शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला जाग आणण्यासाठी सज्ज व्हा

By admin | Updated: July 10, 2015 22:03 IST

दत्ता इस्वलकर : घरांच्याप्रश्नी गिरणी कामगारांना आवाहन

कणकवली : सत्तेत आलेल्या भाजप शासनाकडून गिरणी कामगारांवरही अन्यायच केला जात आहे. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांवर गिरणी कामगार कृती संघटनेच्यावतीने अनेक लढे उभे करून शासनाचे लक्ष वेधले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांना गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळच नाही. यामुळे शासनाच्या विरोधात तीव्र लढा द्यावा लागेल. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी गिरणी कामगारांनी सज्ज व्हावे, असे आवाहन गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी केले. टेंबवाडी येथील म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्टच्या सभागृहात बुधवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. सेंच्युरी मिलचे नंदू पारकर, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सुनील बोरकर, अण्णा शिर्सेकर, दिनकर मसगे, कमलताई परुळेकर, आदी उपस्थित होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जुलैला सकाळी १० वाजता मुंबईच्या राणीबाग येथून विधानभवनावर गिरणी कामगारांचा लाँग मार्च आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गिरणी कामगारांचे मेळावे घेण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कणकवली येथे हा मेळावा आयोजित केला होता. गिरणी कामगारांसाठी बांधून तयार असलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे मिळण्याचा जो हक्क कायद्याने प्राप्त झाला आहे, त्याची अंमलबजावणी करा, एक लाख ४० हजार कामगारांना घरे मिळालीच पाहिजेत, १६ गिरण्यांच्या म्हाडास दिलेल्या जमिनींवर त्वरित गिरणी कामगारांच्या घराचे बांधकाम सुरू करावे, बांधून तयार असलेल्या घरांची लॉटरी काढावी, या मागण्यांसाठी सर्व गिरणी कामगारांनी एकत्रितपणे मुंबईत धडक द्यायची आहे. या मोर्चामध्ये बहुसंख्येने गिरणी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इस्वलकर यांनी केले. परुळेकर म्हणाल्या, ‘अच्छे दिन’ आयेंगे म्हणत शासनाने गरिबांना नाहीसे करण्याची धोरणे जाहीर करायला सुरुवात केली आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने लोकांनी इच्छा मनात बांधल्या होत्या. त्या तशाच राहिल्या आहेत. यामुळे अच्छे दिनाची हवाच गेली आहे. आता गिरणी कामगारांनी भूलथापांना बळी न पडता १५ जुलैच्या लाँग मार्चमध्ये सहभागी होऊन सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे. सुनील बोरकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिनकर मसगे यांनी तर आभार सुदीप कांबळे यांनी मानले. (वार्ताहर)