शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

दलित अत्याचाराविरोधात मोर्चा

By admin | Updated: October 31, 2014 23:30 IST

जावखेडे हत्याकांडाचा निषेध : सूत्रधारांना अटक करण्याची मागणी

कणकवली : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जावखेडे गावातील जाधव कुटुंबीयांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ दलित अत्याचारविरोधी संघर्ष समितीच्यावतीने कणकवलीत शुक्रवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार संतोष खरात यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन शिष्टमंडळाने दिले. नगरमधील हत्याकांडाच्या सूत्रधारांना तत्काळ अटक करावी, हत्येच्या चौकशीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन करण्यात यावे, दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये गुन्हेगार का सुटतात? याचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ समिती स्थापन करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.जावखेडे येथील संजय जाधव, जयश्री जाधव व त्यांचा मुलगा सुनिल यांची भीषण हत्या करण्यात आली. आधी खैरलांजी नंतर खर्डा आणि आता जावखेडे येथील ही जातीय अत्याचाराची तिसरी घटना आहे. या घटनेने महाराष्ट्रातील दलित समाज कधी नव्हे इतका हादरून गेला आहे. खैरलांजी हत्याकांडात महाराष्ट्र सरकारने गुन्हेगारांनाच अभय देण्याची भूमिका घेतल्याने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. किंबहुना अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा हेतूपुरस्सर कमजोर करण्यात आल्याने दलित अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहेत. जातीय अत्याचारापासून मुक्ती मिळण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक संरक्षण मिळवून दिले. मात्र, या कायद्यांची कठोर अंमलबजावणी सत्ताधाऱ्यांनी टाळल्याने दलित अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच आहेत.खैरलांजी हत्याकांडानंतर दलित समुदायाने तीव्र आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार दलितांवरील जातीय अत्याचाराबद्दल गंभीर नाही, हे जावखेडे येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाने सिद्ध झाले आहे. नगर जिल्ह्याला दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्र सरकारने तातडीने घोषित करून प्राधान्याने तेथील दलितांच्या सुरक्षेबाबत गंभीर पावले उचलणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात प्रा.राजेंद्र मुंबरकर, सुरेश कदम, प्रमिता तांबे, विनायक हरकुळकर, स्वाती तेली, प्रदीप सर्पे, सुदीप कांबळे, सिद्धार्थ तांबे, व्ही.जी.कदम, अमोल कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)