शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत चार मतदान केंद्र संवेदनशील

By admin | Updated: September 15, 2014 23:21 IST

प्रसाद उकर्डे : दोन तालुक्यात ३४१ केंद्रांवर होणार मतदान

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन तालुक्यातील मिळून एकूण ३४१ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी रत्नागिरी शहरातील चार मतदान केंद्र संवेदनशील असल्याने त्यांच्यावर सेंट्रल वेब कास्टिंगद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी विधानसभा मतदार संघाची माहिती देण्यासाठी उकर्डे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. १५ आॅक्टोबरला राज्यात विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. १९ रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया शहरानजीकच्या कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे व्हावे, यासाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन्ही मतदारसंघात एकूण ३४१ मतदान केंद्र आहेत. यामध्ये रत्नागिरीतील ३१०, तर संगमेश्वरातील ३१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रात एकूण २६ क्षेत्र असून, २९ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची, तर ३७५ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी एकूण १ हजार ९०४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी १२ समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये परिवहन व्यवस्थापन समिती, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती, खर्च नियंत्रण समिती, संगणकीकरण समिती, निवडणूक आयोग निरीक्षक समिती आदी समित्यांचा समावेश असल्याची माहिती उकर्डे यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावरून निवडणूक खर्च संनियंत्रण समितीअंतर्गत माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती, भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथके आणि लेखा पथक स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी - संगमेश्वर मतदार संघात एकूण २ लाख ६२ हजार ८९४ मतदार असून, अजूनही मतदार यादी नोंदणीचा कार्यक्रम सुरू असल्याने मतदारांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे उकर्डे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सेंट्रल वेब कास्टिंगद्वारे लक्ष ठेवणार.रत्नागिरीतील ३१०, तर संगमेश्वरातील ३१ मतदान केंद्रांचा समावेश.मतदान केंद्रात एकण २६ क्षेत्र असून, २९ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची, तर ३७५ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती.एकूण १ हजार ९०४ कर्मचारी तैनात.निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत निवडणूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्षात निवडणुकीसंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची नोंद ठेवण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही माहिती हवी असल्यास ०२३५२-२२६२४८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.