शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

दलित अत्याचाराविरोधात मोर्चा

By admin | Updated: October 31, 2014 23:30 IST

जावखेडे हत्याकांडाचा निषेध : सूत्रधारांना अटक करण्याची मागणी

कणकवली : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जावखेडे गावातील जाधव कुटुंबीयांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ दलित अत्याचारविरोधी संघर्ष समितीच्यावतीने कणकवलीत शुक्रवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार संतोष खरात यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन शिष्टमंडळाने दिले. नगरमधील हत्याकांडाच्या सूत्रधारांना तत्काळ अटक करावी, हत्येच्या चौकशीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन करण्यात यावे, दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये गुन्हेगार का सुटतात? याचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ समिती स्थापन करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.जावखेडे येथील संजय जाधव, जयश्री जाधव व त्यांचा मुलगा सुनिल यांची भीषण हत्या करण्यात आली. आधी खैरलांजी नंतर खर्डा आणि आता जावखेडे येथील ही जातीय अत्याचाराची तिसरी घटना आहे. या घटनेने महाराष्ट्रातील दलित समाज कधी नव्हे इतका हादरून गेला आहे. खैरलांजी हत्याकांडात महाराष्ट्र सरकारने गुन्हेगारांनाच अभय देण्याची भूमिका घेतल्याने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. किंबहुना अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा हेतूपुरस्सर कमजोर करण्यात आल्याने दलित अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहेत. जातीय अत्याचारापासून मुक्ती मिळण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक संरक्षण मिळवून दिले. मात्र, या कायद्यांची कठोर अंमलबजावणी सत्ताधाऱ्यांनी टाळल्याने दलित अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच आहेत.खैरलांजी हत्याकांडानंतर दलित समुदायाने तीव्र आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार दलितांवरील जातीय अत्याचाराबद्दल गंभीर नाही, हे जावखेडे येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाने सिद्ध झाले आहे. नगर जिल्ह्याला दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्र सरकारने तातडीने घोषित करून प्राधान्याने तेथील दलितांच्या सुरक्षेबाबत गंभीर पावले उचलणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात प्रा.राजेंद्र मुंबरकर, सुरेश कदम, प्रमिता तांबे, विनायक हरकुळकर, स्वाती तेली, प्रदीप सर्पे, सुदीप कांबळे, सिद्धार्थ तांबे, व्ही.जी.कदम, अमोल कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)