शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

रत्नागिरीत चार मतदान केंद्र संवेदनशील

By admin | Updated: September 15, 2014 23:21 IST

प्रसाद उकर्डे : दोन तालुक्यात ३४१ केंद्रांवर होणार मतदान

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन तालुक्यातील मिळून एकूण ३४१ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी रत्नागिरी शहरातील चार मतदान केंद्र संवेदनशील असल्याने त्यांच्यावर सेंट्रल वेब कास्टिंगद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी विधानसभा मतदार संघाची माहिती देण्यासाठी उकर्डे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. १५ आॅक्टोबरला राज्यात विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. १९ रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया शहरानजीकच्या कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे व्हावे, यासाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन्ही मतदारसंघात एकूण ३४१ मतदान केंद्र आहेत. यामध्ये रत्नागिरीतील ३१०, तर संगमेश्वरातील ३१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रात एकूण २६ क्षेत्र असून, २९ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची, तर ३७५ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी एकूण १ हजार ९०४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी १२ समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये परिवहन व्यवस्थापन समिती, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती, खर्च नियंत्रण समिती, संगणकीकरण समिती, निवडणूक आयोग निरीक्षक समिती आदी समित्यांचा समावेश असल्याची माहिती उकर्डे यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावरून निवडणूक खर्च संनियंत्रण समितीअंतर्गत माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती, भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथके आणि लेखा पथक स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी - संगमेश्वर मतदार संघात एकूण २ लाख ६२ हजार ८९४ मतदार असून, अजूनही मतदार यादी नोंदणीचा कार्यक्रम सुरू असल्याने मतदारांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे उकर्डे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सेंट्रल वेब कास्टिंगद्वारे लक्ष ठेवणार.रत्नागिरीतील ३१०, तर संगमेश्वरातील ३१ मतदान केंद्रांचा समावेश.मतदान केंद्रात एकण २६ क्षेत्र असून, २९ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची, तर ३७५ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती.एकूण १ हजार ९०४ कर्मचारी तैनात.निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत निवडणूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्षात निवडणुकीसंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची नोंद ठेवण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही माहिती हवी असल्यास ०२३५२-२२६२४८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.