शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कायम करण्यांसाठी वनमजुरांचे उपोषण सुरू, वनीकरण विभागाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 10:48 IST

विविध योजनेंतर्गत वृक्ष लागवड केलेल्या वनमजुरांना वनीकरण विभागाने वाऱ्यावर सोडले आहे. सामाजिक वनीकरण विभागात सुरू झालेल्या नवीन कामांत या सर्व वन मजुरांना सामावून घेऊन कायम करावे. या मागणीसाठी वनमजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे

ठळक मुद्देवनमजुरांचे उपोषण सुरू, वनीकरण विभागाला निवेदन वनमजुरांना पेन्शन चालू करण्याची मागणी

ओरोस : १९८२ ते २००४ या कालावधीत विविध योजनेंतर्गत वृक्ष लागवड केलेल्या वनमजुरांना वनीकरण विभागाने वाऱ्यावर सोडले आहे. सामाजिक वनीकरण विभागात सुरू झालेल्या नवीन कामांत या सर्व वन मजुरांना सामावून घेऊन कायम करावे. या मागणीसाठी वनमजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी उपोषणस्थळी भेट देत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार वनमजुरांनी केला आहे.सलग १५ ते २० वर्षे ८० जणांनी प्रामाणिक काम करूनही वनीकरण विभागाने आम्हांला वाऱ्यावर सोडले आहे. गेली अनेक वर्षे वनमजूर म्हणून सामाजिक वनीकरण विभागामधून विविध शासनाच्या योजना अंमलात आणल्या. त्या योजनांमध्ये काम केले परंतु आम्ही अशिक्षित असल्याने आम्हांला याची कल्पना नव्हती.

परंतु आमच्यानंतर कामावर हजर झालेल्या सुमारे २० मजुरांना अधिकाऱ्यांनी निकषात बसवत कायम करून घेतले व आम्हांला अचानक कामावरुन कमी केले. आमच्यावर अन्याय झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तरी याची दखल घ्यावी व न्याय मिळावा याकरिता उपोषण सुरू केले असल्याचे वनमजुरांनी सांगितले.१० वर्षांपेक्षा जास्त काम केलेल्या वनमजुरांना सेवेत कायम करावे, ६० वर्षे वय असलेल्यांना पेन्शन चालू करावी, पगार व फरक मिळावा या मागण्यांसाठी हे उपोषण केले आहे. या उपोषणात एकनाथ होडावडेकर, आब्राव फर्नांडिस, मोहन परब, बाळाराम परब, सुरेंद्र घुराणी, प्रसाद सावंत, उषा गायकवाड, विजय ठाकूर, राजाराम सुर्वे, कृष्णा धुरी, आदी वनमजूर सहभागी झाले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील वनमजुरांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरु केले आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनforest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग