शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आडाळी एमआयडीसीत मंत्री केसरकर खोडा घालताहेत, राजन तेलींचा आरोप

By अनंत खं.जाधव | Updated: August 18, 2023 14:27 IST

सावंतवाडी : आडाळी येथे एमआयडीसी होऊन दहा वर्षे उलटून गेले तरी तेथे उद्योग येत नाही. याला मंत्री दीपक केसरकर ...

सावंतवाडी : आडाळी येथे एमआयडीसी होऊन दहा वर्षे उलटून गेले तरी तेथे उद्योग येत नाही. याला मंत्री दीपक केसरकर स्थानिक आमदार म्हणून जबाबदार असून, उद्योग येऊ नये म्हणून तेच वेगवेगळ्या मार्गाने खोडा घालत आहेत. त्यामुळे आडाळी येथील ग्रामस्थ काढत असलेल्या लाँग मार्चच्या पाठीशी असून आम्ही सत्तेवर असलो तरी या लाँग मार्चला पाठींबा देत असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी जाहीर केले आहे.ते शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, महेश धुरी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.तेली म्हणाले, स्वातंत्र्य दिनी ओरोस येथे बांदा येथे तालुका क्रीडांगण व्हावे म्हणून माजी उप सभापती शितल राऊळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. यावेळी मंत्री केसरकर यांनी तालुका क्रीडांगण सावंतवाडी येथे होणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या या हेकेखोरपणाला आंदोलनकर्त्यांनी विरोध दर्शविला.राज्याचे तत्कालीन क्रीडामंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तालुका क्रीडांगण व्हावे म्हणून मंजुरी देऊन बांधकामची १३ एकर जमीन क्रीडांगणासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. सावंतवाडी जिमखाना मैदानावर फक्त दीड एकर जमीन क्रीडांगणासाठी आहे. त्यामुळे बांदा येथे तेरा एकर जमिनीवर क्रीडांगण व्हावे म्हणून मागणी केली आहे. त्याला मंत्री केसरकर यांचा होत असलेला विरोध निरर्थक असल्याचेही तेली म्हणाले.जिल्ह्यात अनेक एमआयडीसी आहेत. पण त्याची अवस्था बघितली तर नवनवीन उद्योग यावेत यासाठी आडाळी एमआयडीसी सुरू होणे गरजेची आहे. मात्र दहा वर्षे उलटून गेली तरी अद्याप ही याठिकाणी विविध सोयीसुविधा देऊन ही उद्योजक का येत नाही याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे. हाकेच्या अंतरावर मोपा विमानतळ आहे. मग उद्योजक का येत नाही असा सवाल तेली यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली Deepak Kesarkarदीपक केसरकर