून व भारतातून दक्षिणेकडे ९०० किलोमीटर प्रवास करून ही नदी बंगालच्या उपसागरात समुद्राला मिळते. तिचा प्रवाह अत्यंत अनियमित आहे. म्हणून येथे विकास हळूहळू होत आहे. ब्रह्मपुत्रा इतकी विशाल आहे की, तिचा विरूद्ध किनारा अनेक ठिकाणी नुसत्या नजरेला दिसत नाही. दोन्ही बाजूला उंच कडे व डोंगर आहेत. या भागात जलमार्ग किंवा मोटारीने प्रवास करावा लागतो, अशी माहिती त्यांनी दिली. रामायण-महाभारताचे उल्लेख त्यांनी या भागाविषयी करुन पौराणिक काळापासून आधुनिक युगापर्यंत या भागाचे संदर्भ मिळतात.या भागाचे निसर्गवैभव वर्णन करताना त्यांनी सुमारे ३०० विविध आर्किडच्या प्रजाती, बांबू, चहा, खळ यांचे मळे यामुळे हा भाग निश्चितच वैभवसंपन्न आहे. मात्र, लिपीचा अभाव व प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर बदलणारी भाषा यामुळे या भागातील जनतेचा एकमेकांशी व उर्वरित भारताशी संपर्क नाही.सांस्कृतिकरित्या या भागाच्या ट्राईब्ज एकलव्य, रुक्मिणी, गंधर्व-अप्सरांचे वंशज असल्याचे सांगतात. भगवान परशुरामांचा वास या भागात होता. या भागातील लोकांचे सांस्कृतिक जीवन, खाद्यसंस्कृती व करमणूक यासह भाषा व चालीरिती यांवरही आठवले यांनी विस्तृत भाष्य केले. सध्याच्या परिस्थितीत परकीय शक्तींच्या प्रयत्नांना विरोध करून या भागाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी व त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी स्वत: आठवले या सात ते आठ ठिकाणी डेंटल क्लिनिक चालवून स्वखर्चाने त्यांची सेवा करीत असल्याचा खास उल्लेखही त्यांनी केला. (प्रतिनिधी)