शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

चौपदरीकरणाचा शुभारंभ आॅक्टोबरमध्ये

By admin | Updated: July 23, 2016 23:47 IST

विनायक राऊत : महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजविण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ येत्या आॅक्टोबर महिन्यात करण्यात येणार असल्याची माहीती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गाची पाहणी करून कणकवली ते झाराप रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरील धोकादायक खड्डे तात्काळ बुजवा, असे आदेश त्यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.महामार्गावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून कणकवली येथील तलाठी उत्तम पवार यांचा शुक्रवारी या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी घेतली असून शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरातूप जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे कुडाळ तालुकाध्यक्ष राजन नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ, पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे, महामार्ग विभागाचे उपअभियंता ए. टी. आवटे व अन्य अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कुडाळ येथील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी यावेळी त्यांनी केली व रविवारी सकाळपासून कणकवली ते झाराप या महामार्गाची तात्काळ दुरूस्ती करावी असे आदेश दिले. खासदार राऊत या महामार्गाची पाहणी करीत असताना तेथून कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे जात होते त्यांनी त्याठिकाणी थांबून महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती खासदारांना दाखविली. महामार्गाची स्थिती अत्यंत धोकादायक बनली असून उपाययोजना करणे गरजेचे आहे. रविवारी सकाळपासून कणकवली ते झाराप या महामार्गाची दुरूस्ती करावी व याठिकाणी सुरू असलेले काम पाहण्यासाठी आपण तेथे उपस्थित राहणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्ह्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो असून जिल्ह्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)