शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

अतिउत्साही पर्यटकांना लगाम

By admin | Updated: May 25, 2016 00:24 IST

दोन किल्ल्यांचाही समावेश : ६१ किमी सागर किनारा करणार स्वच्छ

सिंधुदुर्गनगरी : सागरी किनारा स्वच्छता मोहिमेंतर्गत २६ मे रोजी जिल्ह्यातील ३४ सागर किनारे व सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या दोन किल्ल्यांची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. पर्यटनस्थळांवर पर्यटकांकडून स्वच्छता राखली जावी तसेच सार्वजनिक ठिकाणी वर्तनात व पोषाखात योग्य ते तारतम्य पाळले जावे यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.सागरी किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वच्छता व पाणी मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत २६ मे रोजी वेंगुर्ले, मालवण व देवगड तालुक्यातील ३४ सागर किनारे व सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या दोन किल्ल्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. ६१ किलोमीटर अंतराच्या या किनारपट्टीसाठी ३६ ठिकाणी नोडल आॅफिसरांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महसूल कर्मचारी, पंचायत समिती, नगरपंचायत कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ, मंडळे यांचा सहभाग होणार आहे. या अंतर्गत सुका कचरा, ओला कचरा, प्लास्टिक कचरा व काचेच्या बाटल्या याचे विलगीकरण करण्यात येणार आहे. गोळा केलेला कचरा वेंगुर्ला नगरपालिकेच्या स्वच्छता प्रक्रिया यंत्राद्वारे निर्गत केला जाणार आहे. यासाठी यूएनडीपीमार्फत स्वच्छता दुतांसाठी टी-शर्ट, टोपी, हॅण्डग्लोव्हज्चा पुरवठा करण्यात आला आहे. ही स्वच्छता मोहिम सकाळी ७ ते ९ या वेळेत राबविली जाणार आहे. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.पावसाळी पर्यटनात अति उत्साही पर्यटकांना बंधने घालण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोषाख कसा असावा तसेच वर्तन शिस्तीचे असावे ज्यामुळे पर्यटनस्थळी कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना धास्ती वाटणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. पर्यटनस्थळी स्वच्छता ठेवावी यासाठी कडक निर्बंध घातले जाणार आहेत. पावसाळी पर्यटन व त्यानंतरही जिल्ह्यात येणारे पर्यटक बिनधोक सर्वत्र जावू शकतील यासाठी पोलिसांची मदतही घेतली जाणार असल्याचे अनिल भंडारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोहिम सुरू ठेवणार : सिंहसिंधुदुर्गातील विविध पर्यटनस्थळांवरील साफसफाई व स्वच्छता कायम रहावी यासाठी भविष्यात अशी स्वच्छता मोहिम दोन ते तीन महिन्यांनी घेतली जाणार आहे. त्यावेळी शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही सहभाग घेतला जाईल असे शेखर सिंह यांनी सांगितले.