शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

कुणबी समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा

By admin | Updated: August 5, 2014 00:19 IST

स्वातंत्र्य मिळूनही तिल्लोरी कुणबी समाजासमोर आजही विविध प्रश्न

चिपळूण : स्वातंत्र्य मिळूनही तिल्लोरी कुणबी समाजासमोर आजही विविध प्रश्न आहेत. हा समाज मागासलेला असून्,ा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आदी क्षेत्रातही तो पिछाडीवर आहे. बेदखल कुळ आदींसारखे प्रश्न भेडसावत आहेत. या समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे, यासाठी १२ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा कोकण कुणबी आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपीनाथ झेपले यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिला.यावेळी ज्येष्ठ नेते दादा बैकर, दौलत पोस्टुरे, चंद्रकांत मोहिते, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश खापले, दिलीप गीते, शरद शिगवण, तालुकाध्यक्ष संदेश गोरिवले, आशा राक्षे, नगरसेवक सुरेखा खेराडे, अंजली बैकर, नंदिनी खांबे, प्रिया भुवड, रसिका म्हादे, सुगंधा हरेकर, शुभांगी लोलम, रमेश राणे, दीपक वारोसे, वसंत उदेग, चंद्रकांत राणे, चंद्रकांत मांडवकर आदींसह समाजबांधव यावेळी उपस्थित होते.तिल्लोरी कुणबी समाज आजही मागासलेला आहे. गेली ६५ वर्षे राज्यकर्त्यांनी राजकारणासाठी या समाजाचा उपयोग करुन घेतला. बेदखल कुळांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सरकारचा कायदा हा समाजहिताचा नाही. पारंपरिक घरे आमच्या नावावर असली तरी सातबारा उतारा देण्यास दिरंगाई केली जात आहे. अनुसूचित जाती-जमातीमध्ये या समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नोकरी व शिक्षणापासून हा समाज वंचित आहे. कुणबी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, नोकरी आणि अन्य क्षेत्रात आरक्षण मिळावे, यासाठी शामराव पेजे समितीने १९८२ मध्ये अहवाल सादर केला होता. त्याला ३२ वर्षे झाली तरी शासनाला हा अहवाल वाचण्यास वेळ नाही. कोणतीही निवडणूक आली की, केवळ गाजर दाखवण्याचे काम केले जाते. यापूर्वी पाच समित्या नेमण्यात आल्या. मात्र, एकही समितीचा अहवाल जाहीर करण्यात आला नाही. मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले. शासनाची ही भूमिका दुटप्पी आहे. आरक्षण नसल्यामुळे शेती करुन जगणारा कुणबी समाज अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे, अशी खंत झेपले यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)राज्यकर्त्यांनी कुणबी समाजाचा केवळ राजकारणासाठी उपयोग करुन घेतला आहे. न्याय हक्कांपासून हा समाज कोसोदूर आहे. जे निवडून गेले त्यांनी स्वत:चे हीत बघितले, समाजाचे हीत कोण बघणार ? आता समाज जागृती करण्यासाठी कोकण कुणबी आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुका व जिल्हापातळीवर कार्यकारिणीचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या समाजाला अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे, असे दादा बैकर यांनी सांगितले.