शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

गांधीवादी विचारसरणी आत्मसात करणे गरजेचे : कलानंद मणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 15:57 IST

अशांती दूर करण्यासाठी जात विरहीत समाजपद्धती, शांतीमय समाज, सर्वधर्म सलोखा ही गांधीवादी विचारसरणी आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्याच्या नव्या जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य गांधीजींच्या विचारसरणीमध्ये आहे, असे मत गोवा येथील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कलानंद मणी यांनी कणकवली येथे व्यक्त केले.

कणकवली , दि. ३ : अनेक गावे लुप्त होऊन त्यांचे शहरात रुपांतर होत आहे. एका बाजूने वैभव सामावले आहे, तर दुसºया बाजूने संघर्ष, अशांती आहे. ही अशांती दूर करण्यासाठी जात विरहीत समाजपद्धती, शांतीमय समाज, सर्वधर्म सलोखा ही गांधीवादी विचारसरणी आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्याच्या नव्या जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य गांधीजींच्या विचारसरणीमध्ये आहे, असे मत गोवा येथील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कलानंद मणी यांनी येथे व्यक्त केले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कलानंद मणी यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी ते साबरमती ‘बा-बापू’ ही निघालेली यात्रा सोमवारी गोपुरी आश्रम येथे आली. यावेळी कलानंद मणी बोलत होते.

यावेळी दिल्लीचे रमेश शर्मा, डॉ. जेकॉब, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, हरिहर वाटवे, लक्ष्मण गायकवाड, नरेश भाई आदी गांधीवादी विचारवंत कार्यकर्त्यांसमवेत गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, अर्पिता मुंबरकर, मुरादअली शेख व राष्ट्रसेवा दलाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी रमेश शर्मा म्हणाले, सध्याची जीवनशैली ही भोगवादी जीवनशैली आहे. गांधीजींचे विचार युवावर्गाने समजून घेणे गरजेचे आहे. वर्तमान जग अशांती, संघर्ष यांच्या वणव्यात गुरफटले असताना गांधीजींचे विचार शांतता, सद्भाव, अहिंसा आणि परस्पर सहजीवनाचा संदेश देणारे आहेत. हे विचार म्हणजे भविष्यातील पिढीला वैचारिक स्पष्टतेचे अधिष्ठान आहे. तरूण पिढीने विकासाचे प्रकल्प राबविताना चिरस्थायी विचार करून राबवावेत. युवावर्गापर्यंत गांधीजींचे विचार पोहोचविण्याच्या हेतूने ‘बा-बापू’ ही यात्रा काढण्यात येत आहे. समाजातील सज्जन शक्ती सक्रिय होण्याच्या दृष्टीने आम्ही यात्रेतून प्रयत्न करत असल्याचे  त्यांनी सांगितले.

वैशाली पाटील म्हणाल्या, नैसर्गिक वातावरणाचा विचार समाजपातळीवर होत आहे. भविष्यात पर्यावरण वाचवायचे असेल तर गांधीवादी विचार आवश्यक आहेत. कोकणात मायनिंग, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, जागतिकीकरण, खासगीकरणाचे प्रश्न आहेत. याविषयी समाजपातळीवर अनेक लढे सुरू आहेत. या लढ्यांना हिंसक वळण न देता गांधीजींच्या विचाराने लढून त्यावर विजय प्राप्त करावा. सरकारच्या चुका गांधीमार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करावा. 

गोपुरी आश्रमाच्या उपक्रमांमध्ये गांधीवादी विचारांचा स्पर्श आहे. राष्ट्रसेवा दलात युवक-युवतींचा सहभाग पाहता पुढील पिढीसाठी हीच या विचारांची आशा आहे. अनेक चळवळींसाठी गोपुरीसारख्या संस्था कार्यरत आहेत. हे समाजाच्या दृष्टीने हिताचे आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. जेकॉब म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्याखाली युवा पिढी भरकटत आहे. याचा चांगला वापर केल्यास समाज घडविण्यात उपयोग होईल. त्यामुळे गांधीवादी मंडळींनी गांधीजींचे विचार युवापिढीपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.