शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

रानटी हत्तींपासून संरक्षण मिळावे

By admin | Updated: November 22, 2014 00:11 IST

वेताळबांबार्डेवासीयांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सिंधुदुर्गनगरी : वेताळबांबार्डे परिसरात रानटी हत्तीच्या वावरामुळे तेथील ग्रामस्थ आणि शाळेतील मुले भयभीत झाली आहेत. वस्तीत येऊन हत्तींनी आतापर्यंत अनेकांना जखमी केल्याने हत्तीपासून वेताळबांबार्डेवासीयांना संरक्षण मिळावे, अशी मागणी वेताळबांबार्डे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.वेताळबांबार्डे गावात रानटी हत्तींचा वावर वाढला आहे. भातशेती, माड बागायती नष्ट करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. सतत हत्तींचा वावर या परिसरात असल्याने ग्रामस्थांना व शाळेतील मुलांना घराबाहेर पडणेही मुश्कील बनले आहे. आतापर्यंत गावातील अनेकांना हत्तीच्या हल्ल्यात सामोरे जावे लागले आहे. हत्तीच्या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. १९ नोव्हेंबर रोजी हत्तीच्या हल्ल्यात वेताळबांबार्डे गावातील ग्रामस्थ गायकवाड हे जबर जखमी झाले आहेत. सध्या ते गोवा बांबुळी येथे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. येत्या आठ दिवसात यावर योग्य निर्णय न घेतल्यास २९ नोव्हेंबरपासून सर्व ग्रामस्थ शाळेतील मुलांना घेऊन मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबार्डे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय गावसभेत घेतला आहे. शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य भारती चव्हाण, पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, सरपंच रोहिणी चव्हाण, उपसरपंच संतोष कदम, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत चव्हाण, माजी सरपंच हरिश्चंद्र कदम, वासू गावडे, शैलजा तावडे, दिलीप सावंत, संजना पाटकर, स्रेहा दळवी, एकनाथ भोगले, अशोक घोगळे, सुभाष सावंत, साजूराम नाईक, योगेश ठाकूर, प्रदीप गावडे, हंशराज चव्हाण आदींसह शाळेतील मुलांसह निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)