शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

रानटी हत्तींपासून संरक्षण मिळावे

By admin | Updated: November 22, 2014 00:11 IST

वेताळबांबार्डेवासीयांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सिंधुदुर्गनगरी : वेताळबांबार्डे परिसरात रानटी हत्तीच्या वावरामुळे तेथील ग्रामस्थ आणि शाळेतील मुले भयभीत झाली आहेत. वस्तीत येऊन हत्तींनी आतापर्यंत अनेकांना जखमी केल्याने हत्तीपासून वेताळबांबार्डेवासीयांना संरक्षण मिळावे, अशी मागणी वेताळबांबार्डे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.वेताळबांबार्डे गावात रानटी हत्तींचा वावर वाढला आहे. भातशेती, माड बागायती नष्ट करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. सतत हत्तींचा वावर या परिसरात असल्याने ग्रामस्थांना व शाळेतील मुलांना घराबाहेर पडणेही मुश्कील बनले आहे. आतापर्यंत गावातील अनेकांना हत्तीच्या हल्ल्यात सामोरे जावे लागले आहे. हत्तीच्या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. १९ नोव्हेंबर रोजी हत्तीच्या हल्ल्यात वेताळबांबार्डे गावातील ग्रामस्थ गायकवाड हे जबर जखमी झाले आहेत. सध्या ते गोवा बांबुळी येथे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. येत्या आठ दिवसात यावर योग्य निर्णय न घेतल्यास २९ नोव्हेंबरपासून सर्व ग्रामस्थ शाळेतील मुलांना घेऊन मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबार्डे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय गावसभेत घेतला आहे. शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य भारती चव्हाण, पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, सरपंच रोहिणी चव्हाण, उपसरपंच संतोष कदम, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत चव्हाण, माजी सरपंच हरिश्चंद्र कदम, वासू गावडे, शैलजा तावडे, दिलीप सावंत, संजना पाटकर, स्रेहा दळवी, एकनाथ भोगले, अशोक घोगळे, सुभाष सावंत, साजूराम नाईक, योगेश ठाकूर, प्रदीप गावडे, हंशराज चव्हाण आदींसह शाळेतील मुलांसह निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)