शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत व्यवस्थेची काटेकोर माहिती द्या

By admin | Updated: October 24, 2015 00:54 IST

अनुसया कुलकर्णी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्गनगरी : पंचायत व्यवस्थेच्या बळकटीसाठी राज्य शासनाने काढलेले शासन निर्णय लोकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ग्रामसेवक, तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांची आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने पंचायत व्यवस्थेत काम करणाऱ्या महिलांपर्यंत माहिती पोहोचत नाही. यापुढे शासन निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा महिला राजसत्ता आंदोलनच्या जिल्हा संघटिका अनुसया अशोक कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.पंचायत राज हा आपल्या देशातील राजकारणाचा मुख्य कणा आहे. पंचायत राज व्यवस्थेत सक्षमीकरणासाठी तसेच पंचायत कारभारात पारदर्शकतेसोबतच महिलांचा सहभाग वाढावा व सत्तेत विकेंद्रीकरण व्हावे, यासाठी शासनाने आतापर्यंत विविध शासन निर्णय काढले आहेत. आम्ही महिला राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेडोपाड्यात काम करीत असताना असे लक्षात आले आहे की, पंचायत राज संबंधित महत्त्वाच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे या शासन निर्णयांची माहिती पंचायत व्यवस्थेत काम करणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचत नाही. याचा गंभीर परिणाम पंचायतीतील महिलांना मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव दिसतो.राज्य शासनाने वेळोवेळी काढलेले शासन निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जिल्हा महसूल प्रशासनाची असते. मात्र, या निर्णयांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येते.यावेळी शिष्टमंडळामध्ये हर्षदा वाळके, आरती पाटील, सुजाता देसाई, राधाबाई गुरव, जयश्री धनावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)१खालील बाबींची अंमलबजावणी होत नाहीपंचायत राज व्यवस्थेत आर्थिक पारदर्शकता यावी यासाठी विविध शासकीय कामांच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक अनिवार्य केले आहते. मात्र, याची पुरेशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.२ सरपंचांना मानधनात व बैठक भत्त्यात वाढ देणारा शासन निर्णय झाला. यापूर्वी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना मानधन देण्यात येत नव्हते; परंतु या शासन आदेशानंतर ग्रामपंचायतीमधील सरपंचांना ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न आणि लोकसंख्येनुसार मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे; परंतु हे खूप अनियमित झाले आहे.३ सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते तसेच ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचे किमान वेतन असे खर्च भागस्रवण्यासाठी गेल्या १५ वर्षांत चार शासन आदेश काढून ग्रामपंचायत सहायक अनुदानाची तरतूद करण्यात आली आह; पण अंमलबजावणी होत नाही.४ जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना प्रशिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागते. कामानिमित्त बाहेर गावी गेल्यावर स्वत:ची ओळख पटविताना अडचण निर्माण होते. त्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती व पंचायत समित्यांचे सभापती यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी सिंधुदुर्गात होताना दिसून येत नाही.तरी वरील सर्व पंचायत सेवांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.