शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

आगवे ग्रामपंचायतीचा चारवेळा तंटामुक्तीचा डंका

By admin | Updated: February 4, 2015 23:56 IST

वादविवादांना केले हद्दपार : ग्रामस्थांच्या असलेल्या एकमुखी सहभागामुळे गावात शांतता

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -सलग चारवेळा तंटामुक्त होण्याचा सन्मान चिपळूण तालुक्यातील आगवे ग्रामपंचायतीने मिळवला आहे. गावात कोणतेच वादविवाद नसल्याने तंटामुक्त आहे. प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थांच्या असलेला एकमुखी सहभागामुळे गावात शांतता नांदत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २००७ पासून तंटामुक्त गाव अभियानाला प्रारंभ झाला. दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर प्रकारचे तंटे सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. तडजोडीने मिटणारे सर्व तंटे गावातच मिटावेत, यासाठी गावपातळीवर समित्या प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. आगवे गावातही २००७ पासून तंटामुक्त अभियान राबविण्यात येत आहे. गावाची लोकसंख्या १९६१ इतकी असून, ९ वाड्यांमध्ये गाव वसलेला आहे. २००९ साली आगवे ग्रामपंचायतीला तंटामुक्त पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर आतापर्यंत सलग चारवेळा तंटामुक्त होण्याचा उपक्रम गावाने केला आहे. गावामध्ये विविध धर्मीय मंडळी असली, तरी सणवार एकत्र व शांततेने साजरे केले जातात. गणेशोत्सव व शिमगोत्सवही उत्साहाने साजरा करण्यात येतो. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी तर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मुंबईतील मनुष्यबळ विकास संस्थेतर्फे गावाच्या कार्याची दखल घेत गावाला यावर्षी ‘गुणीजन’ पुरस्कार बहाल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली स्वच्छता मोहीम गावामध्ये प्राधान्याने राबवण्यात आली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये स्वच्छता करण्यात आली. गावाला मिळालेल्या तंटामुक्त पारितोषिकांच्या रकमेतून गावामध्ये शासनाच्या अध्यादेशानुसार विविध उपक्रम राबविण्यात आले. सांस्कृतिक, क्रीडा व समाज प्रबोधनासारखे उपक्रम राबवण्यात येतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पारितोषिकेही देण्यात येत आहे.गावात एकोपा कायमआगवे गाव लहान असले तरी सुमारे दोन हजार लोकवस्तीचे आहे. २००७ पासून तंटामुक्त गाव अभियानास प्रारंभ झाला. तेव्हापासून गावात तंटामुक्त अभियान राबविण्यात येत आहे. गावातील तंटे मिटवण्याबरोबर गावात शांतता राखण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे. प्रत्येक कार्यक्रम राबवित असताना ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळते. एनकेन प्रकारे कोणताही वाद निर्माण झाला तर दोन्ही गटातील मंडळींना एकत्र बसवून ते वाद सोडवितो. पक्षकारही तंटामुक्त समितीच्या निर्णयाचे पालन करतात.- जयंत घडशी, सरपंच, ग्रामपंचायत आगवे.व्यसनमुक्तीसाठी प्रयत्नशीलतंटामुक्त अभियान राबवताना व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवण्यात येत आहे. गावामध्ये शंभर टक्के दारूबंदी व गुटखाबंदी करण्यात आली आहे. व्यसनाचे दुष्परिणाम आरोग्यावर होत असल्याने, ग्रामस्थांचे वेळोवेळी प्रबोधन करण्यात येत आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता गावात प्लास्टिक बंदी केली आहे. प्लास्टिक पिशव्या खाद्यपदार्थाबरोबर जनावरांच्या पोटात जाऊन, त्याचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, वापरावरच बंदी घातली असून, कापडी पिशव्या वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गावात राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला ग्रामस्थांना प्रतिसाद लाभत आहे.- एस. बी. म्हाडळकर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत आगवे.आठ वर्षे तंटामुक्त समितीवर कार्यरत२००७ साली तंटामुक्त अभियान सुरू झाले. तेव्हापासून समितीचे अध्यक्षस्थान भूषवित आहे. गावामध्ये कोणतेही तंटे नाही. जमिनीवरून किंवा अन्य कारणावरून वाद झालाच, तर तो मिटवण्याचा १०० टक्के प्रयत्न करतो. ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असल्यानेच, सलग चारवेळा तंटामुक्त होण्याचा बहुमान मिळाला. २००९ साली मिळालेल्या तंटामुक्त अभियानाच्या दोन लाख पारितोषिकाच्या रकमेचा शासकीय अध्यादेशाने विनियोग करण्यात आला. गाव तंटामुक्त राहील, प्रयत्नशील राहू.- बाबासाहेब भुवड, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत आगवे.