शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: February 20, 2015 23:13 IST

केवळ आश्वासनच : मुंबईतील राज्यव्यापी धरणे आंदोलनाची तयारी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, आश्वासनाशिवाय पदरी काहीच न पडल्याने आता या कर्मचाऱ्यांनी येत्या ४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, शासकीय सेवाकाळात मृत्यू पावल्यास कर्मचाऱ्याच्या पाल्यास अथवा पत्नीस विनाअट सेवेत सामावून घ्यावे, शासकीय सेवा करत असताना काही कारणास्तव सेवा करणे शक्य होत नसल्यास त्याच्या पाल्यास सेवेत सामावून घेणे, प्रदीर्घ काळापासून बदली कर्मचारी म्हणून शासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यास शासकीय सेवेत कायम करणे, गणवेशासाठी २५०० रूपये मंजूर करण्यात यावेत. ग्रेड पे मध्ये बदल करावा, आदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी राज्य कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष एम. एम. पठाण व त्यांच्या सहकारी राज्य संघटनेवरील सर्व कार्यकारिणी यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे अखेर शासनाने या कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता मंजूर केला आहे. मात्र, उर्वरित मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी मध्यवर्ती संघटनेने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्याच्या पूर्ततेच्या दृष्टीने कुठलीच हालचाल शासनस्तरावर झालेली नाही. त्यामुळे आता या सर्व कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरावर पुन्हा आंदोलन करण्याची तयारी केली आहे. ४ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या राज्यस्तरीय ठिय्या आंदोलनासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)