शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

चार हजार विद्यार्थी अप्रगत श्रेणीत

By admin | Updated: November 18, 2015 00:04 IST

शिक्षण समिती सभेत उघड : शिक्षणमंत्र्यांच्या ‘त्या’ धोरणाला कडाडून विरोध

सिंधुदुर्गनगरी : विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणी सर्वेक्षणातून तब्बल चार हजार विद्यार्थी हे अप्रगत श्रेणीत असल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. या विद्यार्थ्यांना प्रगत श्रेणीत आणण्यासाठी शिक्षकांसमोर मोठे आव्हान आहे. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करणे हा शासनाचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी मारक असल्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत आहे, असा समिती सभेत आरोप करत आता दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे सूतोवाच करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांच्या धोरणाला कडाडून विरोध करत तसा ठरावही घेण्यात आला.जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य प्रकाश कवठणकर, राजेंद्र म्हापसेकर, वैशाली रावराणे, सुकन्या नरसुले, संघटना प्रतिनिधी संजय बगळे, संतोष पाताडे, फादर लोबो, समिती सचिव तसेच शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या १४६८ शाळांमध्ये शासन आदेशान्वये विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीचे मूल्यांकन करण्यात आले होते. यातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल ४ हजार विद्यार्थी हे अप्रगत आहेत. हे सर्व विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवी इयत्तेमधील आहेत. सातवी इयत्तेत असणारा विद्यार्थी अप्रगत म्हणून गणला गेला, तर तो विद्यार्थी प्रगत श्रेणीत आल्याशिवाय त्याला आठव्या इयत्तेत प्रवेश घेता येणार नाही.आठवीपर्यंत ना परीक्षा फक्त पास हे राज्य शासनाचे धोरण अप्रगत मुलांसाठी मारक ठरत आहे. आता तर शिक्षणमंत्र्यांनी दहावीपर्यंत परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पासकरण्याचे सूतोवाच केले असल्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धीक पातळी खुंटणार आहे. या सर्व धोरणांना आमचा विरोध असूनदहावीपर्यंत परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांना पास अगर नापास ठरवावे, असा एकमुखी ठराव आजच्या शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्ये जरी गुणवत्ता व बौद्धीक क्षमता चांगल्याप्रकारे असली तरी विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलत नाही. त्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त इतर सर्वसामान्य माहितीचे ज्ञान असणे आवश्यक असल्याची खंत सदस्य प्रकाश कवठणकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)अनुदान ठप्प झाल्याने ई-लर्निंग शाळा बंदशिक्षण विभागाने गतवर्षी वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले व उभादांडा शाळा नं. १ या दोन शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा सुरू केली खरी. मात्र अनुदानाअभावी या दोन शाळांमधील ही सुविधा कोलमडली आहे. हा मुद्दा सदस्या सुकन्या नरसुले यांनी मांडला होता. यावर उत्तर देताना शिक्षणाधिकारी म्हणाले, सादीलमधून या शाळांचा खर्च भागवायचा आहे. मात्र शासनाकडून गेली दोन वर्षे सादीलची रक्कमच मिळाली नसल्याने हे अनुदान रखडले आहे.