शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

सिंधुदुर्गातील जनतेला टोलमुक्ती द्या!, टोल मुक्त समितीची मंत्री दीपक केसरकरांकडे मागणी

By सुधीर राणे | Updated: January 21, 2023 17:16 IST

तालुक्यातील नागरिकांना मुख्यालय गाठण्यास पर्यायी सोयीस्कर मार्गच नाही

कणकवली : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ साठी ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोल आकारणी लवकरच सुरू होणार आहे. मात्र, या नियोजित पथकर आकारणीतून सिंधुदुर्गवासीयांना मुक्ती मिळावी, अशी जिल्ह्यातील जनतेची भावना आहे. तसेच कणकवली गडनदी पुलानजीकचे धोकादायक वळणाबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग टोलमुक्त कृती समितीच्यावतीने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली. सिंधुदुर्ग टोलमुक्त कृती समितीच्या सदस्यांनी मंत्री केसरकर यांची कसाल येथील सिद्धिविनायक मंदिर येथे शुक्रवारी भेट घेतली. यावेळी द्वारकानाथ घुर्ये, संजय भोगटे, नितीन वाळके, राजन नाईक, नितीन म्हापणकर, अवधूत मालणकर, विनायक मेस्त्री आदी उपस्थित होते. मंत्री केसरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामार्ग  टोलमुक्त असेल, असे संबंधितांकडून यापूर्वी जाहीरही करण्यात आले होते. तरीही टोलच्या माध्यमातून महामार्ग  बांधणीचा खर्च वसूल करण्यास आमची कोणतीच हरकत नाही. मात्र, या सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाची जागा आणि जिल्ह्याचा नकाशा लक्षात घेतला, तर जिल्ह्याच्या उत्तर भागातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली या तीन तालुक्यातील नागरिकांना मुख्यालय गाठण्यास पर्यायी सोयीस्कर मार्गच नाही. साहजिकच त्यांना टोलच्या माध्यमातून भुर्दंड पडणार आहे. शासनानेच दिलेल्या शब्दानुसार जिल्हावासीयांना टोलमाफी मिळावी. सिंधुदुर्गचे सुपुत्र या नात्याने आपण टोलमाफीसाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, असेही म्हटले आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत हळवल फाटा येथील धोकादायक वळणाबाबतही चर्चा करण्यात आली. त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. वरील प्रश्नांबाबत मुंबईत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मंत्री केसरकर यांनी सांगितल्याची माहिती नितीन म्हापणकर यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाकाDeepak Kesarkarदीपक केसरकर