शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार विद्यार्थी अप्रगत श्रेणीत

By admin | Updated: November 18, 2015 00:04 IST

शिक्षण समिती सभेत उघड : शिक्षणमंत्र्यांच्या ‘त्या’ धोरणाला कडाडून विरोध

सिंधुदुर्गनगरी : विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणी सर्वेक्षणातून तब्बल चार हजार विद्यार्थी हे अप्रगत श्रेणीत असल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. या विद्यार्थ्यांना प्रगत श्रेणीत आणण्यासाठी शिक्षकांसमोर मोठे आव्हान आहे. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करणे हा शासनाचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी मारक असल्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत आहे, असा समिती सभेत आरोप करत आता दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे सूतोवाच करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांच्या धोरणाला कडाडून विरोध करत तसा ठरावही घेण्यात आला.जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य प्रकाश कवठणकर, राजेंद्र म्हापसेकर, वैशाली रावराणे, सुकन्या नरसुले, संघटना प्रतिनिधी संजय बगळे, संतोष पाताडे, फादर लोबो, समिती सचिव तसेच शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या १४६८ शाळांमध्ये शासन आदेशान्वये विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीचे मूल्यांकन करण्यात आले होते. यातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल ४ हजार विद्यार्थी हे अप्रगत आहेत. हे सर्व विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवी इयत्तेमधील आहेत. सातवी इयत्तेत असणारा विद्यार्थी अप्रगत म्हणून गणला गेला, तर तो विद्यार्थी प्रगत श्रेणीत आल्याशिवाय त्याला आठव्या इयत्तेत प्रवेश घेता येणार नाही.आठवीपर्यंत ना परीक्षा फक्त पास हे राज्य शासनाचे धोरण अप्रगत मुलांसाठी मारक ठरत आहे. आता तर शिक्षणमंत्र्यांनी दहावीपर्यंत परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पासकरण्याचे सूतोवाच केले असल्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धीक पातळी खुंटणार आहे. या सर्व धोरणांना आमचा विरोध असूनदहावीपर्यंत परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांना पास अगर नापास ठरवावे, असा एकमुखी ठराव आजच्या शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्ये जरी गुणवत्ता व बौद्धीक क्षमता चांगल्याप्रकारे असली तरी विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलत नाही. त्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त इतर सर्वसामान्य माहितीचे ज्ञान असणे आवश्यक असल्याची खंत सदस्य प्रकाश कवठणकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)अनुदान ठप्प झाल्याने ई-लर्निंग शाळा बंदशिक्षण विभागाने गतवर्षी वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले व उभादांडा शाळा नं. १ या दोन शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा सुरू केली खरी. मात्र अनुदानाअभावी या दोन शाळांमधील ही सुविधा कोलमडली आहे. हा मुद्दा सदस्या सुकन्या नरसुले यांनी मांडला होता. यावर उत्तर देताना शिक्षणाधिकारी म्हणाले, सादीलमधून या शाळांचा खर्च भागवायचा आहे. मात्र शासनाकडून गेली दोन वर्षे सादीलची रक्कमच मिळाली नसल्याने हे अनुदान रखडले आहे.