शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कुणबी समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा

By admin | Updated: August 5, 2014 00:19 IST

स्वातंत्र्य मिळूनही तिल्लोरी कुणबी समाजासमोर आजही विविध प्रश्न

चिपळूण : स्वातंत्र्य मिळूनही तिल्लोरी कुणबी समाजासमोर आजही विविध प्रश्न आहेत. हा समाज मागासलेला असून्,ा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आदी क्षेत्रातही तो पिछाडीवर आहे. बेदखल कुळ आदींसारखे प्रश्न भेडसावत आहेत. या समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे, यासाठी १२ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा कोकण कुणबी आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपीनाथ झेपले यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिला.यावेळी ज्येष्ठ नेते दादा बैकर, दौलत पोस्टुरे, चंद्रकांत मोहिते, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश खापले, दिलीप गीते, शरद शिगवण, तालुकाध्यक्ष संदेश गोरिवले, आशा राक्षे, नगरसेवक सुरेखा खेराडे, अंजली बैकर, नंदिनी खांबे, प्रिया भुवड, रसिका म्हादे, सुगंधा हरेकर, शुभांगी लोलम, रमेश राणे, दीपक वारोसे, वसंत उदेग, चंद्रकांत राणे, चंद्रकांत मांडवकर आदींसह समाजबांधव यावेळी उपस्थित होते.तिल्लोरी कुणबी समाज आजही मागासलेला आहे. गेली ६५ वर्षे राज्यकर्त्यांनी राजकारणासाठी या समाजाचा उपयोग करुन घेतला. बेदखल कुळांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सरकारचा कायदा हा समाजहिताचा नाही. पारंपरिक घरे आमच्या नावावर असली तरी सातबारा उतारा देण्यास दिरंगाई केली जात आहे. अनुसूचित जाती-जमातीमध्ये या समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नोकरी व शिक्षणापासून हा समाज वंचित आहे. कुणबी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, नोकरी आणि अन्य क्षेत्रात आरक्षण मिळावे, यासाठी शामराव पेजे समितीने १९८२ मध्ये अहवाल सादर केला होता. त्याला ३२ वर्षे झाली तरी शासनाला हा अहवाल वाचण्यास वेळ नाही. कोणतीही निवडणूक आली की, केवळ गाजर दाखवण्याचे काम केले जाते. यापूर्वी पाच समित्या नेमण्यात आल्या. मात्र, एकही समितीचा अहवाल जाहीर करण्यात आला नाही. मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले. शासनाची ही भूमिका दुटप्पी आहे. आरक्षण नसल्यामुळे शेती करुन जगणारा कुणबी समाज अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे, अशी खंत झेपले यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)राज्यकर्त्यांनी कुणबी समाजाचा केवळ राजकारणासाठी उपयोग करुन घेतला आहे. न्याय हक्कांपासून हा समाज कोसोदूर आहे. जे निवडून गेले त्यांनी स्वत:चे हीत बघितले, समाजाचे हीत कोण बघणार ? आता समाज जागृती करण्यासाठी कोकण कुणबी आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुका व जिल्हापातळीवर कार्यकारिणीचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या समाजाला अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे, असे दादा बैकर यांनी सांगितले.