शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

शासनाला जाग आणण्यासाठी सज्ज व्हा

By admin | Updated: July 10, 2015 22:03 IST

दत्ता इस्वलकर : घरांच्याप्रश्नी गिरणी कामगारांना आवाहन

कणकवली : सत्तेत आलेल्या भाजप शासनाकडून गिरणी कामगारांवरही अन्यायच केला जात आहे. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांवर गिरणी कामगार कृती संघटनेच्यावतीने अनेक लढे उभे करून शासनाचे लक्ष वेधले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांना गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळच नाही. यामुळे शासनाच्या विरोधात तीव्र लढा द्यावा लागेल. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी गिरणी कामगारांनी सज्ज व्हावे, असे आवाहन गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी केले. टेंबवाडी येथील म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्टच्या सभागृहात बुधवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. सेंच्युरी मिलचे नंदू पारकर, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सुनील बोरकर, अण्णा शिर्सेकर, दिनकर मसगे, कमलताई परुळेकर, आदी उपस्थित होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जुलैला सकाळी १० वाजता मुंबईच्या राणीबाग येथून विधानभवनावर गिरणी कामगारांचा लाँग मार्च आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गिरणी कामगारांचे मेळावे घेण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कणकवली येथे हा मेळावा आयोजित केला होता. गिरणी कामगारांसाठी बांधून तयार असलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे मिळण्याचा जो हक्क कायद्याने प्राप्त झाला आहे, त्याची अंमलबजावणी करा, एक लाख ४० हजार कामगारांना घरे मिळालीच पाहिजेत, १६ गिरण्यांच्या म्हाडास दिलेल्या जमिनींवर त्वरित गिरणी कामगारांच्या घराचे बांधकाम सुरू करावे, बांधून तयार असलेल्या घरांची लॉटरी काढावी, या मागण्यांसाठी सर्व गिरणी कामगारांनी एकत्रितपणे मुंबईत धडक द्यायची आहे. या मोर्चामध्ये बहुसंख्येने गिरणी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इस्वलकर यांनी केले. परुळेकर म्हणाल्या, ‘अच्छे दिन’ आयेंगे म्हणत शासनाने गरिबांना नाहीसे करण्याची धोरणे जाहीर करायला सुरुवात केली आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने लोकांनी इच्छा मनात बांधल्या होत्या. त्या तशाच राहिल्या आहेत. यामुळे अच्छे दिनाची हवाच गेली आहे. आता गिरणी कामगारांनी भूलथापांना बळी न पडता १५ जुलैच्या लाँग मार्चमध्ये सहभागी होऊन सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे. सुनील बोरकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिनकर मसगे यांनी तर आभार सुदीप कांबळे यांनी मानले. (वार्ताहर)