शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

शासनाला जाग आणण्यासाठी सज्ज व्हा

By admin | Updated: July 10, 2015 22:03 IST

दत्ता इस्वलकर : घरांच्याप्रश्नी गिरणी कामगारांना आवाहन

कणकवली : सत्तेत आलेल्या भाजप शासनाकडून गिरणी कामगारांवरही अन्यायच केला जात आहे. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांवर गिरणी कामगार कृती संघटनेच्यावतीने अनेक लढे उभे करून शासनाचे लक्ष वेधले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांना गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळच नाही. यामुळे शासनाच्या विरोधात तीव्र लढा द्यावा लागेल. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी गिरणी कामगारांनी सज्ज व्हावे, असे आवाहन गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी केले. टेंबवाडी येथील म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्टच्या सभागृहात बुधवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. सेंच्युरी मिलचे नंदू पारकर, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सुनील बोरकर, अण्णा शिर्सेकर, दिनकर मसगे, कमलताई परुळेकर, आदी उपस्थित होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जुलैला सकाळी १० वाजता मुंबईच्या राणीबाग येथून विधानभवनावर गिरणी कामगारांचा लाँग मार्च आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गिरणी कामगारांचे मेळावे घेण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कणकवली येथे हा मेळावा आयोजित केला होता. गिरणी कामगारांसाठी बांधून तयार असलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे मिळण्याचा जो हक्क कायद्याने प्राप्त झाला आहे, त्याची अंमलबजावणी करा, एक लाख ४० हजार कामगारांना घरे मिळालीच पाहिजेत, १६ गिरण्यांच्या म्हाडास दिलेल्या जमिनींवर त्वरित गिरणी कामगारांच्या घराचे बांधकाम सुरू करावे, बांधून तयार असलेल्या घरांची लॉटरी काढावी, या मागण्यांसाठी सर्व गिरणी कामगारांनी एकत्रितपणे मुंबईत धडक द्यायची आहे. या मोर्चामध्ये बहुसंख्येने गिरणी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इस्वलकर यांनी केले. परुळेकर म्हणाल्या, ‘अच्छे दिन’ आयेंगे म्हणत शासनाने गरिबांना नाहीसे करण्याची धोरणे जाहीर करायला सुरुवात केली आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने लोकांनी इच्छा मनात बांधल्या होत्या. त्या तशाच राहिल्या आहेत. यामुळे अच्छे दिनाची हवाच गेली आहे. आता गिरणी कामगारांनी भूलथापांना बळी न पडता १५ जुलैच्या लाँग मार्चमध्ये सहभागी होऊन सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे. सुनील बोरकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिनकर मसगे यांनी तर आभार सुदीप कांबळे यांनी मानले. (वार्ताहर)