शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

शाही गणेशोत्सवाची सांगता-आचरा येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा ४२ दिवसांचा गणराया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 22:13 IST

आचरा : आचरा समुद्रकिनाºयावर काहीसे भावूक झालेले वातावरण..... पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू..... आणि बाप्पा जाऊ नये,

लोकमत न्यूज नेटवर्कआचरा : आचरा समुद्रकिनाºयावर काहीसे भावूक झालेले वातावरण..... पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू..... आणि बाप्पा जाऊ नये, अशी काहीशी मनामध्ये घर करून राहिलेली भावना गुरुवारी सायंकाळी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवसांच्या गणेशमूर्तीला निरोप देताना आचरावासीयांनी अनुभवली. यावेळी असंख्य भाविकांची भावूक स्थिती झाली होती.हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी श्री देव रामेश्वर मंदिर ते आचरा-पिरावाडी समुद्रकिनारा अशी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.जिल्ह्यात सर्वाधिक दिवस चालणारा गणेशोत्सव म्हणून आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवाच्या सागंता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्येक्रम करण्यात आले. दुपारी १२ वाजता श्रींच्या मूर्तीचे उत्तरपूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोलपथक व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक समुद्रकिनारी सरकू लागली.@विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.मिरवणुकीत हिंदू बांधवांबरोबर गावातील मुस्लिम, ख्रिश्चन बांधवही सहभागी झाले होते. मिरवणूक पिरावाडी समुद्रकिनारी दाखल झाल्यानंतर श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. यावेळी मंडळांनी भाविकांना प्रसाद म्हणून मोदक वाटप केले. मावळत्या सूर्याच्या साक्षीनेश्री गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्रकिनारी भाविकांची एकच गर्दी झाली होती. यामुळे सागराबरोबर ‘जनसागरही’ उसळल्याचे चित्र होते.सहा तास मिरवणूकगणेश मिरवणूक रामेश्वर मंदिर ते आचरा तिठा, बाजारपेठमार्गे, भंडारवाडी, काझीवाडी, गाऊडवाडी, आचरा बंदरमार्गे पिरावाडी येथील श्री देव चव्हाट्यावर आली. यावेळी गणेशमूर्र्ती काही वेळ ठेवण्यात आली होती. येथे मच्छिमार बांधवांनी गणरायाचे दर्शन घेतले. सुमारे सहा तास सुरू असलेल्या या विसर्जन मिरवणुकीत स्थानिक भाविक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा येथील भाविकही सहभागी झाले होते. ‘मंगल मूर्ती ....मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी आचरा गाव दुमदुमून गेला होता.