शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शाही गणेशोत्सवाची सांगता-आचरा येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा ४२ दिवसांचा गणराया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 22:13 IST

आचरा : आचरा समुद्रकिनाºयावर काहीसे भावूक झालेले वातावरण..... पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू..... आणि बाप्पा जाऊ नये,

लोकमत न्यूज नेटवर्कआचरा : आचरा समुद्रकिनाºयावर काहीसे भावूक झालेले वातावरण..... पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू..... आणि बाप्पा जाऊ नये, अशी काहीशी मनामध्ये घर करून राहिलेली भावना गुरुवारी सायंकाळी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवसांच्या गणेशमूर्तीला निरोप देताना आचरावासीयांनी अनुभवली. यावेळी असंख्य भाविकांची भावूक स्थिती झाली होती.हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी श्री देव रामेश्वर मंदिर ते आचरा-पिरावाडी समुद्रकिनारा अशी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.जिल्ह्यात सर्वाधिक दिवस चालणारा गणेशोत्सव म्हणून आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवाच्या सागंता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्येक्रम करण्यात आले. दुपारी १२ वाजता श्रींच्या मूर्तीचे उत्तरपूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोलपथक व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक समुद्रकिनारी सरकू लागली.@विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.मिरवणुकीत हिंदू बांधवांबरोबर गावातील मुस्लिम, ख्रिश्चन बांधवही सहभागी झाले होते. मिरवणूक पिरावाडी समुद्रकिनारी दाखल झाल्यानंतर श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. यावेळी मंडळांनी भाविकांना प्रसाद म्हणून मोदक वाटप केले. मावळत्या सूर्याच्या साक्षीनेश्री गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्रकिनारी भाविकांची एकच गर्दी झाली होती. यामुळे सागराबरोबर ‘जनसागरही’ उसळल्याचे चित्र होते.सहा तास मिरवणूकगणेश मिरवणूक रामेश्वर मंदिर ते आचरा तिठा, बाजारपेठमार्गे, भंडारवाडी, काझीवाडी, गाऊडवाडी, आचरा बंदरमार्गे पिरावाडी येथील श्री देव चव्हाट्यावर आली. यावेळी गणेशमूर्र्ती काही वेळ ठेवण्यात आली होती. येथे मच्छिमार बांधवांनी गणरायाचे दर्शन घेतले. सुमारे सहा तास सुरू असलेल्या या विसर्जन मिरवणुकीत स्थानिक भाविक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा येथील भाविकही सहभागी झाले होते. ‘मंगल मूर्ती ....मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी आचरा गाव दुमदुमून गेला होता.